गडचिरोली : देशातील नक्षलवादी चळवळीचा कणा समजला जाणारा आणि सुरक्षा यंत्रणांच्या हिटलिस्टवर असलेला सर्वोच्च जहाल नक्षलवादी नेता आणि नक्षल संघटनेचा महासचिव थिप्परी तिरुपती ऊर्फ 'देवजी' याने आपला खंदा समर्थक आणि सीसीएम सदस्य संग्राम याच्यासह तेलंगणा पोलिसांसमोर गुडघे टेकल्याची माहिती आहे. नक्षल चळवळीच्या इतिहासातील हा आतापर्यंतचे हे सर्वोच्च आत्मसमर्पण मानले जात आहे.नक्षल्यांचा सर्वोच्च नेता नेता बसवाराजूच्या खात्म्यानंतर लाल साम्राज्याची संपूर्ण सूत्रे देवजीच्या हातात आली होती. केवळ छत्तीसगडमध्येच त्याच्यावर १.५ कोटी रुपयांचे इनाम आहे, तर संग्रामवर १ कोटींचे बक्षीस आहे. गेल्या चार दशकांपासून पोलिसांना गुंगारा देणारा हा 'मास्टरमाईंड' ढासळत्या प्रकृतीमुळे किंवा संघटनेत सुरू असलेल्या अंतर्गत फुटीमुळे शरण आल्याचे बोलले जात आहे. यास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.नक्षलवादाचा 'काऊंटडाऊन' सुरू!
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्चपूर्वी बस्तर नक्षलमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. याच पार्श्वभूमीवर देवजीचे शरण येणे हा नक्षलींसाठी 'डेथ वॉरंट' ठरू शकतो. एकेकाळी हजारो नक्षलवाद्यांचा वावर असलेल्या बस्तरमध्ये आता जेमतेम २०० सशस्त्र नक्षली उरल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड (MMC) जोडणारा नक्षल्यांचा सुरक्षित मार्ग आता सुरक्षा दलांनी पूर्णपणे विखुरला आहे.कोण आहे हा 'देवजी'?
देवजी हा नक्षलवादी संघटनेच्या 'पॉलिट ब्युरो'चा सदस्य असून तो चळवळीचा मुख्य रणनीतीकार मानला जातो. नक्षलवाद्यांचे आंतरराष्ट्रीय संपर्क, शस्त्रास्त्रांची रसद आणि मोठ्या हल्ल्यांचे नियोजन त्याच्याच इशाऱ्यावर होत असे. तो पोलिसांच्या ताब्यात आल्याने नक्षलवाद्यांच्या आगामी घातपाती कारवायांचा कट उधळून लावण्यात यश आले आहे.
Web Summary : In a major blow to Naxalism, top leader Devji surrendered to Telangana police with a key aide. After Basavaraju's death, Devji controlled operations. His surrender, linked to health or internal strife, signals a 'countdown' for Naxalites, especially with increased security efforts.
Web Summary : नक्सलवाद को बड़ा झटका, शीर्ष नेता देवजी ने एक प्रमुख सहयोगी के साथ तेलंगाना पुलिस के सामने आत्मसमर्पण किया। बसवराजू की मौत के बाद देवजी ने संचालन को नियंत्रित किया। उनका आत्मसमर्पण, स्वास्थ्य या आंतरिक कलह से जुड़ा हुआ, नक्सलियों के लिए एक 'उलटी गिनती' का संकेत देता है, खासकर सुरक्षा प्रयासों में वृद्धि के साथ।