शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

गोव्यात महाराष्ट्रविरोधी भावनेला नव्याने धार काढण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 12:38 IST

गोव्याचे महाराष्ट्रात विलिनीकरण व्हायला हवे म्हणून ज्या घटकांनी व ज्या विचारसरणीने 1967 साली प्रयत्न केले होते, त्या विचारसरणीच्या नावे नव्याने बोटे मोडून गोव्यात महाराष्ट्रविरोधी भावनेला नव्याने धार काढण्याचा प्रयत्न गोव्यातील काही राजकीय पक्ष आणि सरकारमधील घटकांनीही सुरू केल्याचे दिसून येत आहे.

पणजी : गोव्याचे महाराष्ट्रात विलिनीकरण व्हायला हवे म्हणून ज्या घटकांनी व ज्या विचारसरणीने 1967 साली प्रयत्न केले होते, त्या विचारसरणीच्या नावे नव्याने बोटे मोडून गोव्यात महाराष्ट्रविरोधी भावनेला नव्याने धार काढण्याचा प्रयत्न गोव्यातील काही राजकीय पक्ष आणि सरकारमधील घटकांनीही सुरू केल्याचे दिसून येत आहे. एकाबाजूने म्हादईच्या पाणी प्रश्नावरून कर्नाटकविरुद्ध गोवा लढत असतानाच दुस-या बाजूने जनतम कौलास 50 वर्षे होत असल्याच्या निमित्ताने गोव्यात महाराष्ट्राविरुद्ध टीकेचा सूर काही घटकांनी सुरू केला आहे. 

अशावेळी गोव्यातील मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने बॅक सीट घेतलेले असले तरी, जनमत कौल दिन हा अस्मिता दिवस म्हणून साजरा करण्यास सरकारने पाठींबा दिला आहे. दुस-याबाजूने मराठीभाषा व संस्कृती तसेच भारतीयत्व अशा भावनांविषयी अधिक जागृत असलेल्या काही गोमंतकीयांनी जनतम कौलानिमित्त लावल्या गेलेल्या पोस्टर्सना विरोध चालविला आहे. काही घटकांनी मंगळवारी म्हापसा- पणजी मार्गावरील ब:याच पोस्टर्सना काळे फासून निषेध नोंदवला आहे.

डिसेंबर 1967 मध्ये गोवा पोतरुगीजांच्या राजवटीतून मुक्त झाला. लगेच गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करावे अशी मागणी पुढे आली. मात्र याचवेळी गोवा हे स्वतंत्र राष्ट्र असावे, ते महाराष्ट्र किंवा कर्नाटकचा भाग बनू नये म्हणूनही प्रयत्न झाले. मात्र स्वातंत्र्यसैनिक तसेच अन्य घटकांनी या मागणीला जोरदार विरोध केला. गोवा हे भारताचेच एक स्वतंत्र राज्य असावे अशी मागणी पुढे आली. महाराष्ट्रात विलीनीकरण हवा की नको हे ठरविण्यासाठी जनमत कौल घेतला गेला. त्यामुळे गोवा महाराष्ट्रात विलिन होऊ शकला नाही. गोव्यातील ख्रिस्ती धर्मिय बांधवांना महाराष्ट्राची त्यावेळी भीती दाखवली गेली. गोवा महाराष्ट्राचा भाग झाला नाही यात गोव्याचे हितच आहे पण आता पुन्हा एकदा जनमत कौलाची पन्नास वर्षे साजरी होत असताना महाराष्ट्राला दोष देण्याचा जोरदार प्रयत्न गोव्यात काही घटक करू लागले आहेत. यातून संघर्षाचे बिज सध्या पडले आहे. 

गोव्याला महाराष्ट्रात विलिन करण्याची मागणी ज्या काळात आली होती, त्या काळची परिस्थिती अभ्यासकांनी लक्षात घ्यावी असे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी म्हटले आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर चौदा वर्षानंतर गोवा स्वतंत्र झाला. हा विलंब का लागला, त्यामागे कोणती कारणो होती तेही लक्षात घ्यावे, असे ढवळीकर यांनी म्हटले आहे. तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासोबत सत्तेत राहून तुम्ही जनमत कौल साजरा करणे हा दांभिकपणा झाला अशी टीका आम आदमी पक्षाने व शिवसेनेने गोवा फॉरवर्ड पक्षावर व भाजपवर केली आहे.

दरम्यान, गोवा सरकारने विलिनीकरणविरोधी दिन हा अस्मिता दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले. गोव्यातील गोवा फॉरवर्ड या पक्षाने सर्वत्र ओपिनियन पोल दिनाचे फलक लावले. या फलकावर मंत्री विजय सरदेसाई यांनी लावलेल्या स्वत:च्या छायाचित्राला काही गोमंतकीयांनी आक्षेप घेतला. काही अज्ञातांनी म्हापसा-पणजी मार्गावरील सर्व फलकांवर काळे फासल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. जनमत कौल साजरा करण्यासाठी भाजपने जास्त उत्साह दाखवलेला नाही पण गोवा फॉरवर्डने दाखवलेल्या उत्साहाचे स्वागत व विरोध अशा दोन्ही प्रकारच्या भावना गोव्यात सध्या अनुभवास येत आहेत.

टॅग्स :goaगोवाMaharashtraमहाराष्ट्र