शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

गोव्यात भातशेती करपली, यंदा 20 टक्के पिक घटण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 14:01 IST

गोव्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने भातशेती धोक्यात आली आहे. प्रखर उन्हामुळे शेती करपण्याच्या स्थितीत आहे. परिणामी सुमारे 20 टक्के पीक घटण्याची शक्यता कृषी खात्याकडून व्यक्त केली जात आहे.

पणजी : गोव्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने भातशेती धोक्यात आली आहे. प्रखर उन्हामुळे शेती करपण्याच्या स्थितीत आहे. परिणामी सुमारे 20 टक्के पीक घटण्याची शक्यता कृषी खात्याकडून व्यक्त केली जात आहे. पिकाचा आढावा घेण्यासाठी खात्यातर्फे सर्वेक्षण हाती घेण्यात येणार आहे. खात्याचे संचालक नेल्सन फिगरेदो यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यास दुजोरा दिला. राज्यात सरासरी १८ टक्के कमी पाऊस झालेला आहे. डोंगराळ भागातील शेतीला जास्त झळ पोहोचली आहे. सासष्टीसारख्या तालुक्यात भातपिकाची लागवड लवकर होते. तेथे पिक तयार झालेले आहे त्यामुळे फारशी समस्या उद्भवणार नाही. कणस तयार होऊन रोपटे वाकले आहे, अशा ठिकाणी परिणाम होणार नाही. कारण सप्टेंबर अखेरीस कापणीसाठी हे पिक तयार होईल. काणकोण, धारबांदोडा आदी डोंगराळ भागात भातपिकावर मोठा परिणाम झालेला आहे. 

फिगरेदो म्हणाले की, ‘गेल्या वर्षी दर हेक्टरी सरासरी ३९३0 किले भातपिक मिळाले होते. यंदा हे प्रमाण १५ ते २0 टक्क्यांनी घटणार आहे. १0 जुलैनंतर ज्या ज्या भागात लागवड झाली तेथे जास्त परिणाम होईल. तिसवाडी, बार्देसमध्येही पिकावर परिणाम जाणवणार आहे.’हळदोणे भागात पिक करपल्याचे स्वत: आपल्याला आढळून आल्याचे फिगरेदो यांनी या प्रतिनिधीला सांगितले. 

दक्षिण गोव्यातील काणकोण व केपें तालुक्यांमध्ये ११ गावांमधील सुमारे ३ हजार शेतक-यांना याचा फटका बसला आहे. मान्सूनने गेले अनेक दिवस दडी मारलेली आहे. प्रखर उन्हामुळे उष्म्यातही वाढ झालेली असून आॅक्टोबरचा उष्मा आतापासूनच जाणवू लागला आहे.  काणकोण तालुक्यात सात गावांमध्ये सुमारे १६00 हेक्टर जमिनीत भात लागवड केली जाते तर केपे तालुक्यात सुमारे ३ हजार हेक्टर क्षेत्रात भातपिक घेतले जाते. चार गावांमध्ये तर डोंगराळ भागात लागवड केली जाते. 

काणकोणचे विभागीय कृषी अधिकारी चंद्रहास देसाई म्हणाले की, गेले नऊ दिवस पावसाचा थेंबही नाही. पुढील ७२ तासात पाऊस झाला नाही तर पिकावर गंभीर परिणाम होईल. जमीन १२ दिवसपर्यंत पाणी ठेवू शकते. ६0 ते ७0 टक्के शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असते. कारण हा डोंगराळ भाग आहे. 

कडक ऊन आणि उष्म्यामुळे भातशेती नष्ट होण्याचा प्रकार गेल्या आठ वर्षात प्रथमच होत आहे. देसाई म्हणाले की, आम्ही शेतीच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केलेली आहे. पिकावर ऊन्हाचा परिणाम होऊन भातशेती करपल्याचे काही ठिकाणी स्पष्टपणे दिसून आले आहे. 

काणकोणच्या विभागीय कृषी अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार आगोंदा, खोला, खोतिगांव, गांवडोंगरी, लोलयें, पोळें, पैंगीण श्रीस्थळ आदी गावांमध्ये एकूण सुमारे १६00 हेक्टर जमिनीत भातपिक घेतले जाते. या शेतकºयांची मोठी हानी झालेली आहे. पकाची हानी झाल्यास शेतकरी आधार निधीतून अर्थसाहाय्य मिळविणे हा एकच पर्याय आहे. 

केपेंचे विभागीय कृषी अधिकारी सत्यवान देसाई म्हणाले की,‘आम्ही बारकाईने स्थितीवर नजर ठेवून आहोत. बार्से, कावरे, मळकर्णे व मोरपिर्ला भागात शेतीला धोका पोचलेला आहे. सप्टेंबरच्या याच कालावधीत पिकाला जास्त पाणी लागते. यावर्षी राज्यात सुमारे ३0 हजार हेक्टर जमिनीत भाताची लागवड झालेली आहे. 

दरम्यान, काल रात्री राज्यातील काही भागात पावसाच्या हलक्याशा सरी कोसळल्या त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु आज सकाळपासून पुन्हा कडक ऊन पसरले आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीgoaगोवा