शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गामुळे व्यावसायिक धास्तावले

By admin | Updated: February 4, 2016 01:35 IST

गडचिरोली येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यालय स्थापन करून चार महामार्गांना केंद्र सरकारकडून हिरवी झेंडी देण्यात आली आहे.

चार मार्गांना मंजुरी : शहरातून किती जागा लागणार याविषयी संभ्रम गडचिरोली : गडचिरोली येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यालय स्थापन करून चार महामार्गांना केंद्र सरकारकडून हिरवी झेंडी देण्यात आली आहे. या महामार्गाचे काम लवकरच सुरू होईल, अशी शक्यता असून हे महामार्ग तालुका मुख्यालय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी किती लांबी, रूंदीचे राहतील, याविषयी नागरिक, व्यावसायिक यांच्यामध्ये प्रचंड संभ्रमाची स्थिती आहे. या महामार्गाच्या निर्मितीसाठी अनेक दुकान, घरे यांची तोडफोड करावी लागणार असल्याचेही सांगण्यात येत असल्याने व्यावसायिकांसाठी परिस्थिती गंभीरच आहे. गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुके असून जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ४१२ चौ.किमी आहे. जिल्ह्याचे आठ तालुके नक्षलग्रस्त भागात मोडणारे असून या भागात रस्ते उभारणीचे काम करताना माओवादी चळवळीचा प्रचंड विरोध राहत आला आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने नक्षलग्रस्त भागात रस्ते व पूल विकासासाठी धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. एकट्या गडचिरोली-चिमूर या नक्षलग्रस्त लोकसभा क्षेत्रात चार राष्ट्रीय महामार्ग मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यात ३६६.५० किमीचे चार राष्ट्रीय महामार्ग निर्माण होणार आहे. ३६३ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग सिरोंचा-कालेश्वर ते राष्ट्रीय महामार्ग क्र. १६३ ला जोडणारा आहे. याची लांबी गडचिरोली जिल्ह्यात केवळ सात किमी राहणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ (सी) साकोली-लाखांदूर-वडसा-आरमोरी-गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-रेपनपल्ली-सिरोंचापर्यंत जाणार असून याची लांबी जिल्ह्यात २६९ किमी आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ (डी) नागपूर-उमरेड-नागभिड-ब्रह्मपुरी-आरमोरी येथे येऊन तो राष्ट्रीय महामार्ग ३५३ (सी) ला जोडणार आहे. या व्यतिरिक्त राष्ट्रीय महामार्ग क्र. ९३० करंजी-वणी-घुग्घुस-चंद्रपूर-मुल-सावली-गडचिरोली-धानोरा-मुरूमगाव-छत्तीसगड राज्यात प्रवेश करणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ (डी) पासून उमरेड-भिसी-चिमूर-वरोरा ते चंद्रपूर-नागपूर या महामार्गाला जोडणार आहे. याशिवाय ब्रह्मपुरी ते वडसा-कुरखेडा-कोरची ते देवरी-आमगाव-गोंदियापर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित असून २०१६ मध्ये या महामार्गाच्या कामाला मंजुरी मिळणार आहे. या सर्व महामार्गांचे काम मार्गी लावण्यासाठी गडचिरोली येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यालयसुद्धा स्थापन करण्यात आले आहे. हे सारे राष्ट्रीय महामार्ग तालुका मुख्यालयाच्या व जिल्हा मुख्यालयाच्या गावातून न नेता ते बायपास मार्ग न्यावे, अशी मागणी नागरिकांनी लोकप्रतिनिधी व सरकारकडे केली आहे. काहींच्या मते शहरात राष्ट्रीय महामार्ग ८० फूट लांबीचे राहणार असल्याने गडचिरोली, देसाईगंज, अहेरी आदी ठिकाणी मार्गावर येणाऱ्या घरांवर व दुकानांवर बुलडोजर चालवावा लागेल. तर काही नागरिक हा महामार्ग बायपास जाणार असल्याचे सांगत आहेत. याविषयी लोकप्रतिनिधींकडेही स्पष्ट अशी माहिती असल्याचे दिसून येत नाही. वन जमिनी ज्या भागात येतात. त्या भागात जमिनीचे क्लियरन्स झाल्याशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण काम हाती घेत नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. बायपास मार्ग रस्ता नेल्यास कामाचे अंदाजपत्रकही वाढते. ही बाब लक्षात घेऊन हे महामार्ग गावातूनच जाण्याची शक्यता अधिक प्रमाणात आहे. अलिकडेच देसाईगंज व आरमोरी येथे जनसुनावणी बैठक घेण्यात आली. त्यातही महामार्ग गावातून वा बायपास मार्ग नेण्याबाबत नागरिकांमध्ये दोन मतप्रवाह दिसून आले. शेतकऱ्यांच्या शेत जमिनी जाणार असल्याने मार्ग गावातून न्यावा, अशी मागणीही करण्यात आली. एकूणच राष्ट्रीय महामार्गाबाबत प्रचंड संभ्रमावस्था असल्याने नेमका मार्ग कुठून जाणार, याबाबत लोकप्रतिनिधी व नागरिकांना अद्याप काहीही स्पष्ट माहिती नाही. राष्ट्रीय महामार्ग १६० फूट रूंदीचे राहणार असल्याने जिल्ह्यातील अनेक गावे व शहरांमध्ये विद्यमान रस्त्याला लागून असलेले अनेक अतिक्रमण व अधिकृत, अनाधिकृत इमारती पाडल्या जाणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)देसाईगंजवर दुहेरी संकटदेसाईगंज शहरातून राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. याशिवाय रेल्वे मार्गही जाणार असल्याने या दोघांसाठीही मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावे लागणार आहे. दोन्ही प्रशासनाकडून जमिनीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे लाईनच्या बाजुला मोठी जागा पुन्हा लागणार आहे. त्यामुळे येथे व्यावसायिक व नागरिक यांच्या जागांवर प्रशासनाचा हातोडा पडणार आहे.