शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

महापालिका पीपल्स फ्रेंडली बनवणार; महापौर उदय मडकईकर यांची घोषणा    

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 11:26 IST

आगामी निवडणुकीत बाबूश यांचे महापालिकेच्या सर्व ३० ही जागा पादाक्रांत करण्याचे स्वप्न पूर्ण करावे लागणार आहे.

किशोर कुबल

पणजी : महापालिकेची निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली असताना आमदार बाबूश मोन्सेरात यांनी महापौरपदाचा मुकुट पुन्हा एकदा उदय मडकईकर यांच्या डोक्यावर चढविला आहे. मडकईकर यांची जबाबदारी आता आणखी वाढली आहे. पुढील वर्षभरात अधिकाधिक लोकाभिमुख होऊन आगामी निवडणुकीत बाबूश यांचे महापालिकेच्या सर्व ३० ही जागा पादाक्रांत करण्याचे स्वप्न पूर्ण करावे लागणार आहे. एका अर्थाने हे एक मोठे आव्हानच मडकईकर यांच्यासमोर आहे. महापौरपदाचा दुसऱ्यांदा कार्यकाळ सांभाळणार असलेले मडकईकर यांच्याशी केलेली बातचीत...

  • आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच्या सर्व ३० ही जागा जिंकण्याची भीष्मप्रतिज्ञा केली आहे. यासाठी पुढील वर्षभरात महापौर म्हणून तुमची भूमिका काय राहणार आहे?

- महापौरपदाच्या आजवरच्या कारकिर्दीत लोकांची कामे सहज आणि सुलभ पद्धतीने करून देण्यासाठी नेहमीच माझा कटाक्ष राहिलेला आहे. लोकांना काय हवे, काय नको याची जाणीव मला आहे. लोकांच्या भावनांची नेहमीच मी कदर केलेली आहे. शहरात जेथे म्हणून रस्ते, पदपथ, पथदीप यांची आवश्यकता आहे तेथे वेळोवेळी ते दिलेले आहेत. पणजी ही गोव्याची राजधानी आहे. हजारो पर्यटक येथे भेट देत असतात. शहर स्वच्छ राहावे म्हणून माझा नेहमीच आटापिटा असतो आणि गेल्या वर्षभराच्या कारकिर्दीत हळूहळू हे मी सिद्ध केले आहे. मी ताबा घेण्यापूर्वी कांपाल येथील परेड मैदानाची स्थिती काय होती तुम्हाला माहित आहे. आज परेड मैदानावर जाऊन पहा, तेथील कचरा दूर झालेला आहे. तरुण मुले खेळताना दिसत आहेत. शहरातील उद्यानांची दुर्दशा झाली होती ती सुधारून घेतली.

  • वर्षभराचा कार्यकाळ हा तसा खूपच अल्प ,गेल्या कारकिर्दीत तुमची बरीच कामे अपूर्ण राहिली असतील ती तुम्ही कशी पुढे नेणार आहात?

-तुम्ही बरोबर बोललात. वर्षभराचा काळ अगदीच अल्प आहे. गेल्यावेळी महापौर म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिले तीन महिने निवडणूक आचारसंहितेत वाया गेले. त्यामुळे कोणतीच कामे होऊ शकली नाहीत. परंतु यावेळी मात्र संधी आहे. महापालिका लोकाभिमुख करणार आहे. लोकांना हवे असलेले निवास दाखले, उत्पन्नाचे दाखले यासाठी दहा-बारा दिवस लागतात. लोकांना हेलपाटे घालावे लागतात. हे चित्र बदलणार आहे. लोकांना दोन दिवसात त्यांचे दाखले मिळायला हवेत, यादृष्टीने कालबद्ध सेवा सुरू करणार आहे आणि या कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे पगार कापण्यासही मागे-पुढे पाहणार नाही. महापालिका असो, अथवा पालिका कर्मचारी, कॉमन केडर नसल्याने बदल्यांची भीती नसल्याने अधिकारी मनमानी वागतात. परंतु महापालिकेत मी असे होऊ देणार नाही. लोकांची सेवा हे माझे ब्रीद आहे. लोकांचा आशीर्वाद मला हवा आहे, त्यामुळे पीपल्स फ्रेंडली अशी महापालिका मला हवी आहे.

