शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

राखीव जंगल क्षेत्रावर अतिक्रमण भारी

By admin | Updated: October 1, 2015 01:41 IST

वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने देसाईगंज वनपरिक्षेत्रातील विहीरगाव, शिरपूर व शिवराजपूर बिटात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू आहे.

वन विभागाचे दुर्लक्ष : विहीरगाव, शिरपूर व शिवराजपूर बिटात अवैध वृक्षतोडदेसाईगंज : वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने देसाईगंज वनपरिक्षेत्रातील विहीरगाव, शिरपूर व शिवराजपूर बिटात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू आहे. तसेच शेतजमिनीसाठी असलेल्या राखीव जंगल क्षेत्रावर अतिक्रमण करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने सपाटीकरण करून शेती क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. या परिसरात ५० हून अधिक सायकलस्वार उभ्या जंगलाची तोड करीत असल्याने या भागातील जंगल नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र याकडे वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.शिवराजपूर-फरी व विहीरगाव-मोहटोला-शिरपूर या मार्गावरील जंगल एकेकाळी घनदाट होते. मात्र शिवराजपूर ते फरी व विहीरगाव, मोहटोला परिसरात काही शेतकऱ्यांनी जंगल काबीज करून वनजमिनीचे सपाटीकरण करण्याचा सपाटा सुरू केला आहे. सपाटीकरण झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी या जमिनीत खरीप व रबी पिके घेण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस या भागातील राखीव जंगल क्षेत्रावर अतिक्रमण वाढतच चालले आहे. या क्षेत्रातील राखीव जमिनीवर पिढीजात कुणाचीही मालकी नसताना अनेक शेतकऱ्यांनी जंगलाची तोड करून शेतजमिनी काढण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. याशिवाय शहराच्या ठिकाणी जळाऊ लाकडे विकण्याचा व्यवसाय या भागातील दोन ते तीन गावातील नागरिकांनी सायकलद्वारे सुरू केला आहे. विहीरगाव-शिरपूर बिटात अशा लोकांचा धूमाकुळ असल्याने जंगल नष्ट होऊन वन विभागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. मागील काही वर्षांपासून अनेक लाकूडतोड्याचे तांडेच्या तांडे या जंगल परिसरात दररोज जात असल्याने या भागातील जंगल संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत हा सारा प्रकार सुरू आहे. मात्र वन विभागाचे कर्मचारी कोणतीही कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे. शिवराजपूर-विहीरगाव परिसरात अतिक्रमण व अवैध लाकूडतोड करून लाकडे विकण्याचा धंदा करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे. राखीव जंगल क्षेत्रावर अतिक्रमण करण्याचा प्रकार जिल्हाभरात सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)वन समित्या उरल्या नाममात्रचजंगलाचे संरक्षण व संवर्धन व्हावे, अवैध वृक्षतोडीवर नियंत्रण राहावे, या हेतूने शासनाच्या निर्देशानुसार वन विभागाने प्रत्येक बिटात वनव्यवस्थापन समित्या गठित केल्या आहेत. या समित्यांमध्ये गावातील स्थानिक नागरिकांचा सहभाग आहे. मात्र विहीरगाव, शिरपूर, शिवराजपूर या बिटात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड व राखीव जंगल क्षेत्रावर अतिक्रमण सुरू असताना या समित्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून कोणतीच कारवाई होत नाही. तसेच सदर प्रकार रोखण्यासाठी कुठलेही प्रयत्न होताना दिसून येत नाही. एकूणच या भागातील वनव्यवस्थापन समित्या नाममात्रच असल्याचे स्पष्ट होते. वनजमिनी लगतच्या क्षेत्रात काही लाभार्थ्यांना वनजमिनीचे पट्टे देण्यात आले होते. त्यांना दिलेले क्षेत्र हे जीपीएस मशिनद्वारे तपासण्यात येईल, संबंधित पट्टेधारकांकडून या संदर्भाचे कागदपत्र मागवून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, या चौकशीत दोषी आढळल्यास संबंधीतांवर कायदेशिर कारवाई करणार.- एन. डी. चांदेवार, वनपरिक्षेत्राधिकारी, देसाईगंज