शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

धान मळणीचा शेवट गोड करणारी संजोरी झाली लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 6:00 AM

विसाव्या शतकातील आठव्या दशकापर्यंत आजच्यासारखी अवघ्या काही तासात कापणी-मळणी करून धानरास घरी पोहचविणारी अत्याधुनिक यंत्रे नव्हती. परिणामी अनेक दिवस धानपिकाची मळणी चालायची. अशावेळी शेतातील धानाचे झालेले उत्पादन आणि झालेल्या श्रमातून मुक्तता यांचा आनंद म्हणून साजरा करण्याचा, शेतातल्या खऱ्यावरचा अन्नग्रहणाचा उत्सव म्हणजे संजोरी.

ठळक मुद्देसंडे अँकर । यंत्राच्या वापराने शेतमजुरांचे अस्तित्व धोक्यात; मळणीच्या श्रमातून मुक्त झाल्याच्या आनंदात केले जात होते सामूहिक जेवण

अतुल बुराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : विसाव्या शतकातील आठव्या दशकापर्यंत आजच्यासारखी अवघ्या काही तासात कापणी-मळणी करून धानरास घरी पोहचविणारी अत्याधुनिक यंत्रे नव्हती. परिणामी अनेक दिवस धानपिकाची मळणी चालायची. अशावेळी शेतातील धानाचे झालेले उत्पादन आणि झालेल्या श्रमातून मुक्तता यांचा आनंद म्हणून साजरा करण्याचा, शेतातल्या खऱ्यावरचा अन्नग्रहणाचा उत्सव म्हणजे संजोरी. ही संजोरी गेल्या २० वर्षांपूर्वीपर्यंत शेतशिवारातील हरएक शेतात अगदी मजेत आयोजित होत असे. मात्र आता मानवनिर्मित तंत्रयुक्त वेगवान यंत्रांचा कृषी क्षेत्रात सुद्धा शिरकाव झाल्याने खऱ्यावरची धानपिक मळणी आणि मळणीचा शेवट अतीव गोड करणाºया संजोरीची अस्सल गावरान मजा काळाच्या ओघात लुप्त झाली आहे.धानाचे पीक परिपक्व झाल्यानंतर बळीराजाला धानपिक कापणी-मळणीची उत्सुकता लागायचे. धानकापणी सुरू झाल्यावर काहीच दिवसांत बांधणी करून धान पुंजणे रचले जात. इथून धानपीक शेतीचा अगदी शेवटचा पर्व प्रारंभ व्हायचा. खऱ्याच्या मध्यभागी एक लाकडी मेळ गाडल्या जात असे. त्या मेळाला दोर बांधून तो पहिल्या बैलाच्या गळ्यातील दोर दुसऱ्या बैलाच्या गळ्यात असे सलग ९ ते १० बैल बांधले जात, त्यालाच बैलाची पात म्हणत. फार पूर्वीपासूनच बैल हा शेतातल्या श्रमाचा राजा. बैलांची पात तयार करून खºयावर टाकलेल्या धानाच्या पिकावर तासनतास चालवले जात. बैलांच्या खूरांनी धानाची मळणी होत असे. बैलांच्या पातीने अनेक वर्षे धानपिक मळणी चालली. काही दिवसानंतर बैलांची पात मागे पडून बैलाच्या जोडीला मागे लाकडी बेलन बांधून धानपीक मळणी सुरू झाली. ही पद्धत पण काही वर्षेच कायम होती. तासनतास मळणी झाल्यावर खºयावरची तणस लाकडी आकोडीने बाहेर काढून धानाचे ठिग तयार करत. या धानाच्या ठिगांना झाडीबोलीत मंदन म्हटले जात असे. आणि पहाटे पहाटे उठून सुपात घेऊन हवेच्या दिशेने हे मंदनातील धान उडवले जात. त्यामुळे धानातील कचरा उडून धानरास तयार करत. धानरास म्हणजे साफसूफ केलेले धान. धानरास ही अख्ख्या हंगामाची कमाई म्हणून त्याची देखभाल आणि रक्षण अगदी डोळ्यात तेल घालून करण्यात येत असे.बैलबंडी वापरून धानरास घरापर्यंत आणल्या जाई. यादरम्यान शेतीमालक पुरुष आणि त्याच्या घरची पुरुष मंडळी आणि पुरुष मजूर या सर्वांचा मुक्काम शेतात रहायचा. धानपिकाच्या मळणीचे काम पूर्ण झाल्यानंतर केला जाणारा सामुहिक मांसाहारी जेवण म्हणजे, संजोरी होय. या जेवणाला मित्र वा आप्त सुद्धा यायचे. ही मजा आज वयाची साठी पूर्ण केलेल्या हरएक शेतकऱ्यांनी अनुभवली आहे.मिनी हार्वेस्टरने कापणी व बांधणी धोक्यातकापणी, बांधणीचे काम आजपर्यंत मजुरांच्या सहाय्याने केले जात होते. कापणीसाठी काही प्रमाणात ट्रॅक्टरचा वापर केला जात होता. मात्र बांधणीचे कामे मजुरांच्या मार्फतच केली जात होती. आता कापण्याबरोबरच तेव्हाच्या तेव्हा कापलेले धान मळणी करणारे यंत्र विकसीत झाले आहे. याला हार्वेस्टर असे संबोधले जात होते. हार्वेस्टरची किंमत जवळपास ५० लाख रुपये असल्याने ते खरेदी केले जात नव्हते. आता मिनी हार्वेस्टर उपलबध आहे. याची किंमत जवळपास १५ लाख रुपये आहे. काही शेतकºयांनी व बचत गटांनी सदर हार्वेस्टर खरेदी केले आहे. त्यामुळे आता मजुरांमार्फत कापणी व बांधणीही संपणार आहे.ट्रॅक्टर ठरले बहुउपयोगी यंत्र१९५४ च्या जवळपास विसोरा आणि आजूबाजूच्या परिसरात ट्रॅक्टर आला. ट्रॅक्टर हा शेतकºयासाठी ठरलेला बहुउपयोगी यंत्र आहे. या ट्रॅक्टरने बैलजोडी, बैलबंडी, नागर, तिफन, वखर, फण आदी पारंपारिक यंत्रांची जागा घेतली आहे. ही सर्व यंत्रे ट्रॅक्टरला लावता येतात. या यंत्रांचा वापर करून शेतीची कामे केली जात आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर हा शेतकऱ्यांसाठी बहुउपयोगी यंत्र ठरला आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी