शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
2
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
3
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
4
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
5
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
6
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
7
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
8
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
9
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
10
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
11
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
12
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
13
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
14
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
15
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
16
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
17
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
18
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
19
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला

रामाला का 'वनवास'?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 07:36 IST

रामा काणकोणकर हा तरुण असाच धाडसी, हे मान्य करावे लागेल.

रामा काणकोणकर म्हणजे राजेंद्र केरकर नव्हे किंवा रामा काणकोणकर म्हणजे क्लॉड आल्वारीसदेखील नव्हे. रामा म्हणजे सुदीप ताम्हणकरही नव्हे आणि रामा म्हणजे रमेश गावस किंवा अभिजित प्रभुदेसाईही नव्हे. ही जी नावे आम्ही इथे नमूद केली, ती सगळी सामाजिक कार्यकर्त्यांची नावे आहेत. विविध स्तरांवर काम करणारे हे कार्यकर्ते. कुणी पर्यावरण रक्षणासाठी लढतो, कुणी म्हादईप्रश्नी आवाज उठवतो, कुणी बेकायदा मायनिंगविरोधात रण पेटवतो, तर कुणी आरटीआयचा वापर करून सरकारी गैरकारभार उघड करतो. यातील प्रत्येक सामाजिक कार्यकर्ता हा वेगळ्या स्वभावगुणांचा आणि प्रवृत्तीचा आहे. प्रत्येकाची स्टाइल, वागण्याची पद्धत समान असत नाही. काहीजण राकट, रांगडी भाषा वापरून विषयाला थोडा राजकीय रंगही देतात. मात्र ते धाडसी असतात म्हणून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढतात. 

रामा काणकोणकर हा तरुण असाच धाडसी, हे मान्य करावे लागेल. रामाने आता २३ दिवसांनंतर सत्ताधाऱ्यांवर आरोप केले. त्यामुळे त्याचा बोलविता धनी कुणी तरी वेगळा आहे, असे म्हणून सरकार मोकळे होत आहे. रामाला आपल्या राजकीय विरोधकांनी फितवले किंवा फूस लावली, त्यामुळे तो आता राजकारण्यांची नावे घेतोय, असेही समाजाचा एक घटक बोलत आहे. भाजप कार्यकर्ते तर जाहीरपणे हेच सांगतात. आज काँग्रेस पक्ष सत्तेत असता तर काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप झाले असते आणि काँग्रेसवाले असेच बोलले असते. आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कार्टे हा जगप्रसिद्ध नियम आहे. आम्ही काही दिवसांपूर्वी 'संपादकीय' मध्ये रामाची वेदना मांडली होती. सत्य काय आहे हे कुणालाच ठाऊक नाही.

एक गोष्ट खरी की, रामाने पाच-सहा महिन्यांपूर्वीच आपल्या जिवाला धोका आहे, असे जाहीर केले होते. त्याला कुणापासून धोका आहे, कोण धमक्या देतो किंवा कुणाची माणसे धमक्या देतात हे सांगण्याचा प्रयत्न त्याने केला होता. त्याबाबतचा व्हिडीओ कालपासून सोशल मीडियावर फिरत आहे.

पोलिसांनी त्यावेळीच योग्य पावले उचलली असती तर कदाचित रामावर हल्ला झाला नसता. एसटी समाजातील एक तरुण सामाजिक कार्यकर्ता दिवसाढवळ्या काही गुंडांच्या माराला सामोरा जातोय, तेव्हा त्याचा दोष असो-नसो, त्याची वेदना समजून घेण्याची गरज आहे. व्यक्तिगत आकसापोटी रामावर हल्ला झाला होता का, हेही पोलिसांनी शोधून काढावेच. रामाच्या मागे आता कुणी बोलविता धनी आहे काय याचाही शोध घ्यावा आणि रामा म्हणतो त्याप्रमाणे सत्ताधाऱ्यांचाही संबंध त्याच्यावरील हल्ल्याशी आहे काय हेही पोलिसांनी तपासून पहावे. विरोधी आमदार जाऊन रामाला इस्पितळात सांगतील व मग रामा चक्क गृहमंत्री व पर्यटन मंत्र्यांचे नाव घेईल, असे सहसा घडत नसते. कारण चौकशी यंत्रणेने तपास केला तर आपले खोटे आरोप उघडे पडतील याची भीती शेवटी आरोप करणाऱ्यालाही असतेच. 

सत्ताधाऱ्यांचा कदाचित रामावरील हल्ल्याशी संबंध नसेलदेखील, पण ते सिद्ध करण्याची जबाबदारी आता पोलिस यंत्रणेची आहे. तुम्ही एखाद्यावर हल्ला करून या, असे मुख्यमंत्री गुंडांना सांगतील एवढी वाईट परिस्थिती अजून गोव्यात आलेली नाही. तसे पाहायला गेल्यास क्लॉड आल्वारीस यांच्या लढ्यामुळे बेकायदा खाण धंदा बंद झाला तेव्हा मोठमोठे माफिया दुखावले गेले; पण क्लॉडवर कधी हल्ला झाला नाही. २०१३ साली पर्रीकर सरकारच्या काळात क्लॉडला मोठा व्हीलन ठरविण्याचा प्रयत्न झाला होता, खाणग्रस्त भागातील आमदार त्या प्रयत्नात आघाडीवर होते, पण क्लॉड व्हीलन ठरले नाहीत. रामावरील हल्ला हा व्यक्तिगत रागातून असो किंवा अन्य कोणत्या कारणास्तव असो, पण रामादेखील खलनायक ठरणार नाही. मात्र रामाच्या आरोपाची चौकशी झाली तरच सत्य काय ते कळून येईल. आता रामाचा निषेध करणाऱ्या काही लोकप्रतिनिधींनी त्याच्यावरील हल्ल्याचा मात्र निषेध केला नव्हता. अमानुष पद्धतीने रामाला मारले गेले हे सत्य आहे.

तीन तास रामाची पोलिसांनी जबानी घेतली होती. पण रामाने पूर्वी कुणा राजकारण्याचे नाव घेतले नव्हते, असे पोलिस सांगतात. तुझा कुणा राजकारण्यावर संशय आहे काय, असा प्रश्न पोलिसांनी जबानीवेळी रामाला विचारला होता काय? रामा म्हणतो त्याप्रमाणे मॅजिस्ट्रेटसमोर जबानी नोंदविण्याची प्रक्रिया व्हायला हवी.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Rama Kanconkar's 'Vanvas': Exploring the Attack and Allegations

Web Summary : Social activist Rama Kanconkar's attack raises questions about political motives. Accusations against authorities warrant investigation. Police must determine the truth behind the assault and Kanconkar's claims. Previous threats to his life heighten concerns.
टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPoliticsराजकारण