शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

सिरोंचाला जादा बसेसची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 1:30 AM

तेलंगणा-छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने सिरोंचा येथे तेलंगणा राज्यातून येणाऱ्या प्रवासी वाहनांची संख्या वाढली आहे.

ठळक मुद्देआगार निर्माण करण्याची मागणी : तेलंगणातून वर्दळ वाढल्याने प्रवाशांची गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तेलंगणा-छत्तीसगड राज्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने सिरोंचा येथे तेलंगणा राज्यातून येणाऱ्या प्रवासी वाहनांची संख्या वाढली आहे. येथे दररोज हजारो प्रवाशी दाखल होत असल्याने त्यांच्या सुविधेसाठी सिरोंचात बस आगार तसेच जादा तसेच आरामदायी बसेसची आवश्यकता निर्माण झाली आहे.तेलंगणा व छत्तीसगड राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. सदर महामार्ग सिरोंचा तालुक्यातून जाणार आहे. निजामाबाद ते जगदलपूर हा राष्ट्रीय महामार्ग असून या महामार्गावरील इंद्रावती व प्राणहिता नदीवरील पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचले आाहे. शिवाय गोदावरी नदीवरील पूल झाल्याने तेलंगणा राज्यातून सिरोंचात शेकडो बसगाड्या येतात. त्यामुळे सिरोंचा येथे बसेस ठेवण्यासाठी जागा उरत नाही. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी तालुक्यात दौरा करून सिरोंचातील हायटेक बसस्थानकाकरिता पाच कोटी रूपये देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे बसस्थानकाचे काम के व्हा सुरू होणार, याची प्रतीक्षा नागरिकांना आहे.सिरोंचा येथे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व अन्य प्रवाशांची गर्दी राहात असल्याने पासेस व अन्य सुविधांकरिता आगाराची गरज आहे. व्यापाऱ्यांना नागपूर, गडचिरोलीवरून बसने आल्यास प्रवासामुळे बराच त्रास सहन करावा लागतो.बिघाड आल्यास मन:स्तापकाही दिवसांपूर्वी गर्कापेठा जंगलात बसमध्ये बिघाड आल्याने तीन ते चार तास प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. सिरोंचा येथे आगार अथवा जादा बसगाड्या असत्या तर प्रवाशांना तत्काळ सेवा उपलब्ध झाली असती. गडचिरोली व अहेरीपर्यंतचे अंतर अतिशय दूर असल्याने अतिरिक्त बस वेळीच पोहोचत नाही. त्यामुळे बस आगाराची निर्मिती करावी, तसेच सिरोंचा ते नागपूर यामार्गे बससेवा सुरू करावी.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