शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

भामरागडमध्ये शिरले पर्लकोटा नदीचे पाणी, 70 गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 9:21 AM

दुकानांमधील साहित्यासह काही कुटुंबांना हलविले

भामरागड (गडचिरोली) : भामरागडच्या पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी गावात शिरल्याने हाहाकार उडाला आहे. पुलावरून पाणी वाहात असल्याने छत्तीसगड सीमेकडील भामरागड तालुक्यातील जवळपास 70 गावांचा संपर्क तुटला आहे.

पर्लकोटा नदीचे विस्तीर्ण पात्र शनिवारी पूर्णपणे भरले. सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान नदीचे पाणी पुलावर चढणे सुरू झाल्याने वाहतूक पूर्णपणे बंद होऊन अनेक गावांचा दळणवळण संपर्क तुटला आहे. काही दुकानांमधून पाणी शिरले. त्यांनी कालपासूनच सामान हलविणे सुरू केले होते.पुलावरील पाण्यातून पैलतीर गाठण्याचा प्रयत्न कोणी करू नये म्हणून महसूल आणि नगर पंचायत प्रशासनाने दोन्ही तीरावर कर्मचाऱ्यांना तैनात केले. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही तयार आहे. पूर परिस्थितीत वीज पुरवठा आणि मोबाईल संपर्क सुरू राहावा यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. तहसीलदार सत्यनारायण सिलमवार, नायब तहसीलदार प्रकाश उप्पुलवार, अनमोल कांबळे, नगर पंचायत मुख्याधिकारी सुरज यादव परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीRainपाऊस