शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सोन्यात करा गुंतवणूक ! प्रत्येक महिन्याला वाढते किंमत, सराफा बाजार तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 15:11 IST

Gadchiroli : सोने तारण ठेवून काही वेळातच उपलब्ध होते कर्ज

विलास चिलबुले लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे नवनवा उच्चांकी दर गाठला जात आहे. त्यामुळे ग्राहकदेखील सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास मागेपुढे पाहत नसल्याचे चित्र आहे.

भारतात सोने-चांदी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. प्रत्येक घरात थोडे का होईना पण सोन्याचे दागिने असतात. गरजेच्या वेळी हेच सोन्याचे दागिने गहाण ठेवून किंवा मोडून आर्थिक अडचण दूर करता येते. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याला भारतीय प्राधान्य देतात.

आता सोन्याचे भाव प्रतितोळा ८६ हजार रुपये झाले असून, यात गुंतवणूक केली तर भविष्यात १५ टक्के रिटर्न मिळतील, असा अंदाज सराफ बाजाराने व्यक्त केला आहे. १५ टक्के परतावा उद्योग व्यवसायामध्येसुद्धा मिळत नाही. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक योग्य मानली जाते. मात्र सोन्यातील गुंतवणूक अचल असल्याने काही गुंतवणूकदार सोन्यामध्ये फारशी गुंतवणूक करीत नसल्याचे दिसून येते.

सोन्यातील गुंतवणूक नेमकी कशासाठी करावी ?सोन्याची किंमत महागाईप्रमाणे वाढते. बँकेत मिळणारे व्याज आणि चलनवाढ यांचा विचार केल्यास, सोन्यात गुंतवणूक हा एकच गुंतवणूक पर्याय आहे. सोन्यात गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक आहे. 

१५ टक्के भाव वाढले तरी दागिण्यांसाठी खरेदी वाढलीपरतावा सोन्याच्या गुंतवणुकीतून उपलब्ध होते. विशेष म्हणजे, सोन्याच्या गुंतवणुकीत फारशी जोखीम नाही. व्यवस्थापनाची जबाबदारी राहत नाही.

पाच वर्षांत रिटर्न किती?सोन्याने गेल्या पाच वर्षांत तब्बल ११२ टक्क्यांचा परतावा दिला आहे. सध्या लग्नसराईचा काळ सुरू असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात २ आहे. इतकेच नाही तर येत्या काही दिवसांत सोन्याचा दर २० हजार रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचण्याचा अंदाज आहे.

पाच वर्षांतील आकडे ?महिना                     सोने (प्रति तोळा)              चांदी (प्रति किलो)फेब्रुवारी २०२१             ४६,२६०                               ६८,९००फेब्रुवारी २०२२             ५१,२११                                ६४,९५०फेब्रुवारी २०२३             ५६,१७०                               ६३,०००फेब्रुवारी २०२४             ६२,८३०                               ७३,९००फेब्रुवारी २०२५             ८६,२५०                               ९८,५००

"सोने दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. दरवाढीचा फटका सामान्य कुटुंबातील वधू-वर पक्षांना बसला आहे" - अंकुश खरवडे, व्यापारी

"सोन्याच्या वाढत्या भावामुळे सराफा व्यवसायात मोठी मंदी झाली आहे. त्यामुळे सरकारने वाढत्या दरवाढीकडे लक्ष देण्याची गरज आहे."- अक्षय बेहेरे, व्यापारी

टॅग्स :GoldसोनंGadchiroliगडचिरोली