शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

अधिकच्या वीज बिलाने शेतकरी चक्रावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 5:00 AM

काेंढाळा परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे सिंचन विहिरीत आहेत. या शेतकऱ्यांनी विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी माेटारपम्प बसविले आहेत. धानपिकाला पाणी देण्याबराेबरच काही शेतकरी भाजीपाला व रबी हंगामातील काही पिकांची लागवड करतात. शेतकऱ्यांना तीन महिन्याला वीज बिल पाठविले जात हाेते. तीन महिन्यांचे वीज सरासरी दाेन हजार रुपये राहत हाेते.

ठळक मुद्देकाेंढाळातील शेतकऱ्यांना महावितरणचा शाॅक : अनेकांना ३० हजार रुपयांपेक्षा जास्त बिल

  नितेश पाटील लाेकमत न्यूज नेटवर्ककुरूड : देसाईगंज तालुक्यातील काेंढाळा परिसरातील अनेक शेतकऱ्यांना कृषिपम्पाचे वार्षिक वीज बिल ३० हजार रुपयांपेक्षा अधिकचे पाठविले आहे. एवढे माेेठे वीज बिल बघून शेतकऱ्यांना धक्काच पाेहाेचला आहे. काेंढाळा परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे सिंचन विहिरीत आहेत. या शेतकऱ्यांनी विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी माेटारपम्प बसविले आहेत. धानपिकाला पाणी देण्याबराेबरच काही शेतकरी भाजीपाला व रबी हंगामातील काही पिकांची लागवड करतात. शेतकऱ्यांना तीन महिन्याला वीज बिल पाठविले जात हाेते. तीन महिन्यांचे वीज सरासरी दाेन हजार रुपये राहत हाेते. मात्र महावितरणने २०२० या वर्षात एकदाही शेतकऱ्यांना बिल पाठविले नाही. नाेव्हेंबर महिन्यात अनेक शेतकऱ्यांना वर्षभराचे वीज बिल मिळाले आहे. हे वीज बिल ३० हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. एवढ्या माेठ्या प्रमाणात आलेले वीज बिल बघून शेतकरी थक्क झाले आहेत.दाेन महिन्यांपूर्वी वैनगंगेच्या पुराचे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शिरले. त्यामुळे वीज मीटर बंद पडून वीज पुरवठा खंडीत झाला हाेता. तेव्हापासून शेतकऱ्यांनी माेटारपंपाचा वापर सुद्धा केला नाही. तरीही सुमारे ३० हजार रुपयांचे वीज बिल पाठविण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांचे वार्षिक निव्वळ उत्पन्न ३० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. अशा स्थितीत अधिकचे वीज बिल पाठविले असल्याने वीज बिल भरावे, कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. काेंढाळा येथील शेतकरी सायत्राबाई वाढई यांना २९ हजार ३४० रुपये, दत्तू तुपट यांना ३३ हजार १२० रुपयांचे वीज बिल पाठविण्यात आले आहे. अचानक एवढ्या माेठ्याप्रमाणात आलेले वीज बिल बघून वाढई आश्चर्यचकीत झाले आहेत.  

अंदाजाने पाठविले बिल

दाेन महिन्यांपूर्वी वैनगंगा नदीला पूर आला या पुरात अनेक शेतकऱ्यांच्या वीज मीटरमध्ये पाणी शिरून वीज मीटर बंद पडले. हे मीटर अजूनही बंदच आहेत. असे असतानाही सुमारे ३० हजार रुपयांचे वीज बिल पाठविले आहे. यावरून महावितरणने अंदाजे वीज बिल पाठविल्याचे स्पष्ट हाेत आहे. या अंदाजीत बिलांचा माेठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. प्रत्यक्ष शेतात जाऊन वीज मीटरची पाहणी करूनच वीज बिल पाठविणे आवश्यक आहे. मात्र महावितरणचे कर्मचारी शेतात न जाताच वीज बिल पाठवित आहेत.

आपल्या तीन महिन्यांचे सरासरी दाेन हजार रुपये बिल पाठविले जात हाेते. विजेच्या वापराएवढेच हे बिल असल्याने भरण्यात काेणतीही अडचण जात नव्हती. मात्र महावितरणने अचानक ३३ हजार रुपयांचे वीज बिल पाठविले आहे. एवढे माेठे विज बिल भरणे शक्य नाही. महावितरणचे कर्मचारी शेतांवर न जाताच अंदाजे वीज बिल पाठवितात. याची झळ शेतकऱ्यांना सहन करावी लागते. - दत्तू तुपट, शेतकरी, काेंढाळा

टॅग्स :Farmerशेतकरीelectricityवीज