शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
3
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
4
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
5
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
6
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
7
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
8
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
9
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
10
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
11
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
12
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
13
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
14
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
15
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
16
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
17
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
18
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
19
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

गट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक सोयीसुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST

एटापल्ली तालुका मुख्यालयापासून ३६ किमी अंतरावर छत्तीसगड सीमेलगत असलेल्या गट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामूळे येथील आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. सदर आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाली असून कित्येक वर्षापासून या इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली नाही.

ठळक मुद्देइमारतीची दुरवस्था । पावसाळ्यात लागते पाणी गळती, रुग्ण व नातेवाईक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील गट्टा येथे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र चालविले जाते. या केंद्राच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचे शासन व प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हे प्राथमिक आरोग्य केंद्र विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक कमालीचे त्रस्त झाले आहेत.एटापल्ली तालुका मुख्यालयापासून ३६ किमी अंतरावर छत्तीसगड सीमेलगत असलेल्या गट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामूळे येथील आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. सदर आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाली असून कित्येक वर्षापासून या इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली नाही. छताची दुर्दशा झाली असल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात या केंद्राला पाणी गळती लागते. इमारत जीर्ण झाली असल्याने पावसाळ्यात येथील रुग्ण व कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुरूस्तीच्या नावावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करून या इमारतीची डागडुजी केली जाते. परंतु हे काम योग्यरित्या होत नसून अर्धवट स्थितीत केल्या जात असल्याने समस्या कायम आहे.येथील कर्मचाºयांच्या निवासस्थानाची सुद्धा अवस्था अतिशय वाईट आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील १५ ते २० गावातील नागरिक औषधोपचारासाठी येत असतात.एटापल्लीच्या रुग्णालयात केले जाते रुग्ण रेफरएटापल्ली येथील रहिवासी असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत गादेवार हे गट्टाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्यालयी राहून प्रामाणिकपणे आरोग्य सेवा देत होते. त्यांना केंद्रात जाणवणाºया आरोग्य समस्येबाबत ते वरिष्ठ अधिकाºयांकडे पाठपुरावा करीत होते. त्यांच्याकडून प्रामाणिक सेवा सुरू असताना अचानकपणे त्यांची येथून इतरत्र बदली करण्यात आली. आता या केंद्रात असणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहून फारशी सेवा देत नाही. परिणामी आदिवासीबहुल दुर्गम भागातील रुग्णांना सोयीसुविधा नसल्याच्या कारणावरून एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात रेफर केले जाते. हे प्रमाण अलिकडे वाढले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल