शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सासष्टीला ते आवडले, पण त्यांना जवळ मात्र कधी केलेच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 17:24 IST

मडगावच्या लॉयोला हायस्कुलमध्ये काही काळ शिक्षण घेतल्यामुळे असेल कदाचीत पर्रीकर यांचे सासष्टीतील कित्येक अल्पसंख्यांक समाजाच्या पुढाऱ्यांशी चांगले जमायचे.

- सुशांत कुंकळयेकरमडगाव : एरवी सासष्टी आणि भाजपा यांचा एकामेकांशी छत्तीसाचा आकडा पण मनोहर पर्रीकर यांच्या प्रेमात मात्र ही सासष्टी नेहमीच पडली. असे जरी असले तरी एक दोन अपवाद वगळता सासष्टीने त्यांना जवळ मात्र कधीच केले नाही. सासष्टीत विकास कामे करुनही आपला येथे फारसा प्रभाव पडत नाही याची खंत त्यांना शेवटपर्यंत होती.

मडगावच्या लॉयोला हायस्कुलमध्ये काही काळ शिक्षण घेतल्यामुळे असेल कदाचीत पर्रीकर यांचे सासष्टीतील कित्येक अल्पसंख्यांक समाजाच्या पुढाऱ्यांशी चांगले जमायचे. हे नेते भाजपाच्या इतर नेत्यापासून दोन हात दूर राहत असत. मात्र पर्रीकरांच्या जवळ जाण्यास त्यांना कुठलाही संकोच वाटत नसे त्यामुळेच कधी मिकी पाशेको तर कधी आर्वेतान फुर्तादो, कायतु सिल्वा तर कधी बेंजामीन सिल्वा यांना जवळ करीत त्यांनी आपले सरकारही शाबुत ठेवले.

पर्रीकरांना ख्रिस्ती समाज जवळचा का मानत होता? याबद्दल एकेकाळचे त्यांचे फॅन असलेले मडगावातील प्रसिद्ध दंत वैद्य डॉ. ह्युबर्ट गोम्स सांगतात, ‘पर्रीकर हे जरी भाजपाचे नेते असले तरी अल्पसंख्यांकडे जुळवून घेण्यास त्यांना कधीही अडचण आली नाही. त्याचे कारण म्हणजे त्यांची दृष्टीच विशाल होती. त्यांनी कधीही कुणाकडे जातीय चष्म्यातून बघितले नाही. त्यामुळेच अल्पसंख्यांकानीही त्यांच्यावर विश्वास ठेवला.’ पर्रीकर यांच्या प्रेमातूनच डॉ. गोम्स यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाच्या राज्य कार्यकारिणीवर डॉ. गोम्स यांनाही घेण्यात आले होते. मात्र नंतर डॉ. गोम्स हे भाजपातून व राजकारणातून बाहेर पडले.

२००४ पासून पर्रीकरांनी सासष्टीत आपली मुळे रुजवायला सुरु केली. २००४ च्या लोकसभा निवडणूकीत सासष्टीकरांचा पाठींबा भाजपाला मिळावा यासाठी ते कित्येकांना भेटत असत. त्यात मासळीवाल्यांपासून अगदी धिरयो आयोजित करणाऱ्यापर्यंतच्या लोकांचा समावेश असायचा. मात्र तरीही त्यांना यश आले नाहीच. मात्र नंतरच्या लोकसभा निवडणूकीत भाजपाचे रमाकांत आंगले दक्षिण गोव्यातून निवडून आले. मात्र त्यात सासष्टीपेक्षा इतर मतदारसंघाचाच वाटा अधिक होता. २००७ च्या विधानसभा निवडणूकीतही सासष्टीने पर्रीकर व भाजपा या दोघांना तसे दुरच ठेवले. अपवाद होता तो केवळ फातोर्डाचा पण तरीही त्यांनी सासष्टीत बदल घडवून आणण्याचा आपला नाद कधी सोडला नाही.

२०१२ च्या विधासभा निवडणूकीत मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले. काँग्रेसला चर्चचा असलेल्या विरोधाचा फायदा उठवीत त्यांनी नावेली मतदारसंघातून आवेर्तान फुर्तादो, वेळ्ळीतून बेंजामिन सिल्वा आणि बाणावलीतून कायतु सिल्वा यांना पाठींबा देत आठ मतदारसंघापैकी केवळ दोन मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्व ठेवण्यात यश मिळवले. आणि पहिल्यांदाच सासष्टीत भाजपाचा प्रभाव दिसू लागला. याच टर्ममध्ये नावेली व बाणावलीत कोट्यवधीचे विकास प्रकल्प उभे झाले. कायतु सिल्वा म्हणतात, आमच्या बाणावलीतच त्या पाच वर्षात किमान सहाशे कोटीेंची विकास कामे मार्गी लागली.

याच कालावधीत त्यांनी निवृत्त खलाशांना व त्यांच्या विधवांना पेंशन सुरु करुन अल्पसंख्याक मतदारांना अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केला. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत मिकी पाशेको, कायतू सिल्वा आणि आवेर्तान फुर्तादो यांचा वापर करीत तसेच दुसºया बाजुने चर्चिल आलेमाव सारख्या उमेदवाराला रिंगणात उतरवून भाजपाचे उमेदवार नरेंद्र सावईकर यांचा विजय निश्चित केला. असे जरी असले तरी २०१७ च्या विधानसभा निवडणूकीत सासष्टीने भाजपाला झिडकारत आठही मतदारसंघात भाजपाला बाजूला ठेवले. आणि पर्रीकरांसाठी तो एक धक्काच ठरला.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकर