शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

जिल्ह्यात साडेसहा हजार मेट्रिक टन खताचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:10 IST

रबी हंगाम २०१७-१८ करिता जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कृषी उपसंचालक (खते) कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडे सर्व प्रकारची मिळून एकूण १८ हजार ३०० मेट्रिक खताची मागणी केली आहे.

ठळक मुद्देरबी हंगामासाठी उपलब्ध : टंचाई जाणवणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रबी हंगाम २०१७-१८ करिता जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कृषी उपसंचालक (खते) कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडे सर्व प्रकारची मिळून एकूण १८ हजार ३०० मेट्रिक खताची मागणी केली आहे. यापैकी आतापर्यंत साडेसहा हजार क्विंटल मेट्रिक टन खताचा पुरवठा कृषी आयुक्तालयाकडून गडचिरोली जिल्ह्यात झाला आहे, अशी माहिती जि. प. कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.गडचिरोली जिल्ह्यात रब्बी हंगामात गहू, मक्का, ज्वारी, हरभरा, लाखोळी, मूग, जवस, तीळ, सूर्यफूल, करडई, भूईमूग व वाटाणा आदी प्रकारची पिके घेतली जातात. गडचिरोली जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र २३ हजार ४०० इतके आहे. तर यंदा ३१ हजार ५३१ इतके क्षेत्र प्रस्तावित केले आहे. रब्बी पिकांची पेरणी काही प्रमाणात झाली असून काही भागात सुरू आहे. रब्बी पिकांना खतांचा तुटवडा जाणवू नये, यासाठी जि.प. च्या कृषी विभागाने खरीप हंगामातच नियोजन केले. त्यानुसार कृषी आयुक्तालय कार्यालयाकडे खताची मागणी केली. डीएपी ३ हजार मेट्रिक टन, एमओपी ८०० मेट्रिक टन, एसएसपी ३ हजार ५०० मेट्रिक टन इतक्या खताची मागणी केली आहे. तसेच ५ हजार ५०० खताची मागणी आगाऊ स्वरूपात केली असून आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात साडेसहा हजार मेट्रिक टन इतक्या खताचा पुरवठा झाला आहे.जिल्ह्याच्या बहुतांश कृषी केंद्रात खत उपलब्ध असून त्याची शासकीय दरात पीओएस मशीनने विक्री सुरू आहे.खतांचा वापर वाढलारासायनिक खतांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. खरीप हंगामाबरोबर रबी हंगामातील पिकांनाही रासायनिक खते वापरली जात आहेत. त्यामुळे वर्षभर खतांचा साठा राखून ठेवावा लागतो.