शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

‘महात्मा’च्या कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांचा पगार मिळाला

By admin | Updated: March 10, 2015 23:59 IST

शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आलापल्ली गावातून रातोरात गायब झालेल्या महात्मा गांधी कॉलेजने मागील आठ महिन्यांपासून थकविलेला पगार अखेर कर्मचाऱ्यांना अदा केला.

दणका लोकमतचाप्रशांत ठेपाले आलापल्लीशिष्यवृत्ती घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आलापल्ली गावातून रातोरात गायब झालेल्या महात्मा गांधी कॉलेजने मागील आठ महिन्यांपासून थकविलेला पगार अखेर कर्मचाऱ्यांना अदा केला. गडचिरोली जिल्ह्यात शिष्यवृत्ती घोटाळा उजेडात आला आहे. या शिष्यवृत्ती घोटाळ्याची अहेरी व भामरागड प्रकल्प कार्यालयांतर्गतही चौकशी सुरू झाली आहे. अहेरी प्रकल्पाचे चौकशी पथक महात्मा गांधी कॉलेज आलापल्ली येथे पोहोचले. त्यावेळी कॉलेजचा सारा गाशा गुंडाळलेला होता. कॉलेजने येथून रातोरात पलायन केल्याची बातमी लोकमतने सर्व प्रथम प्रकाशित केली. या बातमीत या कॉलेजमध्ये काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचे मागील आठ महिन्यांपासूनचे वेतनही देण्यात आले नाही, असेही नमूद केले होते.त्यानंतर या महाविद्यालयाच्या संचालकाने आपल्या जवळचा व्यक्ती ९ मार्च रोजी सोमवारला सायंकाळी ५ वाजता आलापल्ली येथे पाठवून चारही कर्मचाऱ्यांचे ७० हजार रूपयाचे नगदी वेतन अदा केले. लोकमतने आम्हाला वेतन काढून देण्यासाठी तत्परतेने मदत केली, अशी भावना या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच ज्या विजय गुप्ता यांच्या घरी हे महाविद्यालय सुरू होते, त्यांनाही आॅगस्ट २०१४ पासूनचे भाडे मिळालेले नाही. त्यांनाही सोमवारी या संस्थाचालकच्या जवळच्या व्यक्तीने हिशोब विचारला. त्यामुळे आपल्यालाही भाडे मिळेल, असा विश्वास गुप्ता यांनी व्यक्त केला आहे. महाविद्यालय अचानकच गायब झाल्यामुळे आलापल्लीत प्रचंड खळबळ उडाली होती.