शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळांना नवसंजीवनी

By admin | Updated: July 21, 2014 00:11 IST

नागरिकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने महामंडळ स्थापन केले. मात्र या महामंडळांकडे दरवर्षीच निधीची चणचण राहत असल्याने ही महामंडळे केवळ नावापुर्ती उरली होती.

पाच मागासवर्गीय महामंडळ : शासनाकडून २५८ कोटींची हमीगडचिरोली : नागरिकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने महामंडळ स्थापन केले. मात्र या महामंडळांकडे दरवर्षीच निधीची चणचण राहत असल्याने ही महामंडळे केवळ नावापुर्ती उरली होती. या महामंडळांना २५७ कोटी ९२ लाख रूपयांची हमी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे या महामंडळांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.शासनाने महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ, लोकशाहीर अन्नाभाऊ साठे, संत रोहीदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळ, वसंतराव नाईक, विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग विकास महामंडळ हे पाच विकास महामंडळ स्थापन केले. या महामंडळाच्यावतीने नागरिकांना रोजगार करण्यासाठी विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिले जात होते. अगदी सुरूवातीला या महामंडळांचा कारभार अत्यंत चांगल्या पध्दतीने सुरू होता. दिलेल्या कर्जाची वेळेवर वसुली होत नसल्याने महामंडळाकडे असलेले भांडवल कमी होऊ लागले. त्याचबरोबर या महामंडळांना शासनाकडून मिळणारी आर्थिक मदतही जवळपास बंद झाली होती. महामंडळामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतनही निघणे कठीण झाले आहे. महामंडळाकडून दिल्या जाणाऱ्या बहुतांश कर्जांवर कोणत्याही प्रकारचे अनुदान दिले जात नाही. त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँक व सहकारी बँकांकडूनही कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. परिणामी महामंडळांकडून कर्ज घेण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. या महामंडळांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असतानाच पाचही महामंडळांना एकूण २५७ कोटी ९२ लाख रूपयाची हमी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याचा लाभ ३५ हजार मागास वर्गीय लाभार्थ्यांना होणार आहे. यामध्ये महात्मा फुले, मागासवर्ग विकास महामंडळास ६७ कोटी ५७ लाख रूपये, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळास ६० कोटी ५० लाख रूपये, संत रोहीदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळास ३१ कोटी १५ लाख रूपये, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळास २८ कोटी २० लाख रूपये व महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग महामंडळास ७० कोटी ५० लाख रूपयाची हमी देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या कर्जास शासनाकडून हमी देण्यात येणार आहे. त्यामुळे महामंडळांना कर्ज देण्याचा मार्ग थोडाफार सुलभ झाला असून आजपर्यंत ठप्प पडलेल्या व्यवहारांना थोडीफार गती मिळणार आहे. (नगर प्रतिनिधी)