शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे साडेतेरा लाखांचा तोटा

By admin | Updated: September 10, 2014 23:40 IST

जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नाला फटका बसला. गडचिरोली व अहेरी आगाराच्या अनेक बसफेऱ्या बंद राहिल्यामुळे जवळपास १३ लाख ५० हजार

गडचिरोली : जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नाला फटका बसला. गडचिरोली व अहेरी आगाराच्या अनेक बसफेऱ्या बंद राहिल्यामुळे जवळपास १३ लाख ५० हजार रूपयांचा तोटा दोन्ही बस आगाराला सहन करावा लागला. जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दुर्गम भागासह शहरी भागातीलही अनेक मार्ग तीन ते चार दिवस बंद होते. या भागातील वाहतूक पूर्णत: ठप्पच होती. त्यामुळे गडचिरोली आगाराचे अंदाजे ३ लाख ५१ हजार रूपये तर अहेरी आगाराला १० लाख रूपयांचा तोटा सहन करावा लागला. गडचिरोली-नागपूर मार्गावरील कठाणी नदीला पूर आल्याने रविवारपासून सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे नागपूरमार्गे जाणाऱ्या अनेक बसेस बंद होत्या. या मार्गावरील एकूण ४४ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. यात गडचिरोलीवरून २२ तर नागपूरवरून येणाऱ्या २२ बसफेऱ्यांचा समावेश होता. गडचिरोली-अहेरी, गडचिरोली- कुरखेडा मार्गावरील अनेक नाल्यांवरील पुलांवरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. या मार्गावरील १३ बसफेऱ्या रद्द झाल्याची माहिती आहे. ३१ आॅगस्ट रोजी एम. एच. ४० एन ९३८१ ही बस गडचिरोली-अहेरी- आसरअल्ली मार्गे गेली होती. मात्र सिरोंचा-अंकिसा मार्गावरील येर्रावागू नाल्यावरील पूल वाहून गेल्याने तब्बल १० दिवसांपासून सदर बस आसरअल्ली येथील पोेलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली आहे. अहेरी आगारातील ४० हजार किमीच्या बसफेऱ्या रद्द करावे लागल्याने आगाराचे तब्बल १० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. रस्ता वाहून गेल्याने अहेरी आगाराची आसरअल्ली- रेगुंठा बस मागील तीन ते चार दिवसांपासून अडकली आहे. अहेरी- भामरागड-कोठी, अहेरी-देवलमरी, अहेरी-गट्टा, अहेरी-आसरअल्ली, अहेरी-झिंगानूर या मार्गावरील बसेस पुरामुळे बंद आहेत. अहेरी-देवलमरी मार्ग मंगळवारपर्यंत बंदच होता. या मार्गावरील पुलाचे मधले खांब तुटल्याने आगारामार्फत या मार्गे बस सुरू करण्यात आली नाही. मागील एक वर्षापासून सदर पुलाची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांनी लावून धरली होती. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने या मार्गावरील पुलाच्या दुरूस्तीचा प्रश्न अजुनही प्रलंबितच आहे. अहेरी-बामणपल्ली हे २० किमीचे अंतर पार करण्यासाठी तब्बल दीड तासांचा कालावधी लागत असल्याने एसटी महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे. एकूणच रस्ते व पुरामुळे बस आगाराला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.