शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्यामुळे आजारांची भीती

By admin | Updated: July 23, 2014 23:37 IST

मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहे. कोरड्या पडलेल्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसाळ्यात आजाराची

गडचिरोली : मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहत आहे. कोरड्या पडलेल्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसाळ्यात आजाराची लागण होऊ नये व नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायत, नगर पालिका प्रशासनाने तशा उपाययोजनाही आखल्या आहेत. मात्र गर्दीचे ठिकाण असलेल्या बस स्थानक, रेल्वे स्थानक व रुग्णालय येथे पिण्याचे शुध्द पाणी मिळत नसल्याने साथीच्या आजारांची भीती बळावली आहे. पावसाळ्यात विविध आजारांची लागण होत असते. यात साथीचा आजार हा पाण्याच्या माध्यमातून होत असतो. या आजारावर खबरदारी म्हणून तशा उपाययोजनाही आरोग्य विभागाने आखल्या आहेत. पावसाळ्यात पाणी उकळून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. परंतु सर्वाधिक गर्दीचे सार्वजनिक ठिकाण असलेल्या बसस्थानक, रेल्वे स्थानक, व रुग्णालयात शुध्द पिण्याचे पाणी मिळणे कठीणच झाले आहे. येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र टाकीची नियमीत सफाई केली जात नाही. टाक्या स्वच्छ ठेवल्या जात नाही. पाणी शुध्द करण्यासाठी केलेल्या उपाययोजना अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे कुचकामी ठरत आहेत. गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसाठी व रुग्णांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु काही ठिकाणी घाण पसरली आहे. रुग्णालयाच्या छतावर पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. परंतु या टाक्यांची नियमीत स्वच्छता केली जात नाही. तर रूग्णालय परिसरात असलेल्या सिमेंटच्या टाक्याजवळही घाण पसरली आहे. येथील घाण स्वच्छ करण्याकडे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्षच होत आहे. येथील एसटी आगारातही प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन देण्यात आली आहे. मात्र येथे सुध्दा शुध्द पाणी प्यायला मिळेल याची शाश्वती नाही. हीच स्थिती देसाईगंज येथील रेल्वे स्थानकाची आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्थानक असलेल्या देसाईगंज स्थानकावर पाण्यासाठी प्रवाशांच्या नेहमीच तक्रारी झाल्या आहेत. दिवसभरात या स्थानकावरुन हजारो प्रवाशी जात असतात. येथे असलेल्या पाण्याच्या टाक्या इंग्रजकाळात बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे टाक्यांची स्वच्छता करून शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)