शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव परिसरात रानगव्यांकडून पिकांची नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:44 IST

देसाईगंज : तालुक्यातील पिंपळगाव (ह.) परिसरात रानगव्यांचा वावर आहे. रानगव्यांकडून शेतातील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान केले जात असल्याने शेतकरी ...

देसाईगंज : तालुक्यातील पिंपळगाव (ह.) परिसरात रानगव्यांचा वावर आहे. रानगव्यांकडून शेतातील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान केले जात असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. वन विभागाने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

वडसा वन विभागांतर्गत येणाऱ्या पिंपळगाव (ह.) परिसरात घनदाट जंगल असून जंगलात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा वावर आहे. वन्य प्राणी लगतच्या शेतात शिरून धुडगूस घालत असल्याने उभ्या पिकांची नासधूस हाेत आहे. या जंगल परिसरात एकूण ८ रानगवे आहेत. याशिवाय हिंस्र प्राण्यांचा वावरसुद्धा आहे. जंगल सीमेवर ताराचे कुंपण अथवा योग्य उपाययोजना करण्यात न आल्याने वन्य प्राण्यांच्या संचारामुळे शेतातील उभ्या पिकाचे संरक्षण करणेही अलीकडे अवघड होऊ लागले आहे. वडसा वन विभागाने या गंभीर बाबीची दखल घेऊन हैदोस घालणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या. तसेच परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे लवकर करून भरपाईसाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठवावे, अशी मागणी पिंपळगावातील शेतकऱ्यांनी केली आहे.

बाॅक्स

हिंस्र प्राण्यांमुळे शेतकऱ्यांना धाेका

देसाईगंज तालुक्यातील पिंपळगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती जंगलाला लागून आहे. जंगलाच्या रस्त्यानेच शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. परिसरातील जंगलात विविध हिंस्र प्राण्यांचा वावर आहे. सध्या कडधान्य पिकांची काढणी सुरू आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांनी मका, मिरची व रबी धानाची लागवड केली आहे. त्यामुळे शेतकरी शेतात जातात. शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांवर कोणत्याही क्षणी वन्य प्राणी हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीवितहानी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.