शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

दहावीच्या कल चाचणीची डेडलाईन १८ जानेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 5:00 AM

महाराष्ट्रराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कल व अभिक्षमता चाचणी आयोजित करण्यात आली आहे. या चाचणीची सुरूवात २७ डिसेंबर २०१९ पासून शाळास्तरावर करण्यात आली आहे. १८ जानेवारी २०२० पर्यंत ही कल व अभिक्षमता चाचणी सर्व शाळांना आटोपून घ्यावयाची आहे. तसे शिक्षण मंडळाचे निर्देश आहेत. मार्च २०२० मध्ये राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा देणाऱ्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना कल व अभिक्षमता चाचणी देणे आवश्यक आहे. सदर चाचणी ही मोबाईल व कम्पुटरद्वारे घेतली जात आहे.

ठळक मुद्देशिक्षण मंडळाचे निर्देश : जिल्ह्यातील १५ हजार ५४९ विद्यार्थी देताहेत परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्रराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कल व अभिक्षमता चाचणी आयोजित करण्यात आली आहे. या चाचणीची सुरूवात २७ डिसेंबर २०१९ पासून शाळास्तरावर करण्यात आली आहे. १८ जानेवारी २०२० पर्यंत ही कल व अभिक्षमता चाचणी सर्व शाळांना आटोपून घ्यावयाची आहे. तसे शिक्षण मंडळाचे निर्देश आहेत.मार्च २०२० मध्ये राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा देणाऱ्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना कल व अभिक्षमता चाचणी देणे आवश्यक आहे. सदर चाचणी ही मोबाईल व कम्पुटरद्वारे घेतली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात यंदाच्या शैक्षणिक सत्रात इयत्ता दहावीचे एकूण १५ हजार ५४९ विद्यार्थी आहेत. हे सर्व विद्यार्थी कल व अभिक्षमता चाचणीत सहभागी होत आहेत. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या पुढाकाराने आणि श्यामची आई फाऊंडेशनच्या सहकार्याने ही कलचाचणी घेण्यात येत आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या शेवटच्या पेपरच्या दिवशी विद्यार्थ्यांनी दिलेल्या कल चाचणीचा अहवाल देण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या आवडीचे क्षेत्र, त्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी, त्या क्षेत्रातील उच्च शिक्षण व शिक्षण संस्थांची माहिती याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. संस्थेचे विभाग प्रमुख संभाजी भोजने, पुनित मातकर, सुनील उंदीरवाडे, प्रभाकर साखरे हे जबाबदारी सांभाळत आहेत.सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्या- पाटीलशिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना कल व अभिक्षमता चाचणीत सहभागी करून घेण्याची जबाबदारी संबंधित शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांचा या चाचणीत सहभागी करून भविष्यातील त्यांचा उच्च शिक्षणाचा मार्ग प्रशस्त करावा, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनी केले आहे.आतापर्यंत सात हजार विद्यार्थ्यांनी दिली कलचाचणीगडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळांच्या इयत्ता दहावीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कल व अभिक्षमता चाचणी घेतली जात आहे. जिल्ह्यात २७ डिसेंबर २०१९ पासून ही चाचणी शाळांमध्ये सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत इयत्ता दहावीच्या सात हजार विद्यार्थ्यांनी ही कलचाचणी दिली आहे. या परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ४५ आहे. उर्वरित ५५ टक्के विद्यार्थ्यांची कलचाचणी शाळास्तरावर सुरू आहे. शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक या चाचणीच्या कामात गेल्या चार-पाच दिवसांपासून व्यस्त आहेत. विद्यार्थ्यांमधील अभिक्षमता तपासणीसाठी व त्याचा कला जाणून घेण्यासाठी शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांची चाचणी घेतली जात आहे.

 

 

टॅग्स :Studentविद्यार्थी