शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

महागठबंधनाचा परिणाम शून्य, 2004 साली आम्ही कमी पडलो : भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 6:22 PM

भाजपाच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावर विविध पक्ष एकत्र आले तरी, कथित महागठबंधनाचा परिणाम हा शून्य आहे. भाजपाच यावेळीही जिंकेल. 2004 साली अटलबिहारी वाजपेयी हे लोकप्रिय नेते आमच्याकडे असले तरी, त्यावेळी वाजपेयी सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचविण्यात आम्ही कमी पडलो व त्यामुळे पराभव वाट्याला आला, असे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी शनिवारी सांगितले.

पणजी : भाजपाच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावर विविध पक्ष एकत्र आले तरी, कथित महागठबंधनाचा परिणाम हा शून्य आहे. भाजपाच यावेळीही जिंकेल. 2004 साली अटलबिहारी वाजपेयी हे लोकप्रिय नेते आमच्याकडे असले तरी, त्यावेळी वाजपेयी सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचविण्यात आम्ही कमी पडलो व त्यामुळे पराभव वाट्याला आला, असे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी शनिवारी सांगितले.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि इतरांच्या उपस्थितीत हुसैन यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. मोदी सरकारने बजावलेली कामगिरी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. लोकसभेच्या तीनशे जागा जिंकण्याचे आमचे लक्ष्य आहे. तीन राज्यांमध्ये आमचा थोडक्यात पराभव झाला तरी, लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही जिंकणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही लोकसभेच्या 74 जागा जिंकू. 2004 साली भाजपाने राजस्तान, मध्य प्रदेश व छत्तीसगढ या तीन राज्यांत विधानसभा निवडणुकीवेळी विजय प्राप्त केला होता पण लगेच लोकसभा निवडणुकीत आम्ही हरलो होतो. त्यावेळी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात मी देखील होतो. वाजपेयींची लोकप्रियता कमी झाली नव्हती, आम्ही त्यांची कामे लोकांर्पयत पोहचविण्यात कमी पडलो होतो, असे हुसैन म्हणाले.

ममता बॅनर्जी यांनी शनिवारी सभा घेतली. त्या सभेला जे उपस्थित राहिले, तेवढेच राजकीय पक्ष विरोधकांच्या महाआघाडीमध्ये आहेत, बाकीचे सर्व मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा आघाडीसोबत आहेत. आमच्याकडे मोदींसारखा लिडर आहे तर विरोधी आघाडीकडे डिलर आहे, अशी टीका हुसैन यांनी केली. ज्यांची पंतप्रधान बनण्याची इच्छा अपुरी राहिली असेच नेते विरोधी आघाडीकडे आहेत. ते भ्रष्टाचारी आहेत. मोदी सरकारच्या काळात हिंदू,ख्रिस्ती, मुस्लिम अशा सर्वांना समान वागणूक मिळाली आहे, असे हुसैन म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसgoaगोवा