शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभांचा मोर्चा धानोरा तहसील कार्यालयावर धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:06 IST

विविध मागण्यांसाठी धानोरा तालुक्यातील ग्रामसभांनी तालुका ग्रामसभा महासंघाच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला.

ठळक मुद्देतहसीलदारांनी स्वीकारले निवेदन : पाच हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा मोर्चात सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : विविध मागण्यांसाठी धानोरा तालुक्यातील ग्रामसभांनी तालुका ग्रामसभा महासंघाच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते.मोर्चाचे नेतृत्व आदिवासी सेवक महासंघाचे अध्यक्ष देवाजी तोफा यांनी केले. सदर मोर्चा मॉ दंतेश्वरी मंदिरापासून निघून मुख्य रस्त्याने तहसील कार्यालयावर पोहोचला. या मोर्चात जवळपास पाच हजार नागरिक सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व देवाजी तोफा, बाजीराव नरोटे, जिल्हा परिषद सदस्य लता पुंगाटे, माजी जि.प. सदस्य शांताबाई परसा, देवा कड्यामी, शिवराम उसेंडी, प्रफुल किरंगे, सीताराम उसेंडी, परसराम पदा, दानसू तोफा, देविदास पदा, ईश्वर कुमरे, विलास पोरेटी, मनोहर गुरनुले, गणेश मडावी, गणजू जांगी, प्रकाश कोवे, मनसराम कोवे, महारू परसा, मंगेश आतला, काशीराम नरोटे, मनू धुर्वे, दशरथ पुंगाटे यांनी केले. तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी येऊन निवेदन स्वीकारले. सदर मागण्या शासनाकडे पाठविल्या जातील. तयासाठी तहसील कार्यालयाच्या मार्फतीने पाठपुरवा केला जाईल, असे आश्वासन दिले. उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील, पोलीस निरिक्षक विजय पुराणिक, पीएसआय नावले, पीएसआय मुंडे यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.या मोर्चात धानोरा इलाका, दुधमाळा इलाका, झाडापापडा इलाका, खुटगाव इलाका, जांभळी इलाका, मुरूमगाव इलाका, खांबाडा, सुरसुंडी, रांगी इलाक्यातील नागरिक सहभागी झाले होते.अशा आहेत मागण्याजिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करावा, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, सुरजागड व झेंडेपार प्रकल्प सुरू करण्यापूर्वी शासनाने जैवविविधता व त्यातून मिळणारे नैसर्गिक उत्पन्न किती, या प्रकल्पांमधून स्थानिक नागरिकांना किती रोजगार उपलब्ध होईल याचा विचार करावा, सिंचन पंपांना वीज जोडणी ताबडतोब उपलब्ध करून द्यावी, सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून द्याव्या, पेसा अंतर्गत येणाºया गावातील वर्ग ३ व ४ च्या नोकर भरतीत आरक्षणानुसार स्थानिकांना प्राधान्य द्यावे, जिल्ह्यात यूपीएससी व एमपीएससी प्रशिक्षण केंद्र सुरू करावे, सामुदायीक वैयक्तिक पट्टे सातबारासह द्यावेत, आदिवासी गावांमधून एखाद्याला अटक करताना ग्रामसभेची परवानगी घेणे सक्तीचे करावे आदी मागण्यांचा समावेश आहे.