शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वन व कृषी संस्कृतीचा विकास व्हावा

By admin | Updated: February 26, 2017 01:46 IST

ज्या ठिकाणी कापसाची शेती आहे, अशाच भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिक झाल्या आहेत.

अभय बंग : तिसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलन गडचिरोली : ज्या ठिकाणी कापसाची शेती आहे, अशाच भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिक झाल्या आहेत. त्या तुलनेत धान उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी आहेत. कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या एकरूप व्हाव्या यासाठी शेतकरी नेते शरद जोशींनी प्रयत्न केले. औद्योगिक संस्कृती व तंत्रज्ञान संस्कृतीचा विकास झाला. मात्र वनसंस्कृती व कृषी संस्कृतीचा फारसा विकास झाला नाही. परिणामी शेतकरी आत्महत्या वाढल्या. शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी वन व कृषी संस्कृतीचा व्हावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाज सेवक डॉ. अभय बंग यांनी केले. अखिल भारतीय तिसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा येथील संस्कृती सभागृहातील युगात्मा शरद जोशी साहित्य नगरीत शनिवारी थाटात पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यीक प्रा. डॉ. शेषराव मोहिते होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समीक्षक डॉ. किशोर सानप, शेतकरी नेते तथा माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, काकासाहेब गडकरी, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, संमेलनाचे कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, देवराव पाटील म्हशाखेत्री, शालिक पाटील नाकाडे, ईश्वर मत्ते, अरविंद बोरकर, अशोक गडकरी आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. बंग म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गेली ३० वर्ष सातत्याने आंदोलन झाले. मात्र आंदोलनाचा मार्ग जेव्हा अवरूध्द होतो तेव्हा त्या-त्या आंदोलनाची पुनरावृत्ती होते. आंदोलनाला यश मिळण्यासाठी मार्ग बदलविणे गरजेचे आहे. पुनरावृत्ती टाळली पाहिजे. शेतकरी आंदोलनाला आत्मपरीक्षणाची गरज आहे, असे डॉ. बंग म्हणाले. डॉ. शेषराव मोहिते म्हणाले, १९९० सालानंतर आपण आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले. तेव्हापासून सभोवतालच्या बदलाचा वेगही वाढला. मात्र या बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये निर्माण होणार नाही, अशीच आर्थिक धोरण राहिली. खुलीकरण आले ते उद्योगधंद्याच्या व माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात. शेती क्षेत्रात खुलीकरण आलेच नाही. विकासाच्या प्रक्रियेतील अपरिहार्य ेटप्पा म्हणून खुलीकरण स्वीकारण्यात आले. मात्र राज्यकर्ते कोणत्याही पक्षाचे अन् विचारसरणीचे असोत त्यांनी या खुल्या अर्थव्यवस्थेचा शिरकाव शेती व्यवसायात होऊच दिला नाही. यातून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे, असे डॉ. मोहिते म्हणाले. संमेलनाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, संचालन प्रा. मनिषा रिठे यांनी केले. सदर कार्यक्रमात आम्ही लटिके ना बोलू, कंसातील माणसं, माझी गझल निराळी या पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी) गझलेतून शेतकरी जीवनाचे वास्तव मांडले सदर साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात शेतकरी गझल मुशायराचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ईश्वर मत्ते, विनय मिरासे, श्रीनिवास गेडाम यांच्यासह अनेक कवींनी गझल सादर करून शेतकऱ्यांच्या वेदना, दु:ख व जीवनातील खरे वास्तव मांडले.