शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

महाराष्ट्रानंतर गोव्यातही प्लास्टिक बंदीचा आग्रह वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 12:23 IST

महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर गोव्यातही प्लास्टिक बंदी लागू करण्याबाबतचा आग्रह पर्यावरणप्रेमी व राज्यातील काही जागृत घटकांकडून वाढू लागला आहे.

- सदगुरू पाटील

पणजी : महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर गोव्यातही प्लास्टिक बंदी लागू करण्याबाबतचा आग्रह पर्यावरणप्रेमी व राज्यातील काही जागृत घटकांकडून वाढू लागला आहे. गोवा सरकार प्लास्टिक बंदीचा विचार वारंवार बोलून दाखवत असले तरी, प्रत्यक्षात बंदीची अंमलबजावणी करणे गोव्यात शक्य झालेले नाही.

गोवा हे महाराष्ट्राच्या तुलनेत एकदमच छोटे राज्य. महाराष्ट्राच्या एक किंवा दोन जिल्ह्यांएवढा होता आहे पण या छोटय़ा राज्यात प्लास्टिक कच-याची निर्मिती ही प्रचंड प्रमाणात होत आहे. गोवा हा सुशिक्षितांचा प्रदेश असला तरी, प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक कप कुठेही उघड्यावर फेकून टाकले जातात. गोवा हे पर्यटन राज्य असल्याने लाखो पर्यटक या प्रदेशात फिरताना तेही प्लास्टिक पिशव्या व बाटल्या रस्त्याच्या बाजूला टाकतात. कारण गोव्यात अजूनही मोठी शहरे वगळता अन्यत्र रस्त्याच्या बाजूला कचराकुंड्यांची सोय नाही. पणजी, मडगाव, म्हापसा, वास्को अशा शहरांतही असलेल्या कचराकुंड्यांची संख्या खूप कमीच आहे. हा प्लास्टिक कचरा गटारांमध्ये साठतो व मग पाऊस पडताच शहरांमधील प्रमुख रस्ते पाण्याखाली जातात. राजधानी पणजीत देखील दर पावसाळ्य़ात असाच अनुभव येत आहे. गटारे कितीही उसपली तरी, प्लॅस्टीकचा कचरा हा काही भागात तसाच राहत असतो, असे माजी महापौर यतिन पारेख यांचेही म्हणणे आहे. 

कोची येथील सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च संस्थेने केलेल्या पाहणीवेळी गोव्यात किना-यांवर जास्त प्रमाणात प्लास्टिक आढळून आले. प्लॅस्टीकच्या कच-याबाबत गोव्याचे समुद्रकिनारे हे देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची नोंद संस्थेने केली आहे. गोव्यातील किना-यावरील वाळूमध्ये प्रत्येक मीटरवर सरासरी 25.47 ग्रॅम प्लास्टिक सापडते. प्लास्टिक बंदी लागू करण्याचा विचार नुकताच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही नव्याने जाहीरपणे बोलून दाखवला. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाईल व त्यासाठी पाच हजार रुपयांपर्यंत दंड ठोठवण्याचाही गोवा सरकारचा विचार आहे. 

गोव्यातील पणजी बाजारपेठेत गेल्या महिन्यात प्लास्टिक पिशव्या विक्रीवेळी व्यापा-यांना पकडून दंड ठोठवण्याची मोहीम राबविली गेली पण ती मोहीम लगेच थंडावली. देवाला फुले वाहिल्यानंतर दुस-या दिवशी निर्माण होणारे निर्माल्य प्लास्टिक पिशव्यांमध्ये घालून या पिशव्या नद्यांमध्ये फेकल्या जातात. मांडवी व जुवारी या दोन नद्यांमध्ये जास्त प्लास्टिक पिशव्या टाकल्या जातात. गोमंतकीय माणूस सकाळी उठल्याबरोबर प्लास्टिकचीच पिशवी घेऊन मासळी मार्केटमध्ये जातो. मोठय़ा प्रमाणात प्लास्टिकची निर्मिती ही सकाळपासूनच सुरू होत आहे. ग्रामीण गोव्यात गुरांच्या पोटांमध्ये मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक आढळून येते. पर्यावरणप्रेमी याविषयी चिंता व्यक्त करत आहेत.

दरम्यान, गोवा सरकारने साळगाव-कळंगुटच्या पठारावर जर्मन तंत्रज्ञान वापरून जो आधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्प बांधला आहे, तिथे 90 ते 100 टन कचरा येतो. यात बहुतांश प्लास्टिक आढळून येत आहे. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनीही प्लास्टिक बंदीची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी व्हावी असे मत व्यक्त केले आहे. साळगावच्या प्रकल्पाची क्षमता यापुढे 250 टनापर्यंत वाढवण्याचे गोवा सरकारने ठरवून तशी प्रक्रिया सुरू झाली आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीgoaगोवाMaharashtraमहाराष्ट्र