शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
7
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
8
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
9
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
10
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
11
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
12
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
13
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
14
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
16
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
17
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
18
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
19
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
20
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

गळतीच्या पाण्यावर भागवितात तहान

By admin | Updated: May 14, 2015 01:22 IST

येथील २५ ते ३० वर्षांपूर्वीची नळ पाणीपुरवठा योजना वाढत्या लोकसंख्येला कमी पडत आहे.

वैरागड : येथील २५ ते ३० वर्षांपूर्वीची नळ पाणीपुरवठा योजना वाढत्या लोकसंख्येला कमी पडत आहे. अनेक तांत्रिक त्रुटी असल्यामुळे गावात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. परिणामी अनेक नागरिकांना गळतीच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत असल्याचे वास्तविक चित्र वैरागडात पहायला मिळत आहे.
जुन्या नळ पाणीपुरवठा योजनेत अनेक तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे गावात पाण्याचा असमान पुरवठा सुरू आहे. काही वार्डात नागरिकांना पिण्यासाठीही पाणी मिळत नाही तर अनेक ठिकाणी नळाला पिण्यायोग्य पाणी येत नाही. यामुळे नळ योजनेच्या विहिरीजवळील पाईपलाईनच्या गळतीवर गावकऱ्यांना तहान भागवावी लागत आहे. २६ जानेवारी २०१३ च्या ग्रामसभेत उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेता, नवीन पाणीपुरवठा योजना येथील नदीच्या गोरजाई डोहावर कार्यान्वित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सदर ठराव तत्काळ पेयजल पाणीपुरवठा यंत्रणेकडे पाठविण्याबाबत ग्रामसभेने सूचित केले होते. मात्र स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाने नळ पाणीपुरवठा योजनेचा ठराव पेयजल विभागाकडे पाठविण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लावला.
राष्ट्रीय पेयजल उपविभाग कुरखेडा कार्यालयाच्या अभियंत्याने गावाच्या औद्योगिक व ऐतिहासिक पार्श्वभूमिचा विचार करून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टंचाई कृती आराखडा तयार केला व सदर कृती आराखडा वैरागड ग्राम पंचायत प्रशासनाला पाठविला अशी माहिती आहे. दरम्यान वैरागड ग्राम पंचायतीची सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू झाल्याने नव्या नळ योजनेची प्रशासकीय मान्यता थांबून होती. वैरागड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळ व भोयर यांच्या घरानजीकच्या ग्राम पंचायतीच्या मोकळ्या जागेत वाढीव दोन जलकुंभाचे बांधकाम करण्यात आले. मात्र नळयोजनेच्या विहिरीला जलस्त्रोत कमी असल्याने गावातील पाणीटंचाईची समस्या कायम राहिली.
नळ योजनेच्या विहिरीच्या खालील भागात नदीपात्रात शिवकालीन बंधारा बांधण्यात आला. मात्र सदर बंधाऱ्याचे काम अर्धवट राहिल्याने या शिवकालीन बंधाऱ्याचा पाणीटंचाईच्या समस्येवर काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे वैरागड गावात गेल्या महिनाभरापासून नागरिकांना पाणीटंचाई समस्या भेडसावत आहे. (वार्ताहर)