शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

राजे धर्मराव वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे चक्काजाम

By admin | Updated: February 4, 2016 01:19 IST

राज्याच्या आदिवासी विकास विभागाचा कारभार सांभाळणारे राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या संस्थेमार्फत नागेपल्ली ....

आलापल्ली-अहेरी मार्ग रोखला : वसतिगृहातील समस्या सोडविण्यासाठी अम्ब्रीशरावांशी साधला दूरध्वनीवरून संवादअहेरी : राज्याच्या आदिवासी विकास विभागाचा कारभार सांभाळणारे राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या संस्थेमार्फत नागेपल्ली येथे चालविल्या जाणाऱ्या मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात अनेक समस्या असल्याने या समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना अखेर बुधवारी आलापल्ली-अहेरी मार्गावर चक्काजाम आंदोलन करावे लागले. अखेरीस पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्यासोबत दूरध्वनीवर आंदोलक विद्यार्थ्यांनी चर्चा करून आपल्या समस्या त्यांच्या कानी घातल्या.धर्मराव शिक्षण मंडळ अहेरी यांच्यामार्फत अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे राजे धर्मराव मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह चालविले जाते. या वसतिगृहात ३० विद्यार्थी सध्या वास्तव्याला आहेत. हे विद्यार्थी दुर्गम व अतिसंवेदनशील भागातील असून गेल्या काही दिवसांपासून निकृष्ट दर्जाचे जेवण या विद्यार्थ्यांना दिले जात असल्याने या विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून जेवण न घेण्याचा निर्णय घेत उपवास सुरू केला. ३० विद्यार्थी असताना पुरेशे जेवण दिले जात नाही. जेवणाचा दर्जा योग्य नसल्याने व या समस्येवर पालकमंत्र्यासह कुणाकडूनच तोडगा निघण्याची शक्यता दिसत नसल्याने अखेरीस बुधवारी ३० विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग त्यांनी स्वीकारला. भाजीपोळी जेवणासोबत देत नाही. वसतिगृह सुरू झाल्यापासून भाजीपोळी देण्यात आलेली नाही. भाड्याच्या खोलीत अनेक वर्षांपासून हे वसतिगृह सुरू असून स्नानगृह नाही. भांडे खराब झालेल्या अवस्थेत आहे. पिण्यासाठी पाणी विहिरीतून आणावे लागत आहे. ३० विद्यार्थ्यांना पुरेशा खोल्या नाहीत, अशा समस्या आहेत. वसतिगृहात अनेक समस्या असून वसतिगृह अधीक्षक एस. डब्ल्यू. नेहारे यांना याबाबतची माहिती देण्यात आली. परंतु त्यांनी वरिष्ठांकडून योग्य आहार विद्यार्थ्यांना देऊ, एवढेच आश्वासन दिले. हे सर्व विद्यार्थी इयत्ता पाचवी ते दहावीत शिक्षण घेत आहेत. या समस्यांबाबत यापूर्वीही अनेकदा माहिती देण्यात आली. परंतु दुर्लक्ष झाले. यासंदर्भात वसतिगृह व्यवस्थापक ए. डी. वाळके म्हणाले की, वसतिगृहाती विद्यार्थ्यांना यापुढे सोयीसुविधांपासून वंचित ठेवणार नाही, असे सांगितले. (शहर प्रतिनिधी)