शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
5
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
6
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
7
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
8
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
9
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
10
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
11
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
12
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
13
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
14
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
15
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
16
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
19
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
20
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल २१ वर्षे पडीक जमीन झाली पुन्हा हिरवीगार; युवाशक्तीने शेतीला दिले नवे जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 13:17 IST

विश्वस्त कृषी संस्थेचा आदर्शवत उपक्रम.

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : गोव्यातील ग्रामीण भागात शेती संकटात असताना 'विश्वस्त कृषी सहकारी संस्था'ने उल्लेखनीय पुढाकार घेत तब्बल २१ वर्षे पडीक पडलेली जमीन पुन्हा लागवडीखाली आणली आहे. या उपक्रमामुळे ओसाड पडलेली जमीन आज हिरवीगार बनली असून, शेतीक्षेत्रात नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

युवा पिढीच्या पुढाकारातून उभारलेल्या या संस्थेने 'शेती म्हणजे मागासलेपण' या समजुतीला छेद देत शेती हा स्वाभिमान, रोजगार आणि शाश्वत भविष्याचा मार्ग असल्याचा सकारात्मक संदेश समाजात रुजवला आहे. आधुनिक तंत्रज्ञान, स्थानिक अनुभव आणि सामूहिक श्रम यांच्या जोरावर पडीक जमिनीला नवसंजीवनी मिळाली आहे.

संस्थेचे अध्यक्ष दिनेश गावडे म्हणाले, '२१ वर्षे पडून असलेली जमीन पुन्हा कसणे म्हणजे केवळ उत्पादन नव्हे, तर गावाचा आत्मसन्मान उभा करणे आहे.' तर सचिव गौरेश गावडे यांनी युवकांना आवाहन करताना सांगितले की, 'योग्य दृष्टिकोन, एकजूट आणि मेहनतीच्या जोरावर शेतीतही क्रांती घडवता येते.'

उपक्रमाची वैशिष्ट्ये

२१ वर्षे पडीक पडलेली जमीन पुन्हा शेतीयोग्य करण्यात आली. बंधाऱ्यांची दुरुस्ती, पाण्याचे नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला नवजीवन देण्यात आले. सामूहिक श्रम आणि युवकांच्या सहभागामुळे प्रकल्प यशस्वी ठरला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळाल्या असून, शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. स्वावलंबन, पर्यावरण संवर्धन आणि सामूहिक विकास या तिन्ही बाबी साध्य करत हा प्रकल्प इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

२१ वर्षे पडीक पडलेली जमीन पुन्हा कसणे हे केवळ उत्पादन वाढवण्यापुरते मर्यादित नाही, तर तो गावाच्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. आम्ही शेतीकडे केवळ उपजीविकेचा मार्ग म्हणून नाही, तर स्वाभिमान आणि शाश्वत भविष्य म्हणून पाहतो. आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक अनुभव यांची सांगड घातल्यास शेतीत मोठे परिवर्तन घडवता येते, यावर आमचा विश्वास आहे. युवकांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून पुढाकार घेतला, तर ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. - दिनेश गावडे, अध्यक्ष, विश्वस्त कृषी सहकारी संस्था
 

English
हिंदी सारांश
Web Title : Youth Power Revives 21 Years of Barren Land, Transforming Agriculture

Web Summary : Goa's Vishwasta Krishi Cooperative revitalized 21 years of barren land, inspiring rural areas. Youth embraced agriculture with modern techniques, creating jobs and promoting self-reliance. The initiative showcases farming as sustainable and dignified, encouraging others to transform rural economies.
टॅग्स :goaगोवाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेती