शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

अनलाॅकनंतर भाजीपाला १० टक्क्यांनी महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:24 IST

गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक असले तरी खरीप हंगामातील पीक निघाल्यानंतर रबी हंगामात अनेक शेतकरी भाजीपाल्याची ...

गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक असले तरी खरीप हंगामातील पीक निघाल्यानंतर रबी हंगामात अनेक शेतकरी भाजीपाल्याची लागवड करतात. त्यामुळे उन्हाळभर भाजीपाल्याची आवक माेठ्या प्रमाणावर असते. याचा परिणाम दरही कमी व स्थिर असतात. परंतु पावसाळ्यात दर वाढतात. सध्या पावसामुळे बाहेरची आवक घटल्याने गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत जिल्ह्यात भाजीपाल्याचे दर १० टक्क्यांनी वाढले आहेत.

गडचिराेली येथे दरवर्षी उन्हाळ्यात स्थानिक शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. याशिवाय नागपूर व चंद्रपूरवरूनही भाजीपाला आणला जाताे. यावर्षीच्या उन्हाळ्यात कांदे व लसनाचे दर फारशे खाली घसरले नाही. पावसाळ्याची चाहूल लागताच दरवाढ झाली. सध्या कांदे ३० रुपये प्रति किलाे दराने विकले जात आहेत तर लसून ४० रुपये पाव दराने विकला जात आहे. पंधरवड्यापूर्वी कांदे २० ते २५ रुपये किलाे हाेते तर लसून ३० रुपये पाव प्रमाणे विकले जात हाेते. टमाटे, बटाटे, भेंडी, मिरची, फुलकाेबी, पत्ताकाेबी, कारले, वांगी, पालक आदी भाजीपाल्यांचे दर पंधरवड्यापूर्वी कमी हाेते. त्यानंतर आता या सर्वच भाजीपाल्याच्या किमतीत जवळपास १० ते १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. अनेक गृहिणी दरवाढीने त्रस्त झाल्या आहेत. आधीच काेराेनाचे संकट असताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत हाेता. त्यातच पुन्हा भाजीपाला पिकाची दरवाढ झाल्याने सर्वसामान्य तसेच शेतकरी कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. भाजीपाल्याचे दर पावसाळ्यापूर्वी एवढे वाढले आहेत तर भरपावसाळ्यात पुन्हा किती रुपयांनी दर वाढतील, याची चिंता नागरिकांना सतावत आहे.

बाॅक्स........

पुन्हा वरणावर जाेर

काेट ......

मागील वर्षीपासून खाद्यतेलाच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. त्यानंतर उन्हाळ्यात कांद्याचे दर कमी हाेतील, अशी अपेक्षा हाेती. परंतु यावर्षी दर कमी झाले नाही. आता भाजीपाल्याचे दर वाढत आहेत.

- मीरा साेमणकर, गृहिणी

काेट .......

शहरी भागातील बाजारपेठेतून आणून ग्रामीण भागात अनेक विक्रेते भाजीपाल्याची विक्री करतात. त्यामुळे ते अधिक दराने विक्री करीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आहारात दाेन्ही वेळेलाभाजीपाल्या वापर करणे शक्य नाही. सध्या दर वाढल्याने बेसन व वरणावर भर आहे.

- प्राची चाैधरी, गृहिणी

बाॅक्स .....

म्हणून वाढले दर

काेट .......

पावसाळा सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला निघणे बंद झाल्याने मुख्य बाजारपेठेतील आवक घटली. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले. १५ दिवसांपूर्वी प्रत्येक भाजीपाला १० ते १५ रुपयांनी प्रति किलाेवर स्वस्त हाेता. परंतु आता आवकच घटल्याने साहजिकच दर वाढणार हाेते. टमाटे, कांदे, लसून व अद्रकाचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

-पंकज लटारे, व्यापारी

काेट .....

ज्या शेतकऱ्यांनी शेतात भाजीपाल्याची लागवड केली हाेती. त्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामामुळे भाजीपाला पीक नष्ट केले. तसेच रबी हंगामात व उन्हाळ्याच्या सुरुवातीला लागवड केलेल्या भाजीपाल्याची मुदत संपल्याने सध्या आवक घटली आहे.

- विनायक कुळमेथे, विक्रेता

बाॅक्स ....

भाजीपाला नसताना वाढतात दर

काेट .....

खरीप हंगाम संपल्यानंतर आम्ही आपल्या शेतात भाजीपाल्याची लागवड केली हाेती. परंतु या हंगामात बाजारपेठेत माेठ्या प्रमाणावर आवक हाेती. त्यामुळे नफा अत्यल्प मिळत हाेता.

- सुधाकर मडावी, शेतकरी

काेट ......

ज्यावेळी शेतकरी आपल्या शेतात उत्पादित केलेला माल विक्रीसाठी बाजारपेठेत नेताे तेव्हा त्याला अल्प किमतीत व्यापारी खरेदी करतात. त्यानंतर त्याच मालावर दुप्पट नफा कमवतात.

- हिराजी लाडवे, शेतकरी