शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

आरमोरी नगर परिषदेचे अस्तित्व वांद्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 00:11 IST

अडथळ्यांची शर्यत पार करीत असलेल्या प्रस्तावित आरमोरी नगर परिषदेसमोरील अडचणी अजूनही संपलेल्या नाहीत. अरसोडा ग्रामपंचायतने या नगर परिषदेत समाविष्ठ होण्यास नकार दिल्यामुळे २५ हजार लोकसंख्येचा निकष कसा पूर्ण करायचा? असा प्रश्न उभा ठाकला आहे.

ठळक मुद्देअरसोडामुळे अडचण : लोकसंख्येचा निकषाची अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अडथळ्यांची शर्यत पार करीत असलेल्या प्रस्तावित आरमोरी नगर परिषदेसमोरील अडचणी अजूनही संपलेल्या नाहीत. अरसोडा ग्रामपंचायतने या नगर परिषदेत समाविष्ठ होण्यास नकार दिल्यामुळे २५ हजार लोकसंख्येचा निकष कसा पूर्ण करायचा? असा प्रश्न उभा ठाकला आहे.आरमोरीला नगर पंचायतऐवजी नगर परिषदेचा दर्जा द्यावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दाखल झाली होती. ती याचिका निकाली काढताना आॅगस्ट २०१७ मध्ये न्यायालयाने याबाबतचा निर्णय चार आठवड्यात राज्य शासनाने घ्यावा असे आदेश दिले होते. त्यानुसार १२ सप्टेंबर २०१७ रोजी आरमोरी नगर परिषदेची अधिसूचना जारी केली. यावेळी आरमोरी (लोकसंख्या १८,५०४), शेगाव (३८४२), अरसोडा (२६२१) आणि पालोरा (५४०) या चार गावांना नगर परिषदेत सामावून घेण्याचे जाहीर केले. याचवेळी संबंधित ग्रा.पं.च्या काही हरकती असतील तर त्यांनी आपले आक्षेप जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यास सांगितले. त्यानुसार अरसोडा ग्रामपंचायतने आक्षेप घेतला होता. सोबतच आरमोरी नगर परिषदेत समाविष्ठ होण्यास नकार देणारा ठराव घेऊन तो जिल्हाधिकाºयांकडे सादर केला. जिल्हाधिकाºयांनी तो ठराव राज्य शासनाकडे पाठविला. जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही अरसोडा ग्रामपंचायतचा हा ठराव शासनाकडे पाठविण्याचे ठरले. त्यामुळे शासन आता काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.- तर २०२१ च्या जनगणनेची प्रतीक्षाकोणतीही नगर परिषद अस्तित्वात येण्यासाठी त्या गावाची लोकसंख्या किमान २५ हजार असावी अशी अट आहे. २०११ च्या जनगणनेनुसार आरमोरीची लोकसंख्या १८ हजार ५०४ तर शेगाव आणि पालोरा मिळून एकूण लोकसंख्या २२ हजार ८८६ इतकी होते. त्यामुळे अरसोड्याला वगळून नगर परिषद जाहीर करताना लोकसंख्येचा निकष कसा पूर्ण करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर तसे झाल्यास २०२१ मध्ये होणाºया जनगणेची प्रतीक्षा करून नंतर वाढीव लोकसंख्या जाहीर होईपर्यंत आरमोरीवासीयांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.