शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
7
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
8
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
9
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
10
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
11
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
12
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
13
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
14
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
16
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
17
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
18
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
19
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
20
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

विकासावर दोन हजार कोटींचा खर्च

By admin | Updated: May 11, 2015 01:19 IST

राज्य व केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या विविध योजनांवर २०१४- १५ या आर्थिक वर्षात सुमारे दोन हजार १६ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.

गडचिरोली : राज्य व केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या विविध योजनांवर २०१४- १५ या आर्थिक वर्षात सुमारे दोन हजार १६ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.
शासनाकडून कल्याणकारी राज्याची अपेक्षा केली जात असल्याने राज्य व केंद्र शासनाकडून दुर्बल, गरीब, अपंग यासाठी शेकडो योजना राबविल्या जातात. त्याचबरोबर सामान्य जनतेसाठी आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज आदी सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून केला जातो. योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शेकडो अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या वेतनापोटीही शासनाला दरवर्षी शेकडो कोटी रूपयांचा खर्च करावा लागतो.
गडचिरोली जिल्हा आदिवासी बहुल व नक्षलप्रभावीत आहे. येथील नागरिकांचे उत्पन्न इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असल्याने या जिल्ह्यासाठी केंद्र शासनाकडून विशेष निधी उपलब्ध करून दिल्या जाते. २०१४- १५ या वर्षात संपूर्ण योजना, प्रशासन यांच्यावर सुमारे दोन हजार १६ कोटी रूपयांचा खर्च झाला आहे. लोकसंख्येचा विचार केला तर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात अधिक खर्च असल्याचे दिसून येते.
खर्चाच्या आघाडीत गडचिरोली जिल्हा आघाडीवर असला तरी पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नाही. त्यामुळे झालेला खर्च केवळ कागदावरच दाखविला जातो की काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. अजूनही शेकडो गावांपर्यंत रस्ते पोहोचले नाहीत. स्वातंत्र्यांचे ६० वर्ष उलटूनही अनेक गावकऱ्यांनी विजेचा प्रकाश घरी बघितला नाही. पुलांचे बांधकाम झाले नसल्याने पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटतो, अशी विपरीत परिस्थिती बघायला मिळत आहे. (नगर प्रतिनिधी)
४गडचिरोली जिल्ह्यात खासगी रूग्णालयांची संख्या मर्यादित असल्याने येथील नागरिकांना सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरच अवलंबून राहावे लागते. त्याचबरोबर अनेक गरीब नागरिक खासगी रूग्णालयात उपचार घेऊ शकत नाही. शासनाकडून रूग्णालय चालविण्याबरोबरच आरोग्य शिबिर घेणे, फायलेरिया, मलेरिया रोगाच्या नियंत्रणासाठी नियमितपणे फवारणी करणे यासारखे उपक्रम राबविते. त्याचबरोबर रूग्णालयात आलेल्या रूग्णावर मोफत औषधोपचार केले जातात. त्याचाही खर्च शासनाला उचलावा लागते. मागील वर्षात सार्वजनिक आरोग्यावर सुमारे १०४ कोटी रूपये खर्च झाले आहेत.