शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

नागपूर विधान भवनावर फडकवणार विदर्भाचा झेंडा, विदर्भ राज्य आंदोलन समितीचा निर्धार !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2018 6:00 PM

विदर्भातील शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्न संपविण्यासाठी आणि विदर्भाचा सर्वांगीन विकास करण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य हा एकमेव पर्याय आहे. असे असताना सरकार या मुद्यावर चाल ढकलपणा करीत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून येत्या १ मे महाराष्ट्र दिनी विदर्भातून हजारो शेतकरी, बेरोजगार, महिलांना घेऊन नागपूर विधान भवनावर विदर्भाचा झेंडा फडकविला जाईल, असा निर्धार विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी येथे व्यक्त केला.

गडचिरोली : विदर्भातील शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्न संपविण्यासाठी आणि विदर्भाचा सर्वांगीन विकास करण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य हा एकमेव पर्याय आहे. असे असताना सरकार या मुद्यावर चाल ढकलपणा करीत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून येत्या १ मे महाराष्ट्र दिनी विदर्भातून हजारो शेतकरी, बेरोजगार, महिलांना घेऊन नागपूर विधान भवनावर विदर्भाचा झेंडा फडकविला जाईल, असा निर्धार विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी येथे व्यक्त केला.समितीच्या वतीने येत्या मार्च, एप्रिल व मे महिन्यात केल्या जाणा-या विविध आंदोलनांची माहिती सोमवारी येथे नेवले व इतर पदाधिका-यांनी दिली. त्यात १ मार्चला शासनाच्या निषेधार्थ बेरोजगारांचे डिग्री जलाओ आंदोलन, तर १६ व १७ एप्रिलला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. त्यात विदर्भ आर्थिकदृष्ट्या कसे सक्षम राज्य राहीले हे पटवून दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. वर्षाला २ कोटी लोकांना रोजगार देऊ असे सांगणा-या सरकारमुळे नोटबंदीनंतर अनेक उद्योग बंद पडून लाखो युवक बेरोजगार झाले. आता आणखी ३० टक्के नोकरकपात करण्याचा सरकारचा मानस आहे. नोक-या कमी करणारे सरकार नवीन नोक-या काय देणार? दुसरीकडे कर्जाचा डोंगर वाढतच आहे. म्हणून विदर्भ राज्य वेगळे करून विदर्भवासियांच्या विकासाचा मार्ग मोकळा करा, अशी मागणी समितीच्या पदाधिका-यांनी सरकारला उद्देशून केली.या पत्रपरिषदेला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे गडचिरोली जिल्हा समन्वयक अरुण मुनघाटे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठाकूर, पश्चिम विदर्भाच्या महिला आघाडी अध्यक्ष रंजना मामर्डे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, सुधाकर नाईक, जगदीश बद्रे, जिल्हा सचिव डॉ.देवीदास मडावी, घिसू पाटील खुणे, सुधाकर डोईजड, प्रतिभा चौधरी, अनिता मडावी, रमेश भुरसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शब्द पाळला नाही तर सत्ता जाईलभाजपने निवडणूक काळात दिलेले विदर्भ राज्याचे आश्वासन पाळण्याची ही वेळ आहे. आज विदर्भातील आमदारसंख्येच्या बळावर राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे राजकीय अडचणीतून भाजप सरकार विदर्भ राज्याचा मुद्दा टोलवत आहे. लगतच्या तेलंगणाच्या निर्मितीसाठीही आंध्रातील काँगे्रस सरकारने विलंब केला आणि दोन्ही राज्यात काँग्रेसला हार पत्करावी लागली. भाजपने शब्द पाळण्यास विलंब लावल्यास भाजपाचीही तीच गत होईल, असा इशारा राम नेवले यांनी दिला.

टॅग्स :nagpurनागपूर