शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
4
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
5
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
9
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
10
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
11
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
12
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
13
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
14
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
15
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
16
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
17
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
18
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
19
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी: भाजप, काँग्रेसकडून बी फॉर्मचे वाटप; तीन-चार दिवसांत उमेदवारही ठरणार
20
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ

गडचिरोलीत मातीच्या कच्च्या झोपडीत भरते शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 13:56 IST

नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात इतर समस्यांप्रमाणेच शिक्षणाची समस्याही गंभीर आहे.

ठळक मुद्देअनुदान फुल्ल मात्र विद्यार्थी आणि सुविधा गुलदुर्गम भागात शिक्षणाची दुरवस्था

रवी रामगुंडेवार ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात इतर समस्यांप्रमाणेच शिक्षणाची समस्याही गंभीर आहे. दुर्गम भागात शासनाचे पूर्ण अनुदान लाटूनही शिक्षणाच्या नावाने कशी बोंबाबोंब आहे याचा प्रत्यय येमली येथील एका शाळेतील स्थितीवरून येतो. एटापल्ली तालुका मुख्यालयापासून १५ किमी अंतरावर असलेल्या येमली येथे स्वामी विवेकानंदांच्या नावाने असलेल्या हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाला पक्की इमारत आणि भौतिक सुविधा तर नाहीच, पण विद्यार्थी व शिक्षकसुद्धा गायब राहतात.लोकमतने शनिवारी (दि.२४) या शाळेची प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेक आश्चर्यकारक बाबी समोर आल्या. प्रबोधिनी बहुउद्देशीय शैक्षणिक मंडळ गडचिरोलीद्वारा संचालित येमली येथील विवेकानंद हायस्कूल २००१ मध्ये सुरू झाले. शासनाने २००७ मध्ये अवघ्या पाच वर्षात या शाळेला १०० टक्के अनुदान लागू केले. मात्र या शाळेत आज कुठल्याही सुविधा नाहीत. मातीच्या कच्च्या झोपडीत शाळा भरविली जाते. सदर शाळेत अनेक भौतिक सुविधांचा अभाव आहे. सदर प्रतिनिधी शाळेला भेट दिली त्यावेळी १०६ विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी हजर नव्हते.शाळेला आज १८ वर्ष पूर्ण झाली तरी संबंधित संस्थेने शाळेसाठी स्वतंत्र इमारत बांधली नाही. अवघ्या तीन खोल्यांमध्ये शाळा भरत आहे. सदर शाळेत शौचालय व मूत्रीघरसुद्धा नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नावालाही नाही. शाळा खोलीतच कचऱ्याचे साम्राज्य दिसून आले. खर्रा खाऊन घाण केल्याचेही या शाळेच्या वर्गखोलीत होते. यावरून शाळेची शिस्त काय आहे हे स्पष्ट होते.सदर शाळेत इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत ५९ विद्यार्थीसंख्या आहे. तर अकरावी व बारावी या दोन वर्गाची मिळून ४७ विद्यार्थीसंख्या आहे. शनिवारी ११.४५ वाजता शाळेची एक वर्गखोली उघडी होती. तीन खोल्या कुलूपबंद होत्या. शनिवारी सकाळी ७.३० ते १०.४० पर्यंत शाळा होती. त्यामुळे शिक्षक घरी गेल्याचे तेथे काही वेळानंतर आलेल्या शिपायाने सांगितले. माध्यमिक शाळा आटोपल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी येतात. पण एकही विद्यार्थी तिथे उपस्थित नव्हता. हे कनिष्ठ महाविद्यालय कायम विनाअनुदानित तत्वावर असल्याने येथे उच्च माध्यमिक शिक्षकाचे एकही पद भरण्यात आले नाही. केवळ तासिका तत्वावरील एक शिक्षक देण्यात आला असून सदर शिक्षकही कधी येतो तर कधी शाळेत येत नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी लोकमतला दिली.काही ग्रामस्थांनी शिक्षक प्रभूदास झाडे यांना बोलवून आणल्यानंतर त्यांनी आज एकही विद्यार्थी शाळेत आला नसल्याचे सांगितले. सदर शाळेला एक मुख्याध्यापक, चार माध्यमिक शिक्षक, एक लिपीक, एक प्रयोगशाळा परिचर, तीन शिपाई अशा एकूण १० कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली आहे. विद्यार्थी आणि शिक्षकच जर गायब राहात असेल तर शाळेचा कारभार केवळ शासनाचा पगार लाटण्यासाठी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.सदर शाळेचा भोंगळ कारभार पाहता, या शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याचे दिसून येते. मात्र या गंभीर प्रकाराकडे माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकाºयांचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. सदर शाळेत संबंधित संस्थेने विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण सुविधा द्याव्या, अन्यथा शाळेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गडचिरोलीवरून चालतो कारभारविवेकानंद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत माध्यमिक शिक्षक प्रभूदास झाडे हे शाळेच्या गावी येमली येथे निवासी राहून आपले कर्तव्य बजावतात. मात्र इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एटापल्ली तालुका मुख्यालयावरून येमली येथे अप-डाऊन करतात, असे ग्रामस्थांनी सांगितले.

सदर शाळा संस्थेच्या अध्यक्ष शशिकला संभाजी बागेसर यांचा मुलगा मिलिंद बागेसर हे या शाळेत प्रयोगशाळा परिचर पदावर कार्यरत आहे. ते गडचिरोली येथे राहतात. शाळेत नियमित येत नाही. विशेष म्हणजे, गडचिरोली येथे राहून ते सदर शाळेचा कारभार पाहतात, अशी माहिती येमलीवासीयांनी सदर प्रतिनिधीला दिली.येमली येथील सदर शाळेला आपण यापूर्वी भेट दिली आहे. त्यावेळी या शाळेची स्थिती व्यवस्थित दिसली नाही. सदर शाळेत अनेक सोयीसुविधांचा अभाव दिसून आला. सदर शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांना शाळेची स्थिती सुधारण्याबाबत सूचना दिली होती. जर संस्थेने अद्यापही शाळेच्या व्यवस्थेत सुधारणा केली नसेल तर या शाळेचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात येईल.- एन. डी. कोकडे, प्रभारी गटशिक्षणाधिकारीपंचायत समिती, एटापल्ली

 

 

 

टॅग्स :Schoolशाळा