शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागात पक्क्या रस्त्यांची वानवा

By admin | Updated: March 18, 2015 01:39 IST

अहेरी तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर असलेल्या राजारामखांदला ते पत्तीगाव, कोत्तागुड्डम, चेरपल्ली या गावाला

राजारामखांदला : अहेरी तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर असलेल्या राजारामखांदला ते पत्तीगाव, कोत्तागुड्डम, चेरपल्ली या गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे मातीकाम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत करण्यात आले. मात्र पाच वर्षांचा कालावधी उलटूनही या पोचमार्गावर खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना मार्गक्रमन करण्यासाठी यातना सहन कराव्या लागत आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत राजारामखांदला ते चेरपल्ली या ६.५ किमी अंतराच्या पोचमार्गाचे मातीकाम करण्यात आले. मात्र त्यानंतर या मार्गावर खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले नाही. पावसाळ्यात पुराच्या पाण्याने या मार्गावरील पूल वाहून गेले. पुलाचा काही भाग पूर्णत: खचला. त्यामुळे या भागातील २०० च्या वर लोकवस्तीतील नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ताच उरला नाही. परिणामी पावसाळ्याच्या दिवसात या भागातील नागरिकांचा अहेरी तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला होता. रस्त्याच्या सुविधेअभावी पावसाळ्यात या भागातील विद्यार्थी व रूग्णांना काही वेळ बैलबंडीचा आधार घ्यावा लागला. रस्त्याच्या दूरवस्थामुळे वाहन मालक व चालक या मार्गाने वाहन टाकण्यास धजावत नाही. ६.५ किमी अंतराच्या पोचमार्गाचे खडीकरण व डांबरीकरण करून या भागातील नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे नागरिकांनी निवेदनाद्वारे केली होती. चर्चेदरम्यान पालकमंत्र्यांनी रस्ता दुरूस्तीचे आश्वासन दिले होते. मात्र रस्ता दुरूस्तीच्या कामाला सुरूवात झाली नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांचे आश्वासन हवेत विरल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)