शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

अहेरीत भाजप पहिल्यांदाच वाढली

By admin | Updated: February 28, 2017 00:48 IST

गडचिरोली जिल्ह्यात अहेरी विधानसभा क्षेत्रात भाजपची ताकद १० हजार मतांच्या आतच होती.

चार जागा मिळाल्या : अम्ब्रीशराव आत्राम यांच्या परिश्रमाचे फळगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात अहेरी विधानसभा क्षेत्रात भाजपची ताकद १० हजार मतांच्या आतच होती. आतापर्यंतच्या अनेक निवडणुका भाजप केवळ दखलपात्र ठरण्यासाठी येथे उमेदवार उभे केले जात होते. मात्र यशाची कुठलीही अपेक्षा न बाळगता हा कार्यक्रम राबविला जात होता. भाजपचे दिवंगत नेते जोगाजी मडावी, बाजीराव कुुमरे हे अनेकवेळा विधानसभेच्या निवडणुका लढले. मात्र त्यांच्या यश पदरात आले नाही.२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर नाविसचे केंद्रीय अध्यक्ष अम्ब्रीशराव आत्राम यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे या भागात भाजपची ताकद वाढली. अम्ब्रीशराव स्वत: भाजपच्या कमळावर विधानसभेत पोहोचले व या भागात नाविस व भाजपचे जुने कार्यकर्ते असे संयुक्त काम सुरू झाले. त्यामुळे भाजपला आता २८ हजार मतांपर्यंत मजल मारता आली. म्हणजे जवळजवळ १८ हजारांवर मतांची भर भाजपच्या खात्यात नव्याने जमा झाली आहे. जिल्ह्यात निवडणुकीचे कुठे नव्हे एवढे मुद्दे एकट्या अहेरी विधानसभा क्षेत्रात विरोधकांनी जि. प. च्या रणसंग्रामात उपस्थित केले. मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यात शेतकऱ्यांचा असंतोष, सूरजागड प्रकल्पावरून स्थानिकांचा भाजपवर असलेला रोष शिवाय सिरोंचाच्या रेती तस्करीला भाजपच जबाबदार आहे, हा प्रचार भाजपासाठी प्रचंड फटका देणारा ठरला. केंद्र सरकारच्या नोटबंदीमुळे खवळलेल्या माओवाद्यांनी भाजपच्या विरोधातच प्रचार ठोकला. याचा परिणाम दुर्गम भागात भाजप उमेदवारांवर झाला. या परिस्थितीतही अम्ब्रीशराव आत्रामांच्या एकट्याच्या बळावर भाजपचा किल्ला त्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रात टिकविला व पक्षाच्या जागा दोनवरून चारवर नेल्या. स्वत: राणी रूक्मिणीदेवीही भाजपच्या प्रचारासाठी अहेरी विधानसभा क्षेत्रात अनेक भागात फिरल्या. त्यांच्या प्रचारामुळेच कोेठारी-शांतीग्रामची जागा नाविसचे जुने कार्यकर्ते असलेले उरेते परिवार राखू शकले. टीकाकार ही बाब मान्य करण्यास तयार नाही. अम्ब्रीशरावांवर निष्क्रीयतेचा ठपका ठेवत भाजपला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्याचा डंका ते पिटवत आहे. भाजपने मेडिगट्टा-कालेश्वर प्रकल्पाबाबत वेळोवेळी स्पष्टीकरण दिले. मात्र आविसंने या भागात केलेले आंदोलन प्रभावी झाल्याने सिरोंचा तालुक्यात टेबल वाजला.भामरागड तालुक्यात भाजपचा प्रभाव फारसा दिसला नाही. मात्र पेरमिली-राजाराम हा नाविसचा गड या निवडणुकीतही अम्ब्रीशराव राखून धरू शकले. हे तेवढेच महत्त्वाचे आहे. मात्र या निवडणुकीतून धडा घेऊन पालकमंत्र्यांनी अहेरीसाठी आता स्वतंत्र वेळ देणे महत्त्वाचा राहणार आहे. लोकांचा संपर्कही वाढविण्याची गरज आहे. दिवसा जरी शक्य झाले नाही, तरी रात्री कार्यकर्त्यांना बोलावून त्यांच्या भावनाही समजून घेणेही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक राहणार आहे, एवढाच संदेश मतदारांनी अम्ब्रीशरांवाना या निकालातून दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)