  •  स्मार्ट सिटी प्रकल्पांबद्दल विश्वासात घेतले जात नाही अशी तुमची तक्रार होती.  महापौरांना समितीवर स्थान दिले नव्हते. तुम्ही भांडून हे स्थान घेतले. स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबत तुम्ही पुढे कसे पाऊल टाकणार आहात?

- बरोबर आहे, स्मार्ट सिटीसाठी प्रतिनिधीत्व मिळवण्याकरता आम्हाला भांडावे लागले. परंतु त्याची पर्वा केली नाही. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की यापुढे कोणतीही कामे शहरात येत असतील तर आम्हाला आधी विश्वासात घेतले जाईल. त्या दृष्टीने सकारात्मक कामही सुरू झाले आहे. स्मार्ट सिटी अधिकारी आता येतात, आम्हाला विचारतात, आम्हाला कामाची कल्पना देतात शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत बरेच प्रकल्प यावयाचे आहेत परंतु सध्या आचारसंहिता लागू असल्याने सर्व थंडावले आहे.  आचारसंहिता उठल्यानंतर वेगवेगळ्या कामांसाठी निविदा काढल्या जातील आणि  कामे मार्गी लागतील. लोकांना हवी आहेत तीच कामे होतील. यापुढे कोणतेही काम करताना महापालिकेला त्या कामांची यादी अगोदर पाठवा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना केली आहे.

  • शेवटी एकच सांगा बाबूश यांनी पुन्हा तुमच्यावर विश्वास ठेवून महापौरपदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी मुकुट तुमच्या डोक्यावर ठेवला. गेल्या वर्षभरात तुम्ही असे काय केले की जेणेकरून बाबुश यांनी ही तुमच्यावर आत्मविश्वासाने जबाबदारी सोपवली?

- शहर स्वच्छ राहावे म्हणून माझे कायम प्रयत्न राहिले, कचऱ्याच्या बाबतीत लोकांना कसलाही त्रास होऊ नये, यासाठी माझे प्रयत्न राहिले. मध्यंतरी साळगावला रोज पाठवल्या जाणार्‍या 10 टन ओल्या कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला तेव्हाही आमदार बाबूश यांच्या सहकार्याने हा प्रश्न धसास लावला. कांपालला 

ड्रग्ज विकले जात होते. पाईप्समध्ये ड्रग्ज ठेवले जात होते. ड्रग्जची विक्री तेथील झोपड्यांमधूनही केली जात होती. त्यांना पकडण्यास आणि ड्रग्ज विक्री थांबविण्यास आम्ही पोलिसांना भाग पाडले. मार्केटमधील गाळेधारकांची बरोबर येत्या महिन्यात महिन्यात करार होणार आहेत. बराच काळ हे काम अडले होते. दूरसंचार असो किंवा सार्वजनिक बांधकाम खाते अथवा वीज खाते, शहरातील रस्ते फोडून मनमानी कारभार चालायचा परंतु यापुढे असे चालणार नाही. शहरातील नऊ प्रमुख रस्त्यांचे हॉट मिक्सिंग करून घेतलेले आहे. मे महिन्यापर्यंत आणखी काही रस्त्यांवर हॉट मिक्सिंग केले जाईल. त्यानंतर पुढील तीन वर्षे कोणालाही खोदकाम करता येणार नाही हे आम्ही आधीच बजावले आहे. गेल्या वर्षभरातील या सार्‍या कामांची पावती मला मिळाली याचा आनंद आहे. आमदार बाबूश मोन्सेरात यांनी माझे रिपोर्ट कार्ड बघूनच पुन्हा विश्वास दाखवलेला आहे आणि ही मोठी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरवणार आणि माझी जबाबदारी इमाने-इतबारे पार पाडणार.