शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

ब्रिटीश शासनकाळाची साक्ष देतोय सिरोंचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:15 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर प्राणहिता नदीच्या अगदी तिरावर वसलेला सिरोंचा ब्रिटीश कालावधीतील शासनाचे मुख्य केंद्र होते. ब्रिटीश शासनाच्या अनेक पाऊलखुणा आजही सिरोंचात दिसून येतात. अनेक वर्षापासून विकासापासून दूर असलेल्या या तालुक्यात आता नवीन पुलांमुळे विकासाला गती येण्याची चिन्हं दिसत आहेत.

ठळक मुद्देप्रशासनाचे होते मुख्य केंद्र : दुर्गम भाग मात्र विकासापासून अजूनही वंचितच; सिंचनानंतर शेतीचे क्षेत्र वाढले

कौसर खान।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर प्राणहिता नदीच्या अगदी तिरावर वसलेला सिरोंचा ब्रिटीश कालावधीतील शासनाचे मुख्य केंद्र होते. ब्रिटीश शासनाच्या अनेक पाऊलखुणा आजही सिरोंचात दिसून येतात. अनेक वर्षापासून विकासापासून दूर असलेल्या या तालुक्यात आता नवीन पुलांमुळे विकासाला गती येण्याची चिन्हं दिसत आहेत.तत्कालीन चांदा (चंद्रपूर) जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९ हजार ३१२ चौ.किमी एवढे होते. त्यात सिरोंचा व गडचिरोली हे दोन मुख्य तालुके १८८० पर्यंत अस्तित्वात होते. १९०७ मध्ये चांदा जिल्ह्याचे चांदा, वरोडा, ब्रह्मपुरी, गडचिरोली व सिरोंचा या पाच तालुक्यांमध्ये विभाजन करण्यात आले होते. १९५१ मध्ये औरंगाबाद विभागातील नांदेड जिल्ह्यात असलेला राजुरा तालुका चांदा जिल्ह्याला जोडण्यात आला. त्यानंतर चांदा जिल्ह्यात सहा तालुके निर्माण झाले. १९६१ च्या जनगणनेप्रमाणे या सहा तालुक्यांचे क्षेत्रफळ १९ हजार १२७ चौ.किमी होते. तर लोकसंख्या १२ लाख ३७ हजार ८० एवढी होती. विस्ताराने खूप मोठे तालुके असल्याने १९८० मध्ये या तालुक्यांचे विभाजन करून नवीन १८ तालुके निर्माण करण्यात आले. सिरोंचा तालुक्याची निर्मिती मात्र १८७४ साली ब्रिटीश कालावधीतच झाली. १९०५ मध्ये अहेरी जमिनदारीतील २ हजार ६०३ चौ.मैल क्षेत्र सिरोंचा तालुक्यात समाविष्ट करण्यात आले. ब्रिटीशांच्या कालावधीत सिरोंचा हे प्रशासनाचे मुख्य केंद्र होते. गोदावरी, प्राणहिता नदी पार केल्यानंतर पहिले मोठे गाव सिरोंचा हेच पडत असल्याने ब्रिटीशांनीही अनेक वास्तू सिरोंचात उभारून सिरोंचा शहराला आकार देण्याचा प्रयत्न केला.गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर सिरोंचा तालुक्याचेही विभाजन करण्यात आले. हळूहळू विकासाला गती मिळाली. सिरोंचा तालुक्याचा परिसर गोदावरीचा खोरा म्हणून ओळखल्या जाते. येथील काळ्या कसदार जमिनीत कोणतेही पीक अतिशय चांगल्या पद्धतीने येते. शासनाने सिंचन विहीर, लहान-मोठे तलाव, बोड्यांची निर्मिती केली. त्यामुळे विकासाला गती मिळाली आहे. सिरोंचा तालुका प्रामुख्याने कापूस, धान, मिरची, मका व भाजीपाला या पिकांचे उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे नदीकाठचे शेतकरी बारमाही उत्पादन घेण्यात व्यस्त राहतात.पुलांमुळे विकासाला उभारी येण्याची आशासिरोंचा तालुका गोदावरी नदीने वेढला आहे. हा तालुका जरी गडचिरोली जिल्ह्यात असला तरी येथील संस्कृती, भाषा तेलंगणा राज्याशी बरीच मिळतीजुळती आहे. गोदावरी नदी असल्याने पावसाळ्यात आवागमनास अडचण निर्माण होत होती. नावेने धोकादायक प्रवास करून तेलंगणा गाठावे लागत होते. आता मात्र गोदावरी, प्राणहिता नद्यांवर पुलांचे बांधकाम केले जात आहे. सिरोंचाजवळील पूल बांधून पूर्ण झाला आहे. त्यामुळे वाहतूक सुकर झाली आहे. परिणामी तेलंगणातील नागरिकांसोबत सिरोंचा तालुक्यातील नागरिकांचे व्यवहार वाढले आहेत.