शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

या बिनधास्तपणाला जबाबदार काेण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:33 IST

राज्यात व जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आठ दिवसांपूर्वीच शासनाने साेमवार ते शुक्रवार दरम्यान बाजारपेठ उघडण्यावर ...

राज्यात व जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आठ दिवसांपूर्वीच शासनाने साेमवार ते शुक्रवार दरम्यान बाजारपेठ उघडण्यावर प्रतिबंध घातले आहेत. तर शनिवार व रविवारी कडक लाॅकडाऊनचे पालन करायचे आहे. मात्र गडचिराेलीसह जिल्हाभरात काेणतेही निर्बंध पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. गडचिराेली शहरातील संपू्र्ण बाजारपेठ साेमवारी व मंगळवारी उघडण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त जेवढी गर्दी बाजारपेठेत राहत नाही. तेवढी गर्दी मंगळवारी उसळली हाेती.

कापड दुकानांमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. त्यामुळे काही ग्राहकांच्या रांगा लागल्या हाेत्या. मागील आठ दिवसांमध्ये काेराेनाची लाट गंभीर स्वरूप धारण करीत आहे. मंगळवारी एकाच दिवशी सुमारे २० नागरिकांचा मृत्यू झाला तर ३७० काेराेना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. अशी गंभीर स्थिती असतानाही नियम ताेडून बाजारपेठ उघडली जात आहे. प्रशासकीय यंत्रणा मात्र दुकानदारांवरही काेणतीही कारवाई करीत नसल्याने दुकानदारही बिनधास्त झाले आहेत.

बाॅक्स

कापड दुकानांमध्ये शटर बंद करून विक्री

सर्वाधिक गर्दी कापड दुकानांमध्ये उसळली हाेती. दिवसभर दुकानात पाय ठेवायलाही जागा नव्हती. सायंकाळी पाच वाजता दुकाने बंद करण्याचा निर्णय स्वत:च दुकानदारांनी करून घेतला. पाच वाजतानंतरही ग्राहकांची गर्दी कायम असल्याने काही कापड दुकानदारांनी ५ वाजल्यानंतर शटर बंद करून कापडांची विक्री केली.

नागरिकांमध्ये लाॅकडाऊनची भीती

राज्यात कधीही लाॅकडाऊन लागू शकते अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. लग्नाच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. लाॅकडाऊन लागल्यास कपडे मिळणार नाहीत, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे कापड दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी उसळत आहे. तसेच सामान्य ग्राहकही किराणा व इतर वस्तूंची साठवणूक करण्यावर भर देत आहेत.

गुजरी हे गर्दीचे प्रमुख केंद्र

दैनिक गुजरीमध्ये साेशल डिस्टन्सिंगचे काेणतेही नियम पाळले जात नाहीत. व्यापारीवर्ग एकमेकांना लागूनच दुकाने लावतात. रस्तेही अतिशय लहान आहेत. त्यामुळे ग्राहकांची या ठिकाणी माेठी गर्दी उसळते. गडचिराेली शहरातील हे एक गर्दीचे प्रमुख केंद्र आहे. या ठिकाणच्या व्यापाऱ्यांना एकमेकांपासून अंतर ठेवून बसविण्याची गरज आहे. नियमाचा भंग करणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.