शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने घरांच्या पडझडीची मदत रखडली

By admin | Updated: March 8, 2017 02:17 IST

पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आरमोरी तालुक्यातील २५२ च्या वर नागरिकांचे नुकसान झाले आहे.

निवेदन : आनंदराव गेडाम यांच्यातर्फे पाठपुरावा आरमोरी : पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आरमोरी तालुक्यातील २५२ च्या वर नागरिकांचे नुकसान झाले आहे. मात्र या आपातग्रस्तांना सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही अजूनही आर्थिक मदत मिळाली नाही. शासनस्तरावर पाठपुरावा करून आपातग्रस्तांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी माजी आ. आनंदराव गेडाम यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. मागील वर्षी आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा, पळसगाव, पाथरगोटा, कुऱ्हाडी, पिसेवडधा, कोरेगाव, डार्ली, नरचुली गावातील नागरिकांची घरे कोसळली होती. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे शेतीचेही नुकसान झाले होते. याबाबतची माहिती महसूल विभागाला दिल्यानंतर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबतचे पंचनामे केले होते व आर्थिक मदत देण्याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविला होता. मात्र सात महिन्यांचा कालावधी उलटूनही अजूनही आर्थिक मदत देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. मार्चपूर्वी शासनाकडून आर्थिक मदत मिळाल्यास शेतकऱ्याने जे पीक कर्ज घेतले आहे, ते परत करण्यास मदत होईल. त्यामुळे मदतीची रक्कम तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी माजी आ. आनंदराव गेडाम यांच्यासह आनंदराव आकरे, दिलीप घोडाम उपस्थित होते.