शहरं
Join us  
Trending Stories
1
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
2
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
3
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
4
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
5
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
6
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
9
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
10
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
11
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
12
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
13
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
14
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
15
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
16
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
17
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
18
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
19
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
20
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

वनकायद्याच्या कचाट्यात रखडला वडसा-गडचिरोली रेल्वेमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST

परिणामी तीन वर्षांपूर्वी या मार्गाचे सर्व्हेक्षण होऊन केंद्र सरकारकडून रेल्वेमार्गाला मंजुरीही मिळाली. परंतू या मार्गाच्या काही भागातील जंगलात वाघाचे अस्तित्व असल्यामुळे वनकायद्याच्या अडचणी निर्माण झाल्या. त्यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्थानच्या समितीला अहवाल देण्यास सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलप्रभावित, अविकसित गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयाला रेल्वेमार्गाने जोडण्यासाठी वडसा-गडचिरोली या रेल्वेमार्गाला तीन वर्षांपूर्वी केंद्र शासनाने मंजुरी दिली. मात्र प्रत्यक्ष जमीन अधिग्रहणाच्या कामातील वनविभागाचा अडथळा अजूनही दूर झालेला नाही. त्यामुळे या रेल्वेमार्गाचे काम आणखी लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा) हे एकमेव शहर रेल्वेमार्गाने जोडले आहे. औद्योगिक विकासापासून वंचित असलेल्या गडचिरोलीत दळणवळणाच्या सोयी वाढल्यास विकासाला चालना मिळेल म्हणून खासदार अशोक नेते यांनी वडसा-गडचिरोली या ५२ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करून त्याची आवश्यकता शासन दरबारी पटवून दिली.
परिणामी तीन वर्षांपूर्वी या मार्गाचे सर्व्हेक्षण होऊन केंद्र सरकारकडून रेल्वेमार्गाला मंजुरीही मिळाली. परंतू या मार्गाच्या काही भागातील जंगलात वाघाचे अस्तित्व असल्यामुळे वनकायद्याच्या अडचणी निर्माण झाल्या. त्यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्थानच्या समितीला अहवाल देण्यास सांगण्यात आले. मात्र त्यांच्याकडून यासंदर्भातील हालचाली थंडावलेल्या असल्यामुळे या रेल्वेमार्गासाठी लागणाऱ्या जमीन अधिग्रहणाचे काम खोळंबले आहे. यासंदर्भात गेल्या महिन्यात खासदार अशोक नेते यांनी रेल्वे मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली.
केंद्र सरकारने आकांक्षित जिल्हा म्हणून विकासित करावयाच्या देशातील निवडक जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचा समावेश आहे. असे असताना या जिल्ह्याला रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने हालचाली करण्याचे निर्देश देऊन या कामातील अडथळे लवकर दूर करावे, अशी मागणी जिल्हावासियांकडून केली जात आहे.

टॅग्स :railwayरेल्वे