शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

गोव्यात भातशेती करपली, यंदा 20 टक्के पिक घटण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 14:01 IST

गोव्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने भातशेती धोक्यात आली आहे. प्रखर उन्हामुळे शेती करपण्याच्या स्थितीत आहे. परिणामी सुमारे 20 टक्के पीक घटण्याची शक्यता कृषी खात्याकडून व्यक्त केली जात आहे.

पणजी : गोव्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने भातशेती धोक्यात आली आहे. प्रखर उन्हामुळे शेती करपण्याच्या स्थितीत आहे. परिणामी सुमारे 20 टक्के पीक घटण्याची शक्यता कृषी खात्याकडून व्यक्त केली जात आहे. पिकाचा आढावा घेण्यासाठी खात्यातर्फे सर्वेक्षण हाती घेण्यात येणार आहे. खात्याचे संचालक नेल्सन फिगरेदो यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यास दुजोरा दिला. राज्यात सरासरी १८ टक्के कमी पाऊस झालेला आहे. डोंगराळ भागातील शेतीला जास्त झळ पोहोचली आहे. सासष्टीसारख्या तालुक्यात भातपिकाची लागवड लवकर होते. तेथे पिक तयार झालेले आहे त्यामुळे फारशी समस्या उद्भवणार नाही. कणस तयार होऊन रोपटे वाकले आहे, अशा ठिकाणी परिणाम होणार नाही. कारण सप्टेंबर अखेरीस कापणीसाठी हे पिक तयार होईल. काणकोण, धारबांदोडा आदी डोंगराळ भागात भातपिकावर मोठा परिणाम झालेला आहे. 

फिगरेदो म्हणाले की, ‘गेल्या वर्षी दर हेक्टरी सरासरी ३९३0 किले भातपिक मिळाले होते. यंदा हे प्रमाण १५ ते २0 टक्क्यांनी घटणार आहे. १0 जुलैनंतर ज्या ज्या भागात लागवड झाली तेथे जास्त परिणाम होईल. तिसवाडी, बार्देसमध्येही पिकावर परिणाम जाणवणार आहे.’हळदोणे भागात पिक करपल्याचे स्वत: आपल्याला आढळून आल्याचे फिगरेदो यांनी या प्रतिनिधीला सांगितले. 

दक्षिण गोव्यातील काणकोण व केपें तालुक्यांमध्ये ११ गावांमधील सुमारे ३ हजार शेतक-यांना याचा फटका बसला आहे. मान्सूनने गेले अनेक दिवस दडी मारलेली आहे. प्रखर उन्हामुळे उष्म्यातही वाढ झालेली असून आॅक्टोबरचा उष्मा आतापासूनच जाणवू लागला आहे.  काणकोण तालुक्यात सात गावांमध्ये सुमारे १६00 हेक्टर जमिनीत भात लागवड केली जाते तर केपे तालुक्यात सुमारे ३ हजार हेक्टर क्षेत्रात भातपिक घेतले जाते. चार गावांमध्ये तर डोंगराळ भागात लागवड केली जाते. 

काणकोणचे विभागीय कृषी अधिकारी चंद्रहास देसाई म्हणाले की, गेले नऊ दिवस पावसाचा थेंबही नाही. पुढील ७२ तासात पाऊस झाला नाही तर पिकावर गंभीर परिणाम होईल. जमीन १२ दिवसपर्यंत पाणी ठेवू शकते. ६0 ते ७0 टक्के शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असते. कारण हा डोंगराळ भाग आहे. 

कडक ऊन आणि उष्म्यामुळे भातशेती नष्ट होण्याचा प्रकार गेल्या आठ वर्षात प्रथमच होत आहे. देसाई म्हणाले की, आम्ही शेतीच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केलेली आहे. पिकावर ऊन्हाचा परिणाम होऊन भातशेती करपल्याचे काही ठिकाणी स्पष्टपणे दिसून आले आहे. 

काणकोणच्या विभागीय कृषी अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार आगोंदा, खोला, खोतिगांव, गांवडोंगरी, लोलयें, पोळें, पैंगीण श्रीस्थळ आदी गावांमध्ये एकूण सुमारे १६00 हेक्टर जमिनीत भातपिक घेतले जाते. या शेतकºयांची मोठी हानी झालेली आहे. पकाची हानी झाल्यास शेतकरी आधार निधीतून अर्थसाहाय्य मिळविणे हा एकच पर्याय आहे. 

केपेंचे विभागीय कृषी अधिकारी सत्यवान देसाई म्हणाले की,‘आम्ही बारकाईने स्थितीवर नजर ठेवून आहोत. बार्से, कावरे, मळकर्णे व मोरपिर्ला भागात शेतीला धोका पोचलेला आहे. सप्टेंबरच्या याच कालावधीत पिकाला जास्त पाणी लागते. यावर्षी राज्यात सुमारे ३0 हजार हेक्टर जमिनीत भाताची लागवड झालेली आहे. 

दरम्यान, काल रात्री राज्यातील काही भागात पावसाच्या हलक्याशा सरी कोसळल्या त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु आज सकाळपासून पुन्हा कडक ऊन पसरले आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीgoaगोवा