शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींवरील अन्याय दूर करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:08 IST

जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करण्यात आल्याने ओबीसी प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगारांची रोजगाराची संधी हिरावली गेली. जिल्ह्यात ओबीसींची लोकसंख्या अधिक ...

जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करण्यात आल्याने ओबीसी प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगारांची रोजगाराची संधी हिरावली गेली. जिल्ह्यात ओबीसींची लोकसंख्या अधिक असतानाही आरक्षण कमी करून इतर प्रवर्गांना देण्यात आले. त्यामुळे ओबीसी समाजावर मोठा अन्याय झाला आहे. अशातच पेसा कायदा लागू करण्यात आल्याने गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांतील आदिवासी भागातील वर्ग ३ व ४ च्या पदांची भरती अनुसूचित जमातीतून करण्याचा राज्यपालांचा आदेश असल्याने ही बाबही ओबीसीसाठी अन्यायकारक ठरली आहे. या प्रकरणात तत्कालीन सरकारने समिती गठित केली. मात्र, त्यावर निर्णय झालेला नाही.

सध्या राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारने ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ, मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर सदस्यांचा समावेश असलेली समिती गठित केली आहे. या समितीनेही सहा जिल्ह्यांमध्ये ओबीसींचे कमी केलेले आरक्षण पूर्ववत करण्याचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे. मात्र, हे आरक्षण ५२ टक्क्यांच्यावर जात असल्याने व मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयातून स्थगनादेश मिळाला आहे. मराठा समाज गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांत नगण्य प्रमाणात असून, त्यांना जर आरक्षण मिळाले तर त्यातून किंवा अधिकचे आरक्षण ओबीसी समाजाला वाढवून देण्याचा विचार सरकारने केला असता; परंतु आता आरक्षणवाढीचा विचार थंडबस्त्यात असल्याने गेल्या १५ वर्षांत व आताही ओबीसींच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत.

विद्यमान सरकारने यामध्ये तत्काळ हस्तक्षेप करून पूर्वीप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींचे आरक्षण पूर्ववत केल्यास येथील बेरोजगारांना न्याय मिळेल. यासाठी ओबीसी समाजबांधवांनी २२ फेब्रुवारीच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काॅंग्रेस डॉक्टर सेलचे सरचिटणीस डॉ. प्रमोद साळवे यांनी केले आहे.