शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णालय आजारी

By admin | Updated: July 27, 2014 00:07 IST

अतिदुर्गम, नक्षल प्रभावित सर्वसामान्य तसेच गोरगरीब नागरिकांसाठी आरोग्य सुविधा पुरविण्याच्या हेतूने अहेरी येथे उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात आले. मात्र या रूग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचे पद

अहेरी उपजिल्हा : रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेवर परिणामअहेरी : अतिदुर्गम, नक्षल प्रभावित सर्वसामान्य तसेच गोरगरीब नागरिकांसाठी आरोग्य सुविधा पुरविण्याच्या हेतूने अहेरी येथे उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात आले. मात्र या रूग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचे पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञाची या रूग्णालयात वानवा आहे. यामुळे वेळेवर आरोग्य तपासणी होत नसल्याचे वास्तव उजेडात आले आहे. यामुळे हे रूग्णालय स्वत:च आजारी असल्याचे दिसून येते.अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यातील अतिदुर्गम भागातून अनेक रूग्ण उपचारासाठी येतात. मात्र या रूग्णालयात पुरेसे डॉक्टर नसल्यामुळे रूग्णांची गैरसोय होताना दिसते. या रूग्णालयात सध्या एक वैद्यकीय अधीक्षक, बालरोग तज्ज्ञ व दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. सद्यस्थितीत या रूग्णालयात बधिरीकरण तज्ज्ञ, भाषक, पूर्णवेळ स्त्रीरोग तज्ज्ञ, नेत्र चिकित्सक, अस्थिरोग तज्ज्ञ, रेडिओलॉयजीस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अधिसेविका व दोन अधिपरिचारिका आदी पदे रिक्त आहेत. यामुळे रूग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कार्यरत डॉक्टरांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. परिणामी त्यांनाही तारेवरची कसरत करून रूग्णांना आरोग्य सेवा द्यावी लागत आहे. या रूग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ नसल्यामुळे मलेरिया, सिकलसेल, हिमोग्लोबीन व इतर रक्ताच्या चाचण्या वेळेवर होत नाही. रूग्णांचे रक्त घेऊन ते परिश्रमासाठी गडचिरोलीला पाठविले जाते. या तपासणीचे रिपोर्ट येण्यासाठी ८ ते १० दिवसाचा कालावधी लागतो. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले असून या आजाराचे रूग्ण मोठ्या संख्या या रूग्णालयात दाखल होत आहेत. दाखल रूग्णांच्या रोगाचे निदान वेळेवर होत नसल्याने येथील रूग्णांची प्रकृती खालावत असल्याचेही दिसून येत आहे. या रूग्णालयातून ऐन वेळेवर रूग्णांना नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली येथे हलविले जात आहे. दूरवरून आलेल्या गरीब रूग्णांकडे पैसे नसल्यामुळे त्यांची अशावेळी चांगलीच पंचाईत होत आहे. पूर्णवेळ बधीरीकरण तज्ज्ञ नसल्यामुळे एखाद्या शस्त्रक्रियेसाठी बराच वेळ जात आहे. या रूग्णालयात पूर्णवेळ स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्यामुळे प्रसूतीसाठी आलेल्या गरोदर महिला रूग्णांचे हेळसांड होत आहे. रिक्त पदे भरून आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी होत आहे.