शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

खनिज खाणींतील पाणी उसपण्यास मान्यता, सुरक्षेचीही कामे सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 20:11 IST

राज्यातील बंद खनिज खाणींमधून पाणी पंपाद्वारे उसपून काढण्यास लिजधारकांना सरकारने मान्यता दिली आहे. तशी लेखी सूचना खाण खात्याने शुक्रवारी जारी केली आहे. खनिज खाणींमध्ये दैनंदिन पद्धतीने पावसाळापूर्व सुरक्षात्मक कामे करण्यासही लिजधारकांना मान्यता देण्यात आल्याचे खात्याने स्पष्ट केले आहे.

पणजी : राज्यातील बंद खनिज खाणींमधून पाणी पंपाद्वारे उसपून काढण्यास लिजधारकांना सरकारने मान्यता दिली आहे. तशी लेखी सूचना खाण खात्याने शुक्रवारी जारी केली आहे. खनिज खाणींमध्ये दैनंदिन पद्धतीने पावसाळापूर्व सुरक्षात्मक कामे करण्यासही लिजधारकांना मान्यता देण्यात आल्याचे खात्याने स्पष्ट केले आहे.राज्यातील सर्व 88 खनिज लिजेस रद्द झाल्यानंतर राज्यातील सगळ्य़ा खनिज खाणी बंद झाल्या आहेत. दि. 16 मार्च हा बंदीचा पहिला दिवस होता. खाण खात्याच्या अधिका:यांची पथके खनिज खाणींना भेट देत आहे. बंदी लागू होताच सर्व लिजधारकांनी लिज क्षेत्रतील आपली यंत्रसामुग्री तिथून अन्यत्र हलवली. गुरुवारी सायंकाळी सात वाजण्यापूर्वी सर्व खनिज वाहतूक बंद झाली. मुख्य सचिव धमेंद्र शर्मा यांनी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. लिज क्षेत्रतील खनिजाची चोरी होऊ नये म्हणून काय उपाययोजना करता येईल याविषयी बैठकीत चर्चा झाली. राज्याचे पोलिस प्रमुख तसेच खाण खात्याचे संचालक प्रसन्ना आचार्य हेही बैठकीत सहभागी झाले. सर्व लिज क्षेत्रंमध्ये पोलिस ठेवता येत नाहीत. तेवढे पोलिस बळ उपलब्ध नाही. मात्र पोलिस सातत्याने विविध खाणींना भेट देतील व खनिज मालाची चोरी होणार नाही याची काळजी घेतील, असे खाण खात्याचे संचालक आचार्य यांनी लोकमतला सांगितले. खाणींच्या खंदकांमध्ये असलेले पाणी काढून ते विविध भागांमध्ये कुळागरे, शेती यांच्यासाठी दिले जाते. त्या पाण्यावर प्रक्रिया करून काही गावांमध्ये ते पाणी पिण्यासाठीही पुरविले जाते. खनिज खाणी बंद झाल्या तरी पाणी अशा पद्धतीने उसपून ते शेती, बागायती व पिण्यासाठी पुरविण्याचे काम थांबविले जाऊ नये अशी भूमिका सरकारने शुक्रवारी घेतली. सर्वोच्च न्यायालयाने 2क्12 साली खनिज खाण बंदी लागू केली होती, तेव्हाही पाणी उसपून काढण्यास मनाई केली नव्हती याचा आधार आता खाण खात्याने घेतला आहे. पाणी पुरवठा बंद केला जाऊ नये अशी मागणी करणारी निवेदने पंचायती व अन्य काही संस्थांनी सरकारला सादर केली आहेत. जलसंसाधन खात्याने या पाण्यावर अधिभार लागू करू नये असे खात्याने शुक्रवारी जारी केलेल्या सूचनापत्रत म्हटले आहे.

खाण खात्याच्या देखरेखीखाली मान्सूनपूर्व सुरक्षेची कामे खाणींवर करण्यासही लिजधारकांना मान्यता देण्यात आली आहे. खनिज लिज क्षेत्रतील खनिज माल हा आता सरकारचा झालेला आहे. त्याची चोरी होऊ नये म्हणून मामलेदार, जिल्हाधिकारी, खाण खाते यांची पथके तसेच पोलिसही लिज क्षेत्रंना भेटी देतील, असे सुत्रंनी सांगितले. लिज क्षेत्रबाहेरील खनिज मालाची वाहतूक करण्यास मुभा देणारी सूचना सरकार लवकरच जारी करण्याची शक्यता आहे.

अॅटर्नी जनरल काय करतील? राज्य सरकारने खनिज खाण बंदीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाला फेरविचार याचिका सादर करण्याचे ठरवले आहे पण त्यासाठी अगोदर देशाच्या अॅटर्नी जनरलांची मान्यता हवी आहे. गोव्याचा खाणप्रश्न एवढा काळ अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी सर्वोच्च न्यायालयात हाताळला. गोव्याच्यावतीने युक्तीवाद केले पण फेरविचार याचिका सादर करण्याविषयी सरकारने नाडकर्णी यांचा सल्ला घेणो टाळले आहे. कारण फेरविचार याचिका सादर करण्यास नाडकर्णी अनुकूल होणार नाहीत. त्यांना तातडीने खनिज लिजांचा लिलाव झालेला हवा आहे याची कल्पना सरकारला आहे. त्यामुळे फेरविचार याचिकेचा विषय अॅटर्नी जनरलांकडे पाठविला जाणार आहे. अॅटर्नी जनरलांनी जर फेरविचार याचिका सादर करावी असे मत दिले तर मग सरकार सर्वोच्च न्यायालयाला ती याचिका सादर करील, असे सुत्रंनी स्पष्ट केले. अॅटर्नी जनरल फेरविचार याचिकेच्या गोवा सरकारच्या प्रस्तावावर कोणता निर्णय घेतात याकडे खाण मालकांचेही लक्ष लागून आहे. सरकारने खाण मालकांना दिलासा देण्याच्या हेतूने फेरविचार याचिकेचा प्रस्ताव पुढे आणला आहे.

टॅग्स :goaगोवा