शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार प्रकल्पात काहीही काळेबेरे घडलेले नाही, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 21:09 IST

Devendra Fadnavis: जलयुक्त शिवार योजनेमुळे महाराष्ट्रातील संबंधित गावांमध्ये पाण्याची पातळी वाढल्याचा अहवाल आयआयटीने दिलेला आहे, असा दावा करीत या प्रकल्पात काहीही काळेबेरे घडलेले नाही

पणजी - जलयुक्त शिवार योजनेमुळे महाराष्ट्रातील संबंधित गावांमध्ये पाण्याची पातळी वाढल्याचा अहवाल आयआयटीने दिलेला आहे, असा दावा करीत या प्रकल्पात काहीही काळेबेरे घडलेले नाही, असे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प राबविण्यात आला होता व त्यावर ९६३४ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या प्रकल्पात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही महाराष्ट्रात केली जात आहे. महालेखापाल अहवालात हा प्रकल्प फसल्याने ताशेरे ओढण्यात आले होते. त्यानंतर घोटाळ्याचा आरोप करणाºया तक्रारीही सादर झाल्या होत्या.

फडणवीस म्हणाले की, आमचे सरकार होते तेव्हा ज्या तक्रारी आल्या त्याची चौकशी आम्ही चालू केली होती. आता नवे सरकार चौकशी पुढे नेत आहे. या प्रकल्पांतर्गत ४ लाख कामे झाली त्यातील केवळ ६00 कामांच्या बाबतीत तक्रारी आहेत. तक्रारींचे हे प्रमाण एक टक्कादेखील नाही. पत्रकार परिषदेस मुख्यमंत्री सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, पक्षाचे निवडणूक सहप्रभारी केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी, सहप्रभारी वस्रोद्योगमंत्री दर्शना जार्दोश, गोवा प्रभारी सी.टी.रवी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJalyukt Shivarजलयुक्त शिवारPoliticsराजकारण