शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींच्या १६५३ जागांसाठी सहा तालुक्यातून अडीच हजारांवर नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 05:00 IST

राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज दाखल करून घेण्यासाठी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मुदत वाढविली. तरीही सर्वच तहसील कार्यालयाबाहेर इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी कायम होती. त्यामुळे त्या सर्वाना आवाराच्या आत घेऊन मुख्य फाटक बंद करण्यात आले. फॉर्म घेण्यासाठी ३ ते ४ ग्रामपंचायत मिळून एक टेबल अशी व्यवस्था केली होती. एकेक उमेदवार संबंधित टेबलवर जाऊन आपला अर्ज देत होता.

ठळक मुद्देअर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची रात्री उशिरापर्यंत झुंबड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात निवडणूक होऊ घातलेल्या जिल्ह्याच्या उत्तर भागातील ६ तालुक्यात नामांकन दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे संबंधित तहसील कार्यालयात एकच गर्दी उसळली. विशेष म्हणजे रात्री ९ वाजताही अर्जांची तपासणी करून ते स्वीकारण्याचे काम सुरूच होते.गडचिरोलीसह देसाईगंज, आरमोरी, धानोरा, कुरखेडा आणि कोरची या तालुक्यांमधील १९९ ग्रामपंचायतमधील १६५३ जागांकरिता सदर नामांकन भरण्यात आले. रात्री ९ वाजेपर्यंत २३७० अर्ज स्वीकारले होते. पूर्ण अर्ज स्वीकारण्यासाठी ११ वाजण्याची शक्यता तलसिल कार्यालयाच्या सुत्रांनी व्यक्त केली.राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज दाखल करून घेण्यासाठी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मुदत वाढविली. तरीही सर्वच तहसील कार्यालयाबाहेर इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी कायम होती. त्यामुळे त्या सर्वाना आवाराच्या आत घेऊन मुख्य फाटक बंद करण्यात आले. फॉर्म घेण्यासाठी ३ ते ४ ग्रामपंचायत मिळून एक टेबल अशी व्यवस्था केली होती. एकेक उमेदवार संबंधित टेबलवर जाऊन आपला अर्ज देत होता. त्या टेबलवरील कर्मचारी अर्जाची तपासणी करून त्यातील त्रृटी काय आहेत त्या सांगून तो अर्ज स्वीकारत होते. त्यासाठी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली होती.विशेष म्हणजे गेल्या चार दिवसात जेवढे अर्ज आले त्यापेक्षा जास्त अर्ज शेवटच्या दिवशी आल्याने रात्री ९ वाजतानंतरही सायंकाळी ५.३० वाजता कार्यालयाच्या आवारात असलेल्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याचे काम सुरूच होते.नामांकन दाखल केलेल्या इच्छुाकांच्या अर्जातील त्रुटी गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या आधी दूर करून अर्ज परिपूर्ण करावे लागणार आहे. 

आज अर्जांची छाननी, १५ ला मतदानपहिल्या टप्प्यासाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होत आहे. यात ६ तालुक्यांचा समावेश आहे. गुरूवारी (दि.३१) सकाळी ११ वाजता अर्जांची छाननी सुरू होईल. त्यात किती अर्ज वैध आणि किती बाद झाले हे निश्चित होईल. त्यानंतर ४ जानेवारीपर्यंत नामांकन मागे घेण्याची मुदत आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजतानंतर रिंगणात कायम असलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक