शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

१२ वर्षानंतर होणार रस्त्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:13 AM

देसाईगंज तालुक्यातील कुरूड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे व भगदाड पडले होते. या रस्त्याचे बांधकाम व्हावे, यासाठी मागील १२ वर्षांपासून शासन, प्रशासनस्तरावर पाठपुरावा सुरू होता.

ठळक मुद्देनिधी मंजूर : कुरूड मार्गाची दुर्दशा; रस्त्यावर ठिकठिकाणी पडले भगदाड

ऑनलाईन लोकमतदेसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील कुरूड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे व भगदाड पडले होते. या रस्त्याचे बांधकाम व्हावे, यासाठी मागील १२ वर्षांपासून शासन, प्रशासनस्तरावर पाठपुरावा सुरू होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले असून रस्त्याच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाला. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामाचा शुभारंभ जि.प. सदस्य रोशनी पारधी यांच्या हस्ते करण्यात आला.रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाला पं.स. सभापती मोहन गायकवाड, देसाईगंजचे न.प. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, सरपंच मारोती मडावी, कुरखेडा न.पं. चे पाणीपुरवठा सभापती रवींद्र गोटेफोडे, नगरसेवक राजू जेठानी, पं.स. सदस्य अर्चना ढोरे, ग्रा.पं. सदस्य दादाजी भर्रे, ग्रा.पं. सदस्य सुनील पारधी, अभियंता अतुल बगी, विलास गोटेफोडे उपस्थित होते.देसाईगंज-आरमोरी या राज्य महामार्गापासून दोन किमी अंतरावरील रस्त्यावरून पावसात पावसाचे पाणी व ईटियाडोहाच्या नहराचे पाणी वाहत असल्याने अनेक ठिकाणी भगदाड पडले होते. तसेच पिल्लारे यांच्या घराजवळ पडलेल्या खड्ड्यात पाणी साचून राहत असल्याने रस्त्याचा अंदाज येत नव्हता. येथे अनेकदा जीवघेणे अपघातही घडले. यंदाच्या पावसाळ्यात या मार्गाची आणखी स्थिती बिकट झाली. या रस्त्यावर पावसाळ्यात अनेकदा अपघात घडले. सदर रस्ता गावकºयांसाठी धोकादायक ठरू लागला. अखेर या रस्त्याच्या बांधकामासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला. जि.प. सदस्य रोशनी पारधी यांनी पुढाकार घेतल्याने निधी मंजूर झाला.या रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले असून मुख्य राज्य मार्ग ११ ला जोडणाºया रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण व स्लॅब ड्रेनच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केल्या जात आहे.मंजूर निधी दोनदा गेला परतकुरूडच्या रस्त्याची गंभीर स्थिती लक्षात घेऊन तत्कालीन जि.प. बांधकाम सभापती रमाकांत ठेंगरी यांनी २२ लाख रूपये मंजूर करवून बांधकामाला हिरवी झेंडी दाखविली होती. परंतु तथाकथीत राजकारण्यांच्या विरोधामुळे तत्कालीन स्थितीत बांधकाम होऊ शकले नाही. त्यानंतर जि.प. सदस्य रेखा मडावी यांनीही या रस्त्याच्या बांधकामाकरिता प्रयत्न केले होते. तेव्हाही काही राजकारण्यांच्या विरोधामुळे रस्त्याचे बांधकाम होऊ शकले नाही व निधी परत गेला.