शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

ब्रिटीश शासनकाळाची साक्ष देतोय सिरोंचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:15 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर प्राणहिता नदीच्या अगदी तिरावर वसलेला सिरोंचा ब्रिटीश कालावधीतील शासनाचे मुख्य केंद्र होते. ब्रिटीश शासनाच्या अनेक पाऊलखुणा आजही सिरोंचात दिसून येतात. अनेक वर्षापासून विकासापासून दूर असलेल्या या तालुक्यात आता नवीन पुलांमुळे विकासाला गती येण्याची चिन्हं दिसत आहेत.

ठळक मुद्देप्रशासनाचे होते मुख्य केंद्र : दुर्गम भाग मात्र विकासापासून अजूनही वंचितच; सिंचनानंतर शेतीचे क्षेत्र वाढले

कौसर खान।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर प्राणहिता नदीच्या अगदी तिरावर वसलेला सिरोंचा ब्रिटीश कालावधीतील शासनाचे मुख्य केंद्र होते. ब्रिटीश शासनाच्या अनेक पाऊलखुणा आजही सिरोंचात दिसून येतात. अनेक वर्षापासून विकासापासून दूर असलेल्या या तालुक्यात आता नवीन पुलांमुळे विकासाला गती येण्याची चिन्हं दिसत आहेत.तत्कालीन चांदा (चंद्रपूर) जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९ हजार ३१२ चौ.किमी एवढे होते. त्यात सिरोंचा व गडचिरोली हे दोन मुख्य तालुके १८८० पर्यंत अस्तित्वात होते. १९०७ मध्ये चांदा जिल्ह्याचे चांदा, वरोडा, ब्रह्मपुरी, गडचिरोली व सिरोंचा या पाच तालुक्यांमध्ये विभाजन करण्यात आले होते. १९५१ मध्ये औरंगाबाद विभागातील नांदेड जिल्ह्यात असलेला राजुरा तालुका चांदा जिल्ह्याला जोडण्यात आला. त्यानंतर चांदा जिल्ह्यात सहा तालुके निर्माण झाले. १९६१ च्या जनगणनेप्रमाणे या सहा तालुक्यांचे क्षेत्रफळ १९ हजार १२७ चौ.किमी होते. तर लोकसंख्या १२ लाख ३७ हजार ८० एवढी होती. विस्ताराने खूप मोठे तालुके असल्याने १९८० मध्ये या तालुक्यांचे विभाजन करून नवीन १८ तालुके निर्माण करण्यात आले. सिरोंचा तालुक्याची निर्मिती मात्र १८७४ साली ब्रिटीश कालावधीतच झाली. १९०५ मध्ये अहेरी जमिनदारीतील २ हजार ६०३ चौ.मैल क्षेत्र सिरोंचा तालुक्यात समाविष्ट करण्यात आले. ब्रिटीशांच्या कालावधीत सिरोंचा हे प्रशासनाचे मुख्य केंद्र होते. गोदावरी, प्राणहिता नदी पार केल्यानंतर पहिले मोठे गाव सिरोंचा हेच पडत असल्याने ब्रिटीशांनीही अनेक वास्तू सिरोंचात उभारून सिरोंचा शहराला आकार देण्याचा प्रयत्न केला.गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर सिरोंचा तालुक्याचेही विभाजन करण्यात आले. हळूहळू विकासाला गती मिळाली. सिरोंचा तालुक्याचा परिसर गोदावरीचा खोरा म्हणून ओळखल्या जाते. येथील काळ्या कसदार जमिनीत कोणतेही पीक अतिशय चांगल्या पद्धतीने येते. शासनाने सिंचन विहीर, लहान-मोठे तलाव, बोड्यांची निर्मिती केली. त्यामुळे विकासाला गती मिळाली आहे. सिरोंचा तालुका प्रामुख्याने कापूस, धान, मिरची, मका व भाजीपाला या पिकांचे उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे नदीकाठचे शेतकरी बारमाही उत्पादन घेण्यात व्यस्त राहतात.पुलांमुळे विकासाला उभारी येण्याची आशासिरोंचा तालुका गोदावरी नदीने वेढला आहे. हा तालुका जरी गडचिरोली जिल्ह्यात असला तरी येथील संस्कृती, भाषा तेलंगणा राज्याशी बरीच मिळतीजुळती आहे. गोदावरी नदी असल्याने पावसाळ्यात आवागमनास अडचण निर्माण होत होती. नावेने धोकादायक प्रवास करून तेलंगणा गाठावे लागत होते. आता मात्र गोदावरी, प्राणहिता नद्यांवर पुलांचे बांधकाम केले जात आहे. सिरोंचाजवळील पूल बांधून पूर्ण झाला आहे. त्यामुळे वाहतूक सुकर झाली आहे. परिणामी तेलंगणातील नागरिकांसोबत सिरोंचा तालुक्यातील नागरिकांचे व्यवहार वाढले आहेत.