शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापक भरतीत संवर्गनिहाय आरक्षण लागू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:31 IST

गडचिराेली : राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयातील शिक्षकीय पदभरतीमध्ये केंद्र शासनाने ८ मार्च २०१९ रोजी लागू केलेला संवर्गनिहाय ...

गडचिराेली : राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयातील शिक्षकीय पदभरतीमध्ये केंद्र शासनाने ८ मार्च २०१९ रोजी लागू केलेला संवर्गनिहाय आरक्षण कायदा २०१९ ची अंमलबजावणी महाराष्ट्रात लवकरच करण्यात येणार असून यासंदर्भात सात ते आठ दिवसात शासन निर्णय निर्गमित होणार असल्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाला दिली.

गाेंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी ना. सावंत गुरुवारी गडचिराेली येथे आले हाेते. यावेळी ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. त्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयातील शिक्षकीय (प्राध्यापक) पदभरतीमध्ये २५ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयाद्वारे विषयनिहाय आरक्षण लागू आहे. त्यानुसार शिक्षक पदभरती होत आहे. विषयनिहाय आरक्षणामुळे मागास प्रवर्गातील ओबीसी, एनटी, व्हीजे, एसबीसी, ईडब्ल्यूएस पात्रताधारकांना आरक्षण धोरणानुसार प्रतिनिधित्व मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड अन्याय होत आहे. याप्रकरणी २४ ऑगस्ट २०१५ चा शासन निर्णय रद्द करून केंद्र सरकारने लागू केलेला संवर्गनिहाय शिक्षक भरती कायदा २०१९ महाराष्ट्रात लागू करावा आणि विद्यापीठ व महाविद्यालय एकक मानून संवर्गनिहाय आरक्षण निश्‍चिती करून पदभरती नव्याने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, सिनेट सदस्य ॲड. गाेविंद भेंडारकर उपस्थित हाेते.

===Photopath===

070221\07gad_1_07022021_30.jpg

===Caption===

ना.उदय सामंत यांच्याशी चर्चा करताना प्रा. शेषराव येलेकर, ॲड.गाेविंद भेंडारकर.