शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

आकस्मिक मृत्यूनंतर शवविच्छेदन महत्वाचे का?; भावनिक नातेवाईकांनी समजण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 14:04 IST

यंत्रणेकडून कार्यवाही : शवविच्छेदन अहवालातून कळते मृत्यूचे कारण

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : कुठलेही मोठे आजार नाही, प्रकृती एकदम ठणठणीत असताना एखाद्या व्यक्तीचा किंवा महिलेचा आकस्मिक मृत्यू झाल्यास संबंधिताच्या मृत्यूचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी पोलिस व आरोग्य विभागाच्या वतीने मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची कार्यवाही पार पाडली जाते.

येथील जिल्हा सामान्य रुग्णालय अधिनस्त असलेल्या शवविच्छेदन गृहात महिन्यातून जवळपास २२ ते २५ दिवस कोणत्या नाही कोणत्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाते. यासाठी आवश्यक ती कार्यवाही यंत्रणेकडून पार पाडली जाते.

पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट म्हणजे काय?संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, याचा शोध घेण्यासाठी केली जाणारी प्रक्रिया म्हणजे पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट होय.

...तर गुन्हा पचवला जाऊ शकतो आकस्मिक निधन झालेल्या व्यक्तीचे शव- विच्छेदन न केल्यास मृत्यूचे नेमके कारण कळणार नाही. परिणामी संबंधित आरोपीचा गुन्हा पचविला जाऊ शकतो.

'पोस्ट मॉर्टेम' मुळेच क्लिष्ट गुन्ह्यांची उकलशवविच्छेदन अहवालातून मृतक व्यक्तीची हत्या व इतर क्लिष्ट गुन्ह्यांची उकल पोलिसांना करता येते. नेमका मृत्यू कशामुळे झाला, किती वाजता झाला, कुठे, किती घाव झाले हे यातून कळत असते.

दिवसाला तीन ते चार मृतदेहांचे शवविच्छेदनविष प्राशन करून आत्महत्या, अपघाती निधन व इतर कारणांनी अचानक मृत्यू झालेल्या व्यक्तींचे शवविच्छेदन केले जाते. गडचिरोली येथील शवविच्छेदन गृहात दिवसाला तीन ते चार जणांचे शव- विच्छेदन केले जाते.

पोस्टमॉर्टेम कधी केले जाते?सर्पदंशाने मृत्यू, वाघाच्या हल्ल्यात मृत्यू, अपघातात गंभीर जखमी होऊन मृत्यू, आकस्मिक मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीचे शववि- च्छेदन केले जाते. यासाठी कुटुंबियांची परवानगी घेतली जाते.

शवविच्छेदन अहवाल यासाठी महत्त्वाचा गुन्हेगारीतून हत्या झाली असल्यास आरोपीचा शोध लागावा, विम्याच्या पैशाचा लाभ मिळावा, यासाठी शवविच्छेदन अहवाल संबंधित कुटुंबिय व प्रशासनाला आवश्यक असतो.

नातेवाईक भावनिक होतात जवळच्या व्यक्तीचे व नातेवाईकाचा मृत्यू झाल्यास शववि- च्छेदन करताना नातेवाईक प्रचंड भावनिक होतात. पार्थिव शरीराची चिरफाड करू नये, अशा त्यांच्या भावना असतात. 

११ महिन्यांत २६५ शवविच्छेदन येथील शवविच्छेदनगृहात गेल्या ११ महिन्यांत जवळपास २६५ व्यक्तींचे शवविच्छेदन करण्यात आले. याबाबतचा अहवाल संबंधित डॉक्टरांनी पोलिस विभागाकडे सुपूर्द केला आहे.

 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सCrime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली