मुंबई-गोवा महामार्ग कामाच्या विलंबाबाबत खासदारांना चिंता; राज्यसभेत मुद्दा केला उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 08:04 IST2026-04-02T08:03:21+5:302026-04-02T08:04:28+5:30
राज्यसभेत शून्य प्रहराला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या रुंदीकरण आणि कामातील विलंबाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली.

मुंबई-गोवा महामार्ग कामाच्या विलंबाबाबत खासदारांना चिंता; राज्यसभेत मुद्दा केला उपस्थित
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत शून्य प्रहराला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या रुंदीकरण आणि कामातील विलंबाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली.
सदानंद तानावडे उन्नतीकरणाच्या तानावडे या महामार्गाचे महत्त्व अधोरेखित करताना म्हणाले की, 'कोकणपट्टा आणि गोव्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ६६ जीवनवाहिनीच असून, पर्यटन, व्यापार, मालवाहतूक आणि एकूणच प्रादेशिक विकासात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
सुमारे दशकापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या चौपदरीकरण प्रकल्पाचा उद्देश कनेक्टिव्हिटी सुधारणे, रस्ते सुरक्षितता वाढवणे आणि मुंबई ते गोवा दरम्यान प्रवासाचा वेळ कमी करणे हा होता. या प्रकल्पामुळे लाखो प्रवासी आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार होता. परंतु, दुर्दैवाने काम प्रलंबित आहे.'
तानावडे पुढे म्हणाले की, 'या महामार्गाच्या पूर्णत्वानंतर उद्योग, शेती, मत्स्यव्यवसाय आणि लघुउद्योजकांना मोठा फायदा होऊन मालवाहतुकीला गती मिळेल. परंतु, पर्यावरणीय मंजुरी, आराखड्यामधील जमीन संपादनातील अडचणी, बदल, कंत्राटदारांशी संबंधित समस्या आणि वाहतूक व्यवस्थापनातील अडथळे यामुळे प्रकल्पात सातत्याने विलंब होत आहे.
परिणामी, अनेक ठिकाणी अपूर्ण कामे, अरुंद मार्ग, अपूर्ण पूल आणि खराब रस्त्यांची स्थिती कायम आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर बनते. मुसळधार पावसामुळे अपूर्ण रस्ते अधिक धोकादायक होतात, वाहतूक कोंडी होते आणि अपघातांचा धोका वाढतो. ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.
कालमर्यादा जाहीर करा
केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना करून उर्वरित कामे जलद गतीने पूर्ण करावीत, संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय वाढवावा आणि प्रकल्प पूर्ण होण्यासाठ स्पष्ट कालमर्यादा जाहीर करावी, असे तानावडे म्हणाले.