शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

सासष्टीला ते आवडले, पण त्यांना जवळ मात्र कधी केलेच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 17:24 IST

मडगावच्या लॉयोला हायस्कुलमध्ये काही काळ शिक्षण घेतल्यामुळे असेल कदाचीत पर्रीकर यांचे सासष्टीतील कित्येक अल्पसंख्यांक समाजाच्या पुढाऱ्यांशी चांगले जमायचे.

- सुशांत कुंकळयेकरमडगाव : एरवी सासष्टी आणि भाजपा यांचा एकामेकांशी छत्तीसाचा आकडा पण मनोहर पर्रीकर यांच्या प्रेमात मात्र ही सासष्टी नेहमीच पडली. असे जरी असले तरी एक दोन अपवाद वगळता सासष्टीने त्यांना जवळ मात्र कधीच केले नाही. सासष्टीत विकास कामे करुनही आपला येथे फारसा प्रभाव पडत नाही याची खंत त्यांना शेवटपर्यंत होती.

मडगावच्या लॉयोला हायस्कुलमध्ये काही काळ शिक्षण घेतल्यामुळे असेल कदाचीत पर्रीकर यांचे सासष्टीतील कित्येक अल्पसंख्यांक समाजाच्या पुढाऱ्यांशी चांगले जमायचे. हे नेते भाजपाच्या इतर नेत्यापासून दोन हात दूर राहत असत. मात्र पर्रीकरांच्या जवळ जाण्यास त्यांना कुठलाही संकोच वाटत नसे त्यामुळेच कधी मिकी पाशेको तर कधी आर्वेतान फुर्तादो, कायतु सिल्वा तर कधी बेंजामीन सिल्वा यांना जवळ करीत त्यांनी आपले सरकारही शाबुत ठेवले.

पर्रीकरांना ख्रिस्ती समाज जवळचा का मानत होता? याबद्दल एकेकाळचे त्यांचे फॅन असलेले मडगावातील प्रसिद्ध दंत वैद्य डॉ. ह्युबर्ट गोम्स सांगतात, ‘पर्रीकर हे जरी भाजपाचे नेते असले तरी अल्पसंख्यांकडे जुळवून घेण्यास त्यांना कधीही अडचण आली नाही. त्याचे कारण म्हणजे त्यांची दृष्टीच विशाल होती. त्यांनी कधीही कुणाकडे जातीय चष्म्यातून बघितले नाही. त्यामुळेच अल्पसंख्यांकानीही त्यांच्यावर विश्वास ठेवला.’ पर्रीकर यांच्या प्रेमातूनच डॉ. गोम्स यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाच्या राज्य कार्यकारिणीवर डॉ. गोम्स यांनाही घेण्यात आले होते. मात्र नंतर डॉ. गोम्स हे भाजपातून व राजकारणातून बाहेर पडले.

२००४ पासून पर्रीकरांनी सासष्टीत आपली मुळे रुजवायला सुरु केली. २००४ च्या लोकसभा निवडणूकीत सासष्टीकरांचा पाठींबा भाजपाला मिळावा यासाठी ते कित्येकांना भेटत असत. त्यात मासळीवाल्यांपासून अगदी धिरयो आयोजित करणाऱ्यापर्यंतच्या लोकांचा समावेश असायचा. मात्र तरीही त्यांना यश आले नाहीच. मात्र नंतरच्या लोकसभा निवडणूकीत भाजपाचे रमाकांत आंगले दक्षिण गोव्यातून निवडून आले. मात्र त्यात सासष्टीपेक्षा इतर मतदारसंघाचाच वाटा अधिक होता. २००७ च्या विधानसभा निवडणूकीतही सासष्टीने पर्रीकर व भाजपा या दोघांना तसे दुरच ठेवले. अपवाद होता तो केवळ फातोर्डाचा पण तरीही त्यांनी सासष्टीत बदल घडवून आणण्याचा आपला नाद कधी सोडला नाही.

२०१२ च्या विधासभा निवडणूकीत मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले. काँग्रेसला चर्चचा असलेल्या विरोधाचा फायदा उठवीत त्यांनी नावेली मतदारसंघातून आवेर्तान फुर्तादो, वेळ्ळीतून बेंजामिन सिल्वा आणि बाणावलीतून कायतु सिल्वा यांना पाठींबा देत आठ मतदारसंघापैकी केवळ दोन मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्व ठेवण्यात यश मिळवले. आणि पहिल्यांदाच सासष्टीत भाजपाचा प्रभाव दिसू लागला. याच टर्ममध्ये नावेली व बाणावलीत कोट्यवधीचे विकास प्रकल्प उभे झाले. कायतु सिल्वा म्हणतात, आमच्या बाणावलीतच त्या पाच वर्षात किमान सहाशे कोटीेंची विकास कामे मार्गी लागली.

याच कालावधीत त्यांनी निवृत्त खलाशांना व त्यांच्या विधवांना पेंशन सुरु करुन अल्पसंख्याक मतदारांना अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केला. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत मिकी पाशेको, कायतू सिल्वा आणि आवेर्तान फुर्तादो यांचा वापर करीत तसेच दुसºया बाजुने चर्चिल आलेमाव सारख्या उमेदवाराला रिंगणात उतरवून भाजपाचे उमेदवार नरेंद्र सावईकर यांचा विजय निश्चित केला. असे जरी असले तरी २०१७ च्या विधानसभा निवडणूकीत सासष्टीने भाजपाला झिडकारत आठही मतदारसंघात भाजपाला बाजूला ठेवले. आणि पर्रीकरांसाठी तो एक धक्काच ठरला.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकर