शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

'गृह आधार'चे दीड हजार अर्ज मंजूर : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2024 10:43 IST

'लाडली लक्ष्मी' ची मंजुरीपत्रेही तयार; योजनांमध्ये अडथळे नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : 'गृह आधार'चे दीड हजार अर्ज मंगळवारी मंजूर केले. 'लाडली लक्ष्मी' योजनेची मंजुरीपत्रेही तयार आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत स्पष्ट केले.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावर चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते मुख्यमंत्री म्हणाले की, 'समाज कल्याणाच्या कोणत्याही योजना मागे ठेवलेल्या नाहीत. गृह आधारच्या काही लाभार्थ्यांनी दस्तऐवज सादर केले नव्हते. त्यामुळे काही जणांचे मानधन बंद झालेले असेल. परंतु दस्तऐवज दिल्यानंतर ते पूर्ववत सुरू केले जाईल.'

फिश फेस्टिवलमध्ये पन्नास हजाराहून अधिक लोक सहभागी झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आरोग्य विमा कवच देणारे दयानंद स्वास्थ्य सेवा योजना कार्डाचे आता ३६५ दिवस कधीही नूतनीकरण केले जाऊ शकते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहलीसाठी न्या, असा सल्ला देताना मुख्यमंत्री म्हणाले की बेतुल येथे इंडिया एनर्जी वीक उपक्रम ९ रोजी विद्यार्थ्यांसाठी खुला आहे तेथे न्या. मुख्यमंत्री म्हणाले की, हर घर जल योजनेअंतर्गत प्रत्येकाच्या घरात नळाला पाणी पोहोचवण्याचे काम आम्ही पूर्ण केले आहे. २४ तास पाणी मिळेल, असे आम्ही कधीच म्हटले नव्हते. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी सर्व पावले उचलली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तेथील घातक कचरा लवकरच स्थलांतरित करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

केवळ १३०० कोटी रुपये कर्ज घेतले

गेल्या आर्थिक वर्षात सरकारने केवळ १३०० कोटी रुपये कर्ज घेतल्याचा दावा करून मुख्यमंत्री म्हणाले की, 'नीती आयोगाच्या चौकटीत ४ हजार कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेता आले असते. परंतु आम्ही उगाच वायफळ कर्ज घेतले नाही. भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे कोट्यवधी रुपयांचे काम चालू आहे. जलस्रोत, बांधकाम खात्यातही कामे मार्गी लागलेली आहेत. आमदार निधीखाली कामे चालली आहेत. काही कामांना विलंब झाला असेल. परंतु कामे चालू झाली आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, पर्पल फेस्ट हे इव्हेंट म्हणून विरोधकांनी नाक मुरडू नये, या कार्यक्रमांच्या निमित्ताने हजारो लोक गोव्यात आले.

विद्यापीठातील कारकून भरतीची होणार चौकशी

गोवा विद्यापीठाकडून करण्यात आलेली कंत्राटी तत्वावरील कनिष्ठ कारकून पदांची भरतीची शिक्षण सचिवांकडून चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली. काँग्रेसचे आमदार कार्ल्स फेरेरा यांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. गोवा विद्यापीठाने कंत्राटी तत्वावर केलेल्या कारकून पदासाठीच्या भरतीत अनेक त्रुटी आणि नियमांची उल्लंघने आढळून आल्याचा दावा त्यांनी केला. पारदर्शकताही नसल्यामुळे या प्रक्रियेवरच लोकांनी संशय व्यक्त केल्याचे सांगून चौकशीची मागणी त्यांनी केली होती. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, विद्यापीठ ही स्वायत्त संस्था आहे. भरती प्रक्रियेत सरकार ढवळाढवळ करीत नाही. परंतु सदस्यांनी मागणी केल्याने शिक्षण सचिवां- कडून चौकशी करण्यात येईल.

म्हादई, खाणींचा विषय राज्यपाल विसरले कसे?

दरम्यान, विरोधी आमदारांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर टीकेची झोड उठवली. कर्नाटकने पाणी वळवल्याने म्हादईचा धगधगता विषय, खाणी कधी सुरू होणार? राखीव व्याघ्र क्षेत्र करण्याविषयी सरकारची भूमिका, याबाबत राज्यपालांच्या अभिभाषणात कोणताही उल्लेख न झाल्याने विरोधी आमदारांनी सरकारचे वाभाडे काढले.

 

टॅग्स :goaगोवा