शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात महाराष्ट्रविरोधी भावनेला नव्याने धार काढण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 12:38 IST

गोव्याचे महाराष्ट्रात विलिनीकरण व्हायला हवे म्हणून ज्या घटकांनी व ज्या विचारसरणीने 1967 साली प्रयत्न केले होते, त्या विचारसरणीच्या नावे नव्याने बोटे मोडून गोव्यात महाराष्ट्रविरोधी भावनेला नव्याने धार काढण्याचा प्रयत्न गोव्यातील काही राजकीय पक्ष आणि सरकारमधील घटकांनीही सुरू केल्याचे दिसून येत आहे.

पणजी : गोव्याचे महाराष्ट्रात विलिनीकरण व्हायला हवे म्हणून ज्या घटकांनी व ज्या विचारसरणीने 1967 साली प्रयत्न केले होते, त्या विचारसरणीच्या नावे नव्याने बोटे मोडून गोव्यात महाराष्ट्रविरोधी भावनेला नव्याने धार काढण्याचा प्रयत्न गोव्यातील काही राजकीय पक्ष आणि सरकारमधील घटकांनीही सुरू केल्याचे दिसून येत आहे. एकाबाजूने म्हादईच्या पाणी प्रश्नावरून कर्नाटकविरुद्ध गोवा लढत असतानाच दुस-या बाजूने जनतम कौलास 50 वर्षे होत असल्याच्या निमित्ताने गोव्यात महाराष्ट्राविरुद्ध टीकेचा सूर काही घटकांनी सुरू केला आहे. 

अशावेळी गोव्यातील मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने बॅक सीट घेतलेले असले तरी, जनमत कौल दिन हा अस्मिता दिवस म्हणून साजरा करण्यास सरकारने पाठींबा दिला आहे. दुस-याबाजूने मराठीभाषा व संस्कृती तसेच भारतीयत्व अशा भावनांविषयी अधिक जागृत असलेल्या काही गोमंतकीयांनी जनतम कौलानिमित्त लावल्या गेलेल्या पोस्टर्सना विरोध चालविला आहे. काही घटकांनी मंगळवारी म्हापसा- पणजी मार्गावरील ब:याच पोस्टर्सना काळे फासून निषेध नोंदवला आहे.

डिसेंबर 1967 मध्ये गोवा पोतरुगीजांच्या राजवटीतून मुक्त झाला. लगेच गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करावे अशी मागणी पुढे आली. मात्र याचवेळी गोवा हे स्वतंत्र राष्ट्र असावे, ते महाराष्ट्र किंवा कर्नाटकचा भाग बनू नये म्हणूनही प्रयत्न झाले. मात्र स्वातंत्र्यसैनिक तसेच अन्य घटकांनी या मागणीला जोरदार विरोध केला. गोवा हे भारताचेच एक स्वतंत्र राज्य असावे अशी मागणी पुढे आली. महाराष्ट्रात विलीनीकरण हवा की नको हे ठरविण्यासाठी जनमत कौल घेतला गेला. त्यामुळे गोवा महाराष्ट्रात विलिन होऊ शकला नाही. गोव्यातील ख्रिस्ती धर्मिय बांधवांना महाराष्ट्राची त्यावेळी भीती दाखवली गेली. गोवा महाराष्ट्राचा भाग झाला नाही यात गोव्याचे हितच आहे पण आता पुन्हा एकदा जनमत कौलाची पन्नास वर्षे साजरी होत असताना महाराष्ट्राला दोष देण्याचा जोरदार प्रयत्न गोव्यात काही घटक करू लागले आहेत. यातून संघर्षाचे बिज सध्या पडले आहे. 

गोव्याला महाराष्ट्रात विलिन करण्याची मागणी ज्या काळात आली होती, त्या काळची परिस्थिती अभ्यासकांनी लक्षात घ्यावी असे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी म्हटले आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर चौदा वर्षानंतर गोवा स्वतंत्र झाला. हा विलंब का लागला, त्यामागे कोणती कारणो होती तेही लक्षात घ्यावे, असे ढवळीकर यांनी म्हटले आहे. तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासोबत सत्तेत राहून तुम्ही जनमत कौल साजरा करणे हा दांभिकपणा झाला अशी टीका आम आदमी पक्षाने व शिवसेनेने गोवा फॉरवर्ड पक्षावर व भाजपवर केली आहे.

दरम्यान, गोवा सरकारने विलिनीकरणविरोधी दिन हा अस्मिता दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले. गोव्यातील गोवा फॉरवर्ड या पक्षाने सर्वत्र ओपिनियन पोल दिनाचे फलक लावले. या फलकावर मंत्री विजय सरदेसाई यांनी लावलेल्या स्वत:च्या छायाचित्राला काही गोमंतकीयांनी आक्षेप घेतला. काही अज्ञातांनी म्हापसा-पणजी मार्गावरील सर्व फलकांवर काळे फासल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. जनमत कौल साजरा करण्यासाठी भाजपने जास्त उत्साह दाखवलेला नाही पण गोवा फॉरवर्डने दाखवलेल्या उत्साहाचे स्वागत व विरोध अशा दोन्ही प्रकारच्या भावना गोव्यात सध्या अनुभवास येत आहेत.

टॅग्स :goaगोवाMaharashtraमहाराष्ट्र