शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

गडचिरोलीत मातीच्या कच्च्या झोपडीत भरते शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 13:56 IST

नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात इतर समस्यांप्रमाणेच शिक्षणाची समस्याही गंभीर आहे.

ठळक मुद्देअनुदान फुल्ल मात्र विद्यार्थी आणि सुविधा गुलदुर्गम भागात शिक्षणाची दुरवस्था

रवी रामगुंडेवार ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात इतर समस्यांप्रमाणेच शिक्षणाची समस्याही गंभीर आहे. दुर्गम भागात शासनाचे पूर्ण अनुदान लाटूनही शिक्षणाच्या नावाने कशी बोंबाबोंब आहे याचा प्रत्यय येमली येथील एका शाळेतील स्थितीवरून येतो. एटापल्ली तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या येमली येथे स्वामी विवेकानंदांच्या नावाने असलेल्या हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाला पक्की इमारत आणि भौतिक सुविधा तर नाहीच, पण विद्यार्थी व शिक्षकसुद्धा गायब राहतात.लोकमतने शनिवारी (दि.२४) या शाळेची प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेक आश्चर्यकारक बाबी समोर आल्या. प्रबोधिनी बहुउद्देशीय शैक्षणिक मंडळ गडचिरोलीद्वारा संचालित येमली येथील विवेकानंद हायस्कूल २००१ मध्ये सुरू झाले. शासनाने २००७ मध्ये अवघ्या पाच वर्षात या शाळेला १०० टक्के अनुदान लागू केले. मात्र या शाळेत आज कुठल्याही सुविधा नाहीत. मातीच्या कच्च्या झोपडीत शाळा भरविली जाते. सदर शाळेत अनेक भौतिक सुविधांचा अभाव आहे. सदर प्रतिनिधी शाळेला भेट दिली त्यावेळी १०६ विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी हजर नव्हते.शाळेला आज १८ वर्ष पूर्ण झाली तरी संबंधित संस्थेने शाळेसाठी स्वतंत्र इमारत बांधली नाही. अवघ्या तीन खोल्यांमध्ये शाळा भरत आहे. सदर शाळेत शौचालय व मूत्रीघरसुद्धा नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नावालाही नाही. शाळा खोलीतच कचऱ्याचे साम्राज्य दिसून आले. खर्रा खाऊन घाण केल्याचेही या शाळेच्या वर्गखोलीत होते. यावरून शाळेची शिस्त काय आहे हे स्पष्ट होते.सदर शाळेत इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत ५९ विद्यार्थीसंख्या आहे. तर अकरावी व बारावी या दोन वर्गाची मिळून ४७ विद्यार्थीसंख्या आहे. शनिवारी ११.४५ वाजता शाळेची एक वर्गखोली उघडी होती. तीन खोल्या कुलूपबंद होत्या. शनिवारी सकाळी ७.३० ते १०.४० पर्यंत शाळा होती. त्यामुळे शिक्षक घरी गेल्याचे तेथे काही वेळानंतर आलेल्या शिपायाने सांगितले. माध्यमिक शाळा आटोपल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी येतात. पण एकही विद्यार्थी तिथे उपस्थित नव्हता. हे कनिष्ठ महाविद्यालय कायम विनाअनुदानित तत्वावर असल्याने येथे उच्च माध्यमिक शिक्षकाचे एकही पद भरण्यात आले नाही. केवळ तासिका तत्वावरील एक शिक्षक देण्यात आला असून सदर शिक्षकही कधी येतो तर कधी शाळेत येत नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी लोकमतला दिली.काही ग्रामस्थांनी शिक्षक प्रभूदास झाडे यांना बोलवून आणल्यानंतर त्यांनी आज एकही विद्यार्थी शाळेत आला नसल्याचे सांगितले. सदर शाळेला एक मुख्याध्यापक, चार माध्यमिक शिक्षक, एक लिपीक, एक प्रयोगशाळा परिचर, तीन शिपाई अशा एकूण १० कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली आहे. विद्यार्थी आणि शिक्षकच जर गायब राहात असेल तर शाळेचा कारभार केवळ शासनाचा पगार लाटण्यासाठी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.सदर शाळेचा भोंगळ कारभार पाहता, या शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याचे दिसून येते. मात्र या गंभीर प्रकाराकडे माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकाºयांचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. सदर शाळेत संबंधित संस्थेने विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण सुविधा द्याव्या, अन्यथा शाळेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गडचिरोलीवरून चालतो कारभारविवेकानंद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत माध्यमिक शिक्षक प्रभूदास झाडे हे शाळेच्या गावी येमली येथे निवासी राहून आपले कर्तव्य बजावतात. मात्र इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एटापल्ली तालुका मुख्यालयावरून येमली येथे अप-डाऊन करतात, असे ग्रामस्थांनी सांगितले.

सदर शाळा संस्थेच्या अध्यक्ष शशिकला संभाजी बागेसर यांचा मुलगा मिलिंद बागेसर हे या शाळेत प्रयोगशाळा परिचर पदावर कार्यरत आहे. ते गडचिरोली येथे राहतात. शाळेत नियमित येत नाही. विशेष म्हणजे, गडचिरोली येथे राहून ते सदर शाळेचा कारभार पाहतात, अशी माहिती येमलीवासीयांनी सदर प्रतिनिधीला दिली.येमली येथील सदर शाळेला आपण यापूर्वी भेट दिली आहे. त्यावेळी या शाळेची स्थिती व्यवस्थित दिसली नाही. सदर शाळेत अनेक सोयीसुविधांचा अभाव दिसून आला. सदर शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांना शाळेची स्थिती सुधारण्याबाबत सूचना दिली होती. जर संस्थेने अद्यापही शाळेच्या व्यवस्थेत सुधारणा केली नसेल तर या शाळेचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात येईल.- एन. डी. कोकडे, प्रभारी गटशिक्षणाधिकारीपंचायत समिती, एटापल्ली

 

 

 

टॅग्स :Schoolशाळा