शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

खनिज खाणींतील पाणी उसपण्यास मान्यता, सुरक्षेचीही कामे सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 20:11 IST

राज्यातील बंद खनिज खाणींमधून पाणी पंपाद्वारे उसपून काढण्यास लिजधारकांना सरकारने मान्यता दिली आहे. तशी लेखी सूचना खाण खात्याने शुक्रवारी जारी केली आहे. खनिज खाणींमध्ये दैनंदिन पद्धतीने पावसाळापूर्व सुरक्षात्मक कामे करण्यासही लिजधारकांना मान्यता देण्यात आल्याचे खात्याने स्पष्ट केले आहे.

पणजी : राज्यातील बंद खनिज खाणींमधून पाणी पंपाद्वारे उसपून काढण्यास लिजधारकांना सरकारने मान्यता दिली आहे. तशी लेखी सूचना खाण खात्याने शुक्रवारी जारी केली आहे. खनिज खाणींमध्ये दैनंदिन पद्धतीने पावसाळापूर्व सुरक्षात्मक कामे करण्यासही लिजधारकांना मान्यता देण्यात आल्याचे खात्याने स्पष्ट केले आहे.राज्यातील सर्व 88 खनिज लिजेस रद्द झाल्यानंतर राज्यातील सगळ्य़ा खनिज खाणी बंद झाल्या आहेत. दि. 16 मार्च हा बंदीचा पहिला दिवस होता. खाण खात्याच्या अधिका:यांची पथके खनिज खाणींना भेट देत आहे. बंदी लागू होताच सर्व लिजधारकांनी लिज क्षेत्रतील आपली यंत्रसामुग्री तिथून अन्यत्र हलवली. गुरुवारी सायंकाळी सात वाजण्यापूर्वी सर्व खनिज वाहतूक बंद झाली. मुख्य सचिव धमेंद्र शर्मा यांनी शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. लिज क्षेत्रतील खनिजाची चोरी होऊ नये म्हणून काय उपाययोजना करता येईल याविषयी बैठकीत चर्चा झाली. राज्याचे पोलिस प्रमुख तसेच खाण खात्याचे संचालक प्रसन्ना आचार्य हेही बैठकीत सहभागी झाले. सर्व लिज क्षेत्रंमध्ये पोलिस ठेवता येत नाहीत. तेवढे पोलिस बळ उपलब्ध नाही. मात्र पोलिस सातत्याने विविध खाणींना भेट देतील व खनिज मालाची चोरी होणार नाही याची काळजी घेतील, असे खाण खात्याचे संचालक आचार्य यांनी लोकमतला सांगितले. खाणींच्या खंदकांमध्ये असलेले पाणी काढून ते विविध भागांमध्ये कुळागरे, शेती यांच्यासाठी दिले जाते. त्या पाण्यावर प्रक्रिया करून काही गावांमध्ये ते पाणी पिण्यासाठीही पुरविले जाते. खनिज खाणी बंद झाल्या तरी पाणी अशा पद्धतीने उसपून ते शेती, बागायती व पिण्यासाठी पुरविण्याचे काम थांबविले जाऊ नये अशी भूमिका सरकारने शुक्रवारी घेतली. सर्वोच्च न्यायालयाने 2क्12 साली खनिज खाण बंदी लागू केली होती, तेव्हाही पाणी उसपून काढण्यास मनाई केली नव्हती याचा आधार आता खाण खात्याने घेतला आहे. पाणी पुरवठा बंद केला जाऊ नये अशी मागणी करणारी निवेदने पंचायती व अन्य काही संस्थांनी सरकारला सादर केली आहेत. जलसंसाधन खात्याने या पाण्यावर अधिभार लागू करू नये असे खात्याने शुक्रवारी जारी केलेल्या सूचनापत्रत म्हटले आहे.

खाण खात्याच्या देखरेखीखाली मान्सूनपूर्व सुरक्षेची कामे खाणींवर करण्यासही लिजधारकांना मान्यता देण्यात आली आहे. खनिज लिज क्षेत्रतील खनिज माल हा आता सरकारचा झालेला आहे. त्याची चोरी होऊ नये म्हणून मामलेदार, जिल्हाधिकारी, खाण खाते यांची पथके तसेच पोलिसही लिज क्षेत्रंना भेटी देतील, असे सुत्रंनी सांगितले. लिज क्षेत्रबाहेरील खनिज मालाची वाहतूक करण्यास मुभा देणारी सूचना सरकार लवकरच जारी करण्याची शक्यता आहे.

अॅटर्नी जनरल काय करतील? राज्य सरकारने खनिज खाण बंदीविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाला फेरविचार याचिका सादर करण्याचे ठरवले आहे पण त्यासाठी अगोदर देशाच्या अॅटर्नी जनरलांची मान्यता हवी आहे. गोव्याचा खाणप्रश्न एवढा काळ अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी सर्वोच्च न्यायालयात हाताळला. गोव्याच्यावतीने युक्तीवाद केले पण फेरविचार याचिका सादर करण्याविषयी सरकारने नाडकर्णी यांचा सल्ला घेणो टाळले आहे. कारण फेरविचार याचिका सादर करण्यास नाडकर्णी अनुकूल होणार नाहीत. त्यांना तातडीने खनिज लिजांचा लिलाव झालेला हवा आहे याची कल्पना सरकारला आहे. त्यामुळे फेरविचार याचिकेचा विषय अॅटर्नी जनरलांकडे पाठविला जाणार आहे. अॅटर्नी जनरलांनी जर फेरविचार याचिका सादर करावी असे मत दिले तर मग सरकार सर्वोच्च न्यायालयाला ती याचिका सादर करील, असे सुत्रंनी स्पष्ट केले. अॅटर्नी जनरल फेरविचार याचिकेच्या गोवा सरकारच्या प्रस्तावावर कोणता निर्णय घेतात याकडे खाण मालकांचेही लक्ष लागून आहे. सरकारने खाण मालकांना दिलासा देण्याच्या हेतूने फेरविचार याचिकेचा प्रस्ताव पुढे आणला आहे.

टॅग्स :goaगोवा