शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

आसरअल्लीवासीयांनी बांधला मुलांच्या शिक्षणाचा सेतू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:23 IST

काेराेनामुळे मागील वर्षीपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये यासाठी वेगवेगळ्या मार्गाने शिक्षण देण्याचा शासन-प्रशासनाचा प्रयत्न असला ...

काेराेनामुळे मागील वर्षीपासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये यासाठी वेगवेगळ्या मार्गाने शिक्षण देण्याचा शासन-प्रशासनाचा प्रयत्न असला तरी तो फसत आहे. ग्रामीण भागातील बहुतांश पालक शेतकरी, कामगार असल्याने ते शेतात व कामावर आपल्या मुलांनाही नेतात. त्यांच्याकडे ॲन्ड्राॅईड मोबाईल नाही, दुर्गम भागात नेटवर्क नाही, अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शिक्षणाचे विशिष्ट उद्दिष्ट साध्य व्हावे, शैक्षणिक नुकसान भरून निघावे यासाठी इयत्ता दुसरी ते दहावीसाठी १ जून ते १४ ऑगस्टपर्यंत ४५ दिवस राबविण्यात येत असलेला ‘सेतू अभ्यासक्रम’ अपयशी ठरत आहे. ही बाब हेरून व विद्यार्थ्यांना याचा लाभ योग्यप्रकारे मिळणार नाही म्हणून ग्रामपंचायत, ग्राम सल्लागार समिती, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आदींनी एकमताने कोविडचे नियम पाळून गटा-गटाने सुरक्षित पद्धतीने विद्यार्थ्यांना शाळेत बाेलाविण्याचा निर्णय घेतला. येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत विद्यार्थी ४५ दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी येत आहेत. ‘आमची शाळा, आमची जबाबदारी, आमचा निर्णय’ याचा अवलंब गावकऱ्यांनी केला आहे. सुरक्षितता म्हणून विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर व इतर वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक खुर्शिद शेख, सरपंच रमेश तैनेनी, उपसरपंच सुधाकर मिसरी, राजू जैनवार, गजानन कलाक्षपवार, ग्रामपंचायत सदस्य सर्वेश्वरराव गुडुरी, तंमुस अध्यक्ष चंद्रशेखर पुलगम, राजू जैनवार, श्रीकांत सुगरवार, सतीश तिरुनगरी, व्यंकना चौधरी, लक्ष्मी अल्लपू, विजय तुमडे, श्रीकांत तोरकरी, रंजीत चिंताकानी, जनार्धन तोगेटी, हेमंत रोड्डावर, श्रीनिवास रंगू आदी सहकार्य करीत आहेत.

बाॅक्स

काेराेनापासून पळू नका तर लढा !

शालेय विद्यार्थ्यांना काेराेना विषाणूचा संसर्ग हाेऊ नये यासाठी मागील वर्षीपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. काेराेनाबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. परंतु कोरोनापासून दूर पळणे हा मार्ग नसून ‘सुरक्षित पद्धतीने लढणे’ हाच खरा उपाय आहे, हे सूत्र आसरअल्लीवासीयांनी अवलंबले. मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गावाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून काैतुक केले जात आहे.