शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

गोव्यात महाराष्ट्रविरोधी भावनेला नव्याने धार काढण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 12:38 IST

गोव्याचे महाराष्ट्रात विलिनीकरण व्हायला हवे म्हणून ज्या घटकांनी व ज्या विचारसरणीने 1967 साली प्रयत्न केले होते, त्या विचारसरणीच्या नावे नव्याने बोटे मोडून गोव्यात महाराष्ट्रविरोधी भावनेला नव्याने धार काढण्याचा प्रयत्न गोव्यातील काही राजकीय पक्ष आणि सरकारमधील घटकांनीही सुरू केल्याचे दिसून येत आहे.

पणजी : गोव्याचे महाराष्ट्रात विलिनीकरण व्हायला हवे म्हणून ज्या घटकांनी व ज्या विचारसरणीने 1967 साली प्रयत्न केले होते, त्या विचारसरणीच्या नावे नव्याने बोटे मोडून गोव्यात महाराष्ट्रविरोधी भावनेला नव्याने धार काढण्याचा प्रयत्न गोव्यातील काही राजकीय पक्ष आणि सरकारमधील घटकांनीही सुरू केल्याचे दिसून येत आहे. एकाबाजूने म्हादईच्या पाणी प्रश्नावरून कर्नाटकविरुद्ध गोवा लढत असतानाच दुस-या बाजूने जनतम कौलास 50 वर्षे होत असल्याच्या निमित्ताने गोव्यात महाराष्ट्राविरुद्ध टीकेचा सूर काही घटकांनी सुरू केला आहे. 

अशावेळी गोव्यातील मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने बॅक सीट घेतलेले असले तरी, जनमत कौल दिन हा अस्मिता दिवस म्हणून साजरा करण्यास सरकारने पाठींबा दिला आहे. दुस-याबाजूने मराठीभाषा व संस्कृती तसेच भारतीयत्व अशा भावनांविषयी अधिक जागृत असलेल्या काही गोमंतकीयांनी जनतम कौलानिमित्त लावल्या गेलेल्या पोस्टर्सना विरोध चालविला आहे. काही घटकांनी मंगळवारी म्हापसा- पणजी मार्गावरील ब:याच पोस्टर्सना काळे फासून निषेध नोंदवला आहे.

डिसेंबर 1967 मध्ये गोवा पोतरुगीजांच्या राजवटीतून मुक्त झाला. लगेच गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करावे अशी मागणी पुढे आली. मात्र याचवेळी गोवा हे स्वतंत्र राष्ट्र असावे, ते महाराष्ट्र किंवा कर्नाटकचा भाग बनू नये म्हणूनही प्रयत्न झाले. मात्र स्वातंत्र्यसैनिक तसेच अन्य घटकांनी या मागणीला जोरदार विरोध केला. गोवा हे भारताचेच एक स्वतंत्र राज्य असावे अशी मागणी पुढे आली. महाराष्ट्रात विलीनीकरण हवा की नको हे ठरविण्यासाठी जनमत कौल घेतला गेला. त्यामुळे गोवा महाराष्ट्रात विलिन होऊ शकला नाही. गोव्यातील ख्रिस्ती धर्मिय बांधवांना महाराष्ट्राची त्यावेळी भीती दाखवली गेली. गोवा महाराष्ट्राचा भाग झाला नाही यात गोव्याचे हितच आहे पण आता पुन्हा एकदा जनमत कौलाची पन्नास वर्षे साजरी होत असताना महाराष्ट्राला दोष देण्याचा जोरदार प्रयत्न गोव्यात काही घटक करू लागले आहेत. यातून संघर्षाचे बिज सध्या पडले आहे. 

गोव्याला महाराष्ट्रात विलिन करण्याची मागणी ज्या काळात आली होती, त्या काळची परिस्थिती अभ्यासकांनी लक्षात घ्यावी असे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी म्हटले आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर चौदा वर्षानंतर गोवा स्वतंत्र झाला. हा विलंब का लागला, त्यामागे कोणती कारणो होती तेही लक्षात घ्यावे, असे ढवळीकर यांनी म्हटले आहे. तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासोबत सत्तेत राहून तुम्ही जनमत कौल साजरा करणे हा दांभिकपणा झाला अशी टीका आम आदमी पक्षाने व शिवसेनेने गोवा फॉरवर्ड पक्षावर व भाजपवर केली आहे.

दरम्यान, गोवा सरकारने विलिनीकरणविरोधी दिन हा अस्मिता दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले. गोव्यातील गोवा फॉरवर्ड या पक्षाने सर्वत्र ओपिनियन पोल दिनाचे फलक लावले. या फलकावर मंत्री विजय सरदेसाई यांनी लावलेल्या स्वत:च्या छायाचित्राला काही गोमंतकीयांनी आक्षेप घेतला. काही अज्ञातांनी म्हापसा-पणजी मार्गावरील सर्व फलकांवर काळे फासल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. जनमत कौल साजरा करण्यासाठी भाजपने जास्त उत्साह दाखवलेला नाही पण गोवा फॉरवर्डने दाखवलेल्या उत्साहाचे स्वागत व विरोध अशा दोन्ही प्रकारच्या भावना गोव्यात सध्या अनुभवास येत आहेत.

टॅग्स :goaगोवाMaharashtraमहाराष्ट्र